शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

बाजारपेठांत झाली `फूल्ल टू` गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:29 IST

ठाणे, कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप रोखण्याकरिता गेली सुमारे दोन महिने लागू केलेला लॉकडाऊन शिथिल होताच मंगळवारी जिल्ह्यातील ...

ठाणे, कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप रोखण्याकरिता गेली सुमारे दोन महिने लागू केलेला लॉकडाऊन शिथिल होताच मंगळवारी जिल्ह्यातील जवळपास सर्व शहरांमधील सर्व दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत खुली होताच रस्ते, बाजारपेठांमधील माणसांची, वाहनांची गर्दी बऱ्यापैकी वाढली. पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतील किंवा उठाबशा काढाव्या लागतील या भीतीने घराबाहेर पडण्यास कचरणारे हवशेगवशे पुन्हा बिनदिक्कत रस्त्यावर आले. त्यामुळे तिसऱ्या संभाव्य लाटेची भीती वाढली असून जे दुकानदार सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आदी नियम पाळणार नाहीत व निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ दुकाने सुरु ठेवतील त्यांची दुकाने बेमुदत सील करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या गर्दीत मंगळवारी लक्षणीय वाढ झाल्याने टोलनाक्यापाशी सकाळी व सायंकाळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्यांच्या नशिबी वाहतूककोंडीचा फेरा मंगळवारपासून सुरू झाला. ठाणे शहरातील राम मारुती रोड, गोखले रोड, जांभळी नाका अशा वेगवेगळ्या ठिकाणी बाजारपेठांमधील गर्दी वाढली होती. कपडे, बूट-चपला व मुख्यत्वे पावसाळी खरेदीकरिता गर्दी झाली होती. सोनारांच्या पेढ्या उघडल्या असल्या तरी तेथे तुरळक गर्दी दिसली. बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दुकाने सकाळी ७ ते २ वाजताच्या दरम्यान सुरु करण्यास परवानगी दिली गेल्याने मंगळवारी बाजारात खरेदीसाठी एकच गर्दी उसळली होती. त्यामुळे बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. रुग्णसंख्या कमी होत असताना बाजारात दररोज अशी गर्दी उसळणार असेल तर नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचे आव्हान महापालिका व पोलीस यंत्रणेवर राहणार आहे.

अत्यावश्यक सेवेच्या दुकानांच्या वेळेत वाढ करण्यात आली. तर अनावश्यक सेवेतील दुकानेही सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली होती. शिवाजी चौक, महमंद अली चौक, स्टेशन परिसरात खरेदीसाठी गर्दी उसळली होती. बाजारात चपला, रेनकोट, घर दुरुस्तीचे साहित्य, ताडपत्री खरेदीसाठी लोक दुकानात मोठ्या संख्येने दिसून आले. महापालिका हद्दीत दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यापासून सुरु झाली. रुग्णसंख्या रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ११ मार्च पासून कडक निर्बंध लागू केले. दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहून राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदीसह लॉकडाऊन लागू झाला. १५ जूनपर्यंत निर्बंध राहणार, असे सरकारने जाहीर केले. मात्र ज्या महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या कमी झाली आहे. तेथे शिथिलता दिली गेली. दुकानांची वेळ वाढवल्यामुळे हवशेगवशे विनाकारण पुन्हा रस्त्यावर दुचाकीवरुन हुंदडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांना वेसण घालणे गरजेचे आहे.

कोन गावाच्या ठिकाणी मंगळवारी सकाळी सुकी मासळी खरेदी करण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली होती. दुर्गाडी पुलाच्या दोन लेन सोमवारी सुरु झाल्या असल्या तरी जुन्या पुलावरुन कोनच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

......

जे दुकानदार दिलेल्या वेळेचे आणि कोरोना नियमावलीचे बंधन पाळणार नाही त्यांच्या विरोधात केवळ दंडात्मक कारवाई केली जाणार नाही तर त्यांची दुकाने कोरोना काळ संपुष्टात येईपर्यंत कायमस्वरुपी सील करण्यात येतील.

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, केडीएमसी

------------------------

वाचली