शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थ : एक अदृश्य आक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 01:18 IST

२६ जून हा अमली पदार्थ सेवन विरोधी दिन म्हणून जगभर मानला जातो. भारतातील त्यांचे विदारक भीषण स्वरूप यावर प्रकाश टाकणारा लेख

‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीनुसार २०११ मध्ये दिल्लीतील रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची संख्या ५०९२३ इतक ी होती. त्यापैकी ९० टक्के म्हणजे ४६४११ मुलांना अमली पदार्थांचं व्यसन जडलेलं आढळून आलं. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या संसथेने म्हटले आहे की २०१५ आणि २०१६ मध्ये १८ वर्षाखालील मुले अनुक्रमे ५३ व ३४ मुले अनैसर्गिक मृत्युची शिकार झाली. त्याचे कारण अमली पदार्थाचे अतिरिक्त सेन (ड५ी१ङ्मि२ी).युनायटेड नेशन्स आॅफिस आॅन ड्रग अ‍ॅण्ड क्राईम (वठडऊउ) यांच्यानुसार भारतातील अनेक राज्यात १ ते ३ टक्के एवढे व्यसनांचे प्रमाण असून ते युरोपमधील ०.१ टक्के व अमेरिकेतील ०.२ टक्के या प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे.पंजाबमध्ये अमली पदार्थ (विशेषत: हेरॉईन) सेवनाचे प्रमाण सर्वाधिक असून ७० टक्के युवावर्ग या व्यसनाने बाधीत झाले आहेत. २०१५ साली झालेल्या सरकारी पाहणीत पंजाबमध्ये अमली पदार्थ सेवन करणाºयात ८९ टक्के लोक साक्षर व सुशिक्षित होते तर ५६ टक्के ग्रामीण भागातील होते.तरुणांमध्ये अमली पदार्थ व्यसनाचं मुख्य कारण म्हणजे याचं असणं म्हणजेच उपलब्ध असणं आणि मन कसल्यातरी तणावाखाली असणं म्हणजेच उपलब्ध असणं शिवाय लोकप्रिय माध्यमातून होणारं गौरवीकरण. तरुणांना त्यातला थरार अनुभवायचा असतो म्हणून त्याची भुरळ पडते. जीवनानुभवाच्या अपरिपक्वतेचा कच्चा दुवा आणि दोस्तकंपनी आग्रह यामुळं ही मुलं अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकतात. कोणत्याही बाबतीतली तारुण्यसुलभ, उत्सुकता, काहीतरी वेगळं क रण्याची, बंड करण्याची एक प्रकारची खुमखुमी, यातूनच अमली पदार्थांचे सेवन घडते. अफू, चरस, गांजा यापासून के-२, एक्ससी, अ‍ॅम्फटामाईन, एमडी असे अनेक सिंथेटीक मादक पदार्थ सेवन केले जात आहेत़ मादक पदार्थांच्या सेवनाने माणासचे स्वत: व इतरांचे मानसिक, शारिरीक, नैतिक आणि आर्थिक नुकसान होते हे सत्य असूनही काही लोक त्याचे समर्थन करून इतरांची दिशाभूल करीत असतात. हृदयासन शकता येते, एकाग्रता स्मरणशक्ती वाढते, सेक्सपॉवर वाढते. खेळ किंवा रंगभूमीवरील आपली अदाकारी खुलवता येते इत्यादी दाव्यानिशी काही लोक त्याची भलामण करतात.- डॉ. अजित मगदूम, संचालक अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, वाशीउपाय काय?