शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

बाजारपेठांत झाली `फूल्ल टू` गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:29 IST

ठाणे, कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप रोखण्याकरिता गेली सुमारे दोन महिने लागू केलेला लॉकडाऊन शिथिल होताच मंगळवारी जिल्ह्यातील ...

ठाणे, कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप रोखण्याकरिता गेली सुमारे दोन महिने लागू केलेला लॉकडाऊन शिथिल होताच मंगळवारी जिल्ह्यातील जवळपास सर्व शहरांमधील सर्व दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत खुली होताच रस्ते, बाजारपेठांमधील माणसांची, वाहनांची गर्दी बऱ्यापैकी वाढली. पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतील किंवा उठाबशा काढाव्या लागतील या भीतीने घराबाहेर पडण्यास कचरणारे हवशेगवशे पुन्हा बिनदिक्कत रस्त्यावर आले. त्यामुळे तिसऱ्या संभाव्य लाटेची भीती वाढली असून जे दुकानदार सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आदी नियम पाळणार नाहीत व निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ दुकाने सुरु ठेवतील त्यांची दुकाने बेमुदत सील करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या गर्दीत मंगळवारी लक्षणीय वाढ झाल्याने टोलनाक्यापाशी सकाळी व सायंकाळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्यांच्या नशिबी वाहतूककोंडीचा फेरा मंगळवारपासून सुरू झाला. ठाणे शहरातील राम मारुती रोड, गोखले रोड, जांभळी नाका अशा वेगवेगळ्या ठिकाणी बाजारपेठांमधील गर्दी वाढली होती. कपडे, बूट-चपला व मुख्यत्वे पावसाळी खरेदीकरिता गर्दी झाली होती. सोनारांच्या पेढ्या उघडल्या असल्या तरी तेथे तुरळक गर्दी दिसली. बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दुकाने सकाळी ७ ते २ वाजताच्या दरम्यान सुरु करण्यास परवानगी दिली गेल्याने मंगळवारी बाजारात खरेदीसाठी एकच गर्दी उसळली होती. त्यामुळे बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. रुग्णसंख्या कमी होत असताना बाजारात दररोज अशी गर्दी उसळणार असेल तर नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचे आव्हान महापालिका व पोलीस यंत्रणेवर राहणार आहे.

अत्यावश्यक सेवेच्या दुकानांच्या वेळेत वाढ करण्यात आली. तर अनावश्यक सेवेतील दुकानेही सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली होती. शिवाजी चौक, महमंद अली चौक, स्टेशन परिसरात खरेदीसाठी गर्दी उसळली होती. बाजारात चपला, रेनकोट, घर दुरुस्तीचे साहित्य, ताडपत्री खरेदीसाठी लोक दुकानात मोठ्या संख्येने दिसून आले. महापालिका हद्दीत दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यापासून सुरु झाली. रुग्णसंख्या रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ११ मार्च पासून कडक निर्बंध लागू केले. दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहून राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदीसह लॉकडाऊन लागू झाला. १५ जूनपर्यंत निर्बंध राहणार, असे सरकारने जाहीर केले. मात्र ज्या महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या कमी झाली आहे. तेथे शिथिलता दिली गेली. दुकानांची वेळ वाढवल्यामुळे हवशेगवशे विनाकारण पुन्हा रस्त्यावर दुचाकीवरुन हुंदडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांना वेसण घालणे गरजेचे आहे.

कोन गावाच्या ठिकाणी मंगळवारी सकाळी सुकी मासळी खरेदी करण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली होती. दुर्गाडी पुलाच्या दोन लेन सोमवारी सुरु झाल्या असल्या तरी जुन्या पुलावरुन कोनच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

......

जे दुकानदार दिलेल्या वेळेचे आणि कोरोना नियमावलीचे बंधन पाळणार नाही त्यांच्या विरोधात केवळ दंडात्मक कारवाई केली जाणार नाही तर त्यांची दुकाने कोरोना काळ संपुष्टात येईपर्यंत कायमस्वरुपी सील करण्यात येतील.

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, केडीएमसी

------------------------

वाचली