शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

Coronavirus: कोरोनाबाबत सतर्कता; अनेक गावांत नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने नोएंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 11:31 PM

गावांच्या वेशीवर नोएंट्रीचे बोर्ड

नितिन पंडित

भिवंडी: कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून संचार बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे 14 नागरिक परदेशातून परत आल्यानंतर या नागरिकांना होम कॉरंटाईन केल्याने ग्रामीण भागात देखील कोरोनाबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागातील अनेक गावांनी आपल्या गावातील मुख्य रस्त्यांवर प्रवेश बंदी केली आहे. सतर्कता म्हणून गावांच्या सुरूवातीला नोएंट्रीचे बोर्ड लावून गावचे मुख्य रस्ते स्वयंस्फूर्तीने बंद केले आहेत. 

सर्वत्र कोरोना व्हायरसचा धोका वाढत असताना भिवंडी तालुक्यात मलेशिया, दुबई, युएई, सिंगापूर, माॅरेशिएस इत्यादी देशातून परत आलेले 14 नागरिक होम कोरंटाइनखाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता जरूर घ्यावी परंतू घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन भिवंडी तालुका आरोग्य विभागाकडून वारंवार केले जात आहे. दरम्यान भिवंडी तालुक्यातील वडघर , डुंगे ,कारीवली , खारबाव , जुनांदूरखी, चाणे , वावली, मानिवली, पारिवली , कोलीवली, कुरंद , घोटगांव, पहारे बापगांव , देवरूंग , इत्यादी गावांसह अनेक गावांमध्ये तेथील नागरिकांनी कोरोनाबाबत सतर्कता म्हणून गावांच्या सुरुवातीला नोएंट्रीचे बोर्ड लावून गावचे मुख्य रस्त्यावर वृक्षांच्या तोडलेल्या फांद्या व बांबू टाकून स्वयंस्फूर्तीने बंद केले असून बाहेरील लोकांना गावांत प्रवेश बंद केला आहे. 

दरम्यान एका गावातील 74 नागरिक 8 मार्च रोजी वाराणसी, आयोध्या, शिर्डी इ. ठिकाणी गेले होते व ते 10 दिवसांचा प्रवास करून 18 मार्च रोजी परतले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या 74 जणांना देखील होम कोरंटाइनखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या