वैद्यकीय तज्ञ व्यवसायिक, कुटुंब, शाळा महाविद्यालये व बाजूबाजूचा एकंदर समाज यांनी जबाबदार भूमिका अमली पदार्थविरुद्ध बजावली पाहिजे. माध्यमे विशेषत: कर मनोरंजन क्षेत्राने व्यसनाचं स्तुतीकरण, गौरवीकरण, जाहिरात व्यापक समाजहिताच्या दृष्टीकोनातून कटाक्षाने टाळणे आवश्यक तर आहेच पण त्याच्या दुष्परिणामांचा प्रसार करण्याची सकारात्मकता बाळगली पाहिजे. कोणत्याही दृष्टीनं विचार केला तरी अमली पदार्थांचे सेवन हे हानीकारकच आहे, हे शाळकरी व किशोरवयीनांना बिंबवले पाहिजे. संवेदनशील समाजगटाने राजकीय इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील तर राहिले पाहिजे.उपचार काय?जे अमली पदार्थांच्या व्यसनात अडकलेले आहेत त्याना तुच्छतेने न वागवता व्यसन हा एक आजार झालेला रुग्ण म्हणून त्यावरील उपचार केले पाहिजेत. अनेकांना यावर काही उपचार करून बरे करता येते, हे माहित नसते. अनेकजण व्यसनीला बाबा, महाराज, मांत्रिक यांच्याकडे घेवून जातात. काहीजण टीव्हीवरील जाहिरात वाचून औषध गोळ्या मागवून घेतात. परुं या दोन्ही मार्गाने व्यसन सुटत नाही. सुटले तर ते तात्पुरते सुटेल.भारताला अमली पदार्थांचा धोका अधिकभारत हा अमली पदार्थांच्या आंतरराष्टÑीय वाहतुकीच्या पट्ट्यात येत असल्याने हा प्रश्न जटील झाला आहे. एकीकडे अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान ज्याला सुवर्ण चंद्रकोर (ॠङ्म’ीिल्ल ू१ीूील्ल३) म्हटलं जातं तिकडून तसेच दुसºया बाजूला म्यानमार, लाओस, थायलंडमध्ये सुविर्ण त्रिकोण (ॠङ्म’ीिल्ल ळ१ं्रल्लॅ’ी) इकडून होणारी अमली पदाथा्रंचे तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान भारतापुढे आहे. एमडीसारखे भयंकार मादक पदार्थ कायद्याच्या कक्षेत आल्याने व त्याचे मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे येथील साठे उध्वस्त केल्याने २०१७ च्या आॅक्टोबरमध्ये एमडीला पर्याय म्हणून चायना व्हाईटसारखे अति भयंकार मादक द्रव्य भारतातील नार्कोटिक मार्केटमध्ये प्रविष्ट झाले. हे मार्फिक किंवा हेरॉईनपेक्षा १०० पटीने अधिक जालीम आहे. ज्यांच्या हुंगण्यामुळे किंवा केवळ झोप केसिस, खेळझाी, बूट, सौंदर्य प्रसाधनांच्या खोक्यातून चायनाव्हाईट, त्वचेच्या स्पर्शामुळे त्याचा ओव्हडोस झाल्याचा परिणाम होतो. हे म्यानमारमधून भारतात मणीपूर, मिझोराम मागे दिल्लीत अवतरलेले हे द्रव्य ‘हायर दॅन हाय परिणाम देणारे ठरेल. मादक द्रव्यांच्या तस्करीवर दहशतवाद, आंतरराष्टÑीय गुन्हेगारी पासेली जात असल्याने देशाची सुरक्षा व स्वास्थ्यावर विपरीत परिणाम व ताण निर्माण होत आहे. मादक पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापार व यातून देशाच्या महत्त्वाच्या शहरातील त्याचा सुळसुळाट देशाला आतून खिळखिळे बनवू शकतो. यांचे गांभीर्य यंत्रणेबरोबरच देशातील जनतेनेही लक्षात घ्यायला हवे. अन्यथा सीमी सुरक्षा, शस्त्रास्त्र साठा, सैन्यबल इ. सर्व या सुप्त व अदृश्य आक्रमणासमोर निष्प्रभ ठरतील.

टॅग्स :Drugsअमली पदार्थthaneठाणे