शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

विवाहयोग जुळला, पण ‘कचऱ्याचा राहू’ कुंडलीत कायम!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 2:51 AM

शहराच्या पश्चिम भागातील आधारवाडी भागातील एका तरुणाचा विवाहयोग डम्पिंग ग्राउंडच्या त्रासामुळे उशिरा का होईना, अखेर जुळून आला आहे.

मुरलीधर भवार कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील आधारवाडी भागातील एका तरुणाचा विवाहयोग डम्पिंग ग्राउंडच्या त्रासामुळे उशिरा का होईना, अखेर जुळून आला आहे. येथील डम्पिंग ग्राउंडची समस्या मात्र कायम आहे. डम्पिंग ग्राउंडमुळे अमोल जोशीचा विवाह होत नसल्याचा सामाजिक मुद्दा तीन वर्षांपूर्वी उघड झाला होता.

आधारवाडी डम्पिंगच्या ठिकाणी कचºयाचा २५ मीटर उंच डोंगर झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होतो. अधूनमधून कचºयाला आग लागल्याने नागरिकांच्या नाकातोंडात धूर जाऊन त्यांचा श्वास गुदमरतो. डम्पिंगला आगीच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ३१ मे २०१६ रोजी महापालिकेवर धडक दिली होती. या शिष्टमंडळात नीळकंठधारा इमारतीत राहणारा अमोल जोशी हा तरुणदेखील होता. डम्पिंगच्या त्रासामुळे आपल्याला कुणी मुलगी देत नाही. त्यामुळे लग्न जमत नसल्याचा आरोप त्याने त्यावेळी केला होता. त्यामुळे डम्पिंग हा केवळ आरोग्याचा नव्हे, तर तो एक सामाजिक प्रश्नही असल्याचे उघड झाले. नीळकंठधारातील महिलांनी अमोलच्या उपस्थितीत तत्कालीन महापौर राजेंद्र देवळेकर यांना निवेदन दिले होते. त्यावेळी देवळेकर यांनी एका वर्षात डम्पिंग हटवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता आजपर्यंत झालेली नाही. समस्या न सुटल्याने अमोलचे लग्न जमण्यास विलंबच झाला. अखेर, अडीच वर्षांनंतर अमोलचे लग्न जमले आहे. दरम्यानच्या काळात त्याने काही मुली पाहिल्या. शेवटी, त्याला अंबरनाथच्या मुलीने पसंती दिली आहे. त्याने सोमवारी माजी महापौर देवळेकर यांची भेट घेऊन त्यांना लग्नाची पत्रिका दिली आहे. अमोलचे लग्न जमले असले, तरी डम्पिंगची समस्या सुटलेली नाही. आपल्यासारखी गत अन्य तरुणांची होऊ नये, अशी अपेक्षा अमोलने व्यक्त केली. तो पौरोहित्य करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.नीळकंठधारातील नागरिकांनी २0१५ मध्ये महापालिकेवर धडक दिली, त्यावेळी डम्पिंग बंद करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागेल, असे वक्तव्य आयुक्त ई. रवींद्रन यांनी केले होते. त्यानंतर, आयुक्त पी. वेलारासू यांची नियुक्ती झाली. आताचे आयुक्त गोविंद बोडके यांचेही स्वागत डम्पिंगच्या प्रश्नावरूनच झाले होते. तेव्हा त्यांनीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. 

टॅग्स :marriageलग्न