शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीच्या बैठकीत पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:26 IST

अद्याप उन्हाळा सुरु झाला नसतांना ठाण्यातील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याने त्याचे पडसाद बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.

ठाणे : अद्याप उन्हाळा सुरु झाला नसतांना ठाण्यातील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याने त्याचे पडसाद बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. त्यातही दिवा -मुंब्रा सारख्या भागात तर पाचपाच दिवस पाणी येत नसल्याच्या मुद्दा बैठकीत चांगलाच गाजला. एकीकडे नागरिक पाणी नाही म्हणून त्रस्त असतांना दुसरीकडे ज्या इमारतींना ओसी नाही, त्यांना पाणीपुरवठा कसा केला जातो असा सवाल सदस्यांनी केला. पाणी प्रश्नावरून सदस्यांनी आक्रमक धरल्यानंतर अखेर या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती राम रेपाळे यांनी दिले.दिव्यातीलशिवसेनेचे नगरसेवक शैलेश पाटील आणि मुंब्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानू पठाण यांनी त्यांच्या भागातील पाणी समस्येचा पाढा वाचला. येथील काही भागांमध्ये पाच पाच दिवस पाणी येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. महापालिका हद्दीत पाणी प्रश्न गंभीर रूप धारण करत असल्याने त्याचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. तर शिवसेनेच्या नगरसेविका विमल भोईर यांनी नागरिकांना पाणी मिळत नसल्याने ते हैराण असल्याचे सांगून वर्तकनगर परिसरात ओसी नसताना काही इमारतींना पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप केला. परंतु, तोमहापालिकेच्या जलवाहिनीतून केला जात नसून मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतून होत असल्याच्या प्रशासनाच्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही, त्यांनी हा मुद्दा आणखी लावून धरला. अखेर सभापती रेपाळे यांनी या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल स्थायी समितीपुढे सादर करावाख असे आदेश प्रशासनाला दिले.पोहण्यासाठी पिण्याचे पाणीशिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी महापालिका हद्दीत असलेल्या तरणतलावांना कोणत्या पाण्याचा पुरवठा होतो असा सवाल केला. तरणतलावांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो, परंतु त्याचे रिसायकलिंग करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु, तो थांबवावा अशी मागणी त्यांनी केली.महापालिका हद्दीत अनेक रहिवाशांना पाण्याचे वाढीव बिल येत असल्याचे नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले. संगणक विभागाचे स्वरूप कुलकर्णी यांनी सांगितले की, ही बिले काढण्याचे काम ज्या संस्थेला दिले होते, तिचे काम दर्जाहीन होते. त्यांच्याकडून काम काढून घेतले. यावर नरेश म्हस्के यांनी असा प्रकार वारंवार होत असल्याचा आरोप करून वाढीव बिलांवर आक्षेप घेतला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाwater shortageपाणीटंचाई