शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही आंबा 'चोपून' खाल्ला; ठाण्यातील राड्यावरून राज ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 15:43 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात आंबा स्टॉलवरुन झालेल्या राड्याचा राज्यभरात चांगलाच गाजावाजा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या राड्यावर भाष्य करत भाजपाला टोला लगावला आहे. 

ठाणे - गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात आंबा स्टॉलवरुन झालेल्या राड्याचा राज्यभरात चांगलाच गाजावाजा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या राड्यावर भाष्य करत भाजपाला टोला लगावला आहे. कॅनडाचे नागरिक अक्षय कुमार यांनी पंतप्रधानांना एक प्रश्न विचारला होता. आंबा कापून खायचा की चोखून खायचा? यावर आमच्या लोकांनी तो चोपून खाल्ला असा चिमटा भाजपाला काढला आहे. ठाण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. 

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेती उत्पादन राज्य सरकारने शहरात स्टॉल स्थापन करून विकण्याची परवानगी दिली आहे. भाजीपाला विकू शकतात मग आंब्यानं काय घोडं मारलं होतं? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. जर शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील तर त्यांना विकू देत नाही. भाजीपाला विकू देत,भलं शेतकऱ्यांचं होतंय, मग यात पक्षीय राजकारण कसलं आणताय असंही राज यांनी सांगितले. 

ठाण्यात आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे - भाजप वाद सुरूच

आंब्याचा स्टॉल हटवण्याच्या मुद्द्यावरुन सोशल मिडीयावर मनसे-भाजप कार्यकर्त्यांची एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू आहे. एका मराठी शेतकऱ्याला विरोध करणारा भाजप हा त्याच ठिकाणी फुटपाथवर असलेल्या परप्रांतीय आंबे विक्रेत्याला विरोध का करीत नाही, असा सवाल मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी रविवारी फेसबुकवर लाईव्ह करत विचारला होता. 

ठाण्यात आंबा स्टॉलवर कारवाई करावी यासाठी भाजपाच्या नगरसेवकाकडून महापालिकेत तक्रार करण्यात आली. त्यानंतर हा स्टॉल हटविण्याला मनसेने विरोध केला. त्यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद शमला नाही शेवटी या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं अखेर पोलिसांना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. दरम्यान मनसेने आंबा स्टॉल हटविण्याचा विरोध करत शेतकऱ्यांसाठी १७ मे रोजी मोर्चा काढण्याचे मनसेने जाहीर केले आहे. त्यामुळे मनसेने आयोजित केलेल्या शेतकरी मोर्चामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण आणखी तापू लागणार हे नक्की 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेthaneठाणेBJPभाजपा