शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीच्या बैठकीत पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:26 IST

अद्याप उन्हाळा सुरु झाला नसतांना ठाण्यातील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याने त्याचे पडसाद बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.

ठाणे : अद्याप उन्हाळा सुरु झाला नसतांना ठाण्यातील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याने त्याचे पडसाद बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. त्यातही दिवा -मुंब्रा सारख्या भागात तर पाचपाच दिवस पाणी येत नसल्याच्या मुद्दा बैठकीत चांगलाच गाजला. एकीकडे नागरिक पाणी नाही म्हणून त्रस्त असतांना दुसरीकडे ज्या इमारतींना ओसी नाही, त्यांना पाणीपुरवठा कसा केला जातो असा सवाल सदस्यांनी केला. पाणी प्रश्नावरून सदस्यांनी आक्रमक धरल्यानंतर अखेर या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती राम रेपाळे यांनी दिले.दिव्यातीलशिवसेनेचे नगरसेवक शैलेश पाटील आणि मुंब्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानू पठाण यांनी त्यांच्या भागातील पाणी समस्येचा पाढा वाचला. येथील काही भागांमध्ये पाच पाच दिवस पाणी येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. महापालिका हद्दीत पाणी प्रश्न गंभीर रूप धारण करत असल्याने त्याचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. तर शिवसेनेच्या नगरसेविका विमल भोईर यांनी नागरिकांना पाणी मिळत नसल्याने ते हैराण असल्याचे सांगून वर्तकनगर परिसरात ओसी नसताना काही इमारतींना पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप केला. परंतु, तोमहापालिकेच्या जलवाहिनीतून केला जात नसून मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतून होत असल्याच्या प्रशासनाच्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही, त्यांनी हा मुद्दा आणखी लावून धरला. अखेर सभापती रेपाळे यांनी या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल स्थायी समितीपुढे सादर करावाख असे आदेश प्रशासनाला दिले.पोहण्यासाठी पिण्याचे पाणीशिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी महापालिका हद्दीत असलेल्या तरणतलावांना कोणत्या पाण्याचा पुरवठा होतो असा सवाल केला. तरणतलावांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो, परंतु त्याचे रिसायकलिंग करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु, तो थांबवावा अशी मागणी त्यांनी केली.महापालिका हद्दीत अनेक रहिवाशांना पाण्याचे वाढीव बिल येत असल्याचे नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले. संगणक विभागाचे स्वरूप कुलकर्णी यांनी सांगितले की, ही बिले काढण्याचे काम ज्या संस्थेला दिले होते, तिचे काम दर्जाहीन होते. त्यांच्याकडून काम काढून घेतले. यावर नरेश म्हस्के यांनी असा प्रकार वारंवार होत असल्याचा आरोप करून वाढीव बिलांवर आक्षेप घेतला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाwater shortageपाणीटंचाई