शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्थायी समितीच्या बैठकीत पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:26 IST

अद्याप उन्हाळा सुरु झाला नसतांना ठाण्यातील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याने त्याचे पडसाद बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.

ठाणे : अद्याप उन्हाळा सुरु झाला नसतांना ठाण्यातील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याने त्याचे पडसाद बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. त्यातही दिवा -मुंब्रा सारख्या भागात तर पाचपाच दिवस पाणी येत नसल्याच्या मुद्दा बैठकीत चांगलाच गाजला. एकीकडे नागरिक पाणी नाही म्हणून त्रस्त असतांना दुसरीकडे ज्या इमारतींना ओसी नाही, त्यांना पाणीपुरवठा कसा केला जातो असा सवाल सदस्यांनी केला. पाणी प्रश्नावरून सदस्यांनी आक्रमक धरल्यानंतर अखेर या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती राम रेपाळे यांनी दिले.दिव्यातीलशिवसेनेचे नगरसेवक शैलेश पाटील आणि मुंब्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानू पठाण यांनी त्यांच्या भागातील पाणी समस्येचा पाढा वाचला. येथील काही भागांमध्ये पाच पाच दिवस पाणी येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. महापालिका हद्दीत पाणी प्रश्न गंभीर रूप धारण करत असल्याने त्याचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. तर शिवसेनेच्या नगरसेविका विमल भोईर यांनी नागरिकांना पाणी मिळत नसल्याने ते हैराण असल्याचे सांगून वर्तकनगर परिसरात ओसी नसताना काही इमारतींना पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप केला. परंतु, तोमहापालिकेच्या जलवाहिनीतून केला जात नसून मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतून होत असल्याच्या प्रशासनाच्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही, त्यांनी हा मुद्दा आणखी लावून धरला. अखेर सभापती रेपाळे यांनी या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल स्थायी समितीपुढे सादर करावाख असे आदेश प्रशासनाला दिले.पोहण्यासाठी पिण्याचे पाणीशिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी महापालिका हद्दीत असलेल्या तरणतलावांना कोणत्या पाण्याचा पुरवठा होतो असा सवाल केला. तरणतलावांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो, परंतु त्याचे रिसायकलिंग करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु, तो थांबवावा अशी मागणी त्यांनी केली.महापालिका हद्दीत अनेक रहिवाशांना पाण्याचे वाढीव बिल येत असल्याचे नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले. संगणक विभागाचे स्वरूप कुलकर्णी यांनी सांगितले की, ही बिले काढण्याचे काम ज्या संस्थेला दिले होते, तिचे काम दर्जाहीन होते. त्यांच्याकडून काम काढून घेतले. यावर नरेश म्हस्के यांनी असा प्रकार वारंवार होत असल्याचा आरोप करून वाढीव बिलांवर आक्षेप घेतला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाwater shortageपाणीटंचाई