शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुंब्रा-कळव्यात वाढलेल्या २.४८ टक्के मतदानाचा फायदा कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 17:58 IST

शिवसैनिक उतरलेच नाहीत : आव्हाडांची हॅट्ट्रिक होणार काय?

ठाणे : ठाण्यातील मुंब्रा - कळवा या मतदार संघात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचे हॅट्रिकसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून त्यांची लढत शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांच्याशी होत आहे. या मतदारसंघात यंदा मतदानाची टक्केवारी ही २.४८ टक्यांनी वाढली आहे. यंदा येथे ४९.९६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

वास्तविक पाहता या मतदारसंघात झालेल्या विकास कामांच्या जोरावर या मतांची टक्केवारी आणखी वाढेल, अशी वाटत होती. मात्र, ती आशा फोल ठरली का?, शिवसेनेच्या मतदारांनी दीपाली सय्यद यांना नाकारले का? अशीदेखील चर्चा असून त्यामुळेच मतांची टक्केवारी दोन टक्यांनी वाढली असली तरी त्याचे परिणाम फार काही जास्त प्रमाणात होतील असे दिसत नाही.

२०१४ मध्ये या मतदारसंघात ४७.४८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. समाजवादी, एमआयएम या निवडणुकीत बाहेर आहे. परंतु, एमआयएमने ‘आप’ ला टाळी दिली असल्याने त्याचा किती परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील निवडणुकीत ३ लाख ४८ हजार ४११ मतदात्यांपैकी १ लाख ६५ हजार ४२७ मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पैकी ९२ हजार ४५५ पुरुष आणि ७२ हजार ९७२ स्त्री मतदारांनी येथे मतदान केले होते. यंदा या मतदारसंघात ३ लाख ५७ हजार ४९३ मतदार होते. त्यापैकी १ लाख १५९ पुरुष आणि ७८ हजार ४३१ स्त्री मतदार असे मिळून एकूण १ लाख ७८ हजार ५९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदाच्या निवडणुकीत ४९.९६ टक्के मतदानाची नोंद झाली असून जी मागील वेळेच्या तुलनेत २.४८ टक्यांनी जास्त दिसून आली आहे. त्यामुळे वाढलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.मागील १० वर्षांपासून या मतदारसंघावर जितेंद्र आव्हाड यांचे वर्चस्व दिसून आले आहे. शिवसेनेने मागील दोन्ही निवडणुकांमध्ये आव्हाडांना पराभूत करण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. यंदाच्या निवडणुकीत ही रणनिती आणखी प्रबळ करण्यात आली होती. परंतु, स्थानिकांना डावलून शिवसेनेने सेलिब्रिटी चेहरा या मतदारसंघात दिला. दीपाली भोसले- सय्यद यांना उमेदवारी दिली. त्यामुळे येथील इच्छुक असलेल्या शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेचे मतदार जास्त प्रमाणात बाहेर पडले नसल्याचे दिसून आले. दुसरीकडे मागील १० वर्षांत विकास कामे करून आणि मुंब्रा - कळव्याचे एक वेगळे रोड मॉडेल तयार करूनही आव्हाडांना मतांची टक्केवारी फारशी वाढविता आली नाही, हेदेखील तितकेच सत्य म्हणावे लागणार आहे. परंतु,असे असले तरी ठाण्यातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत या मतदारसंघात २ टक्के का होईना मतदान वाढले असल्याने ती निर्णायक ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbra-kalwa-acमुंब्रा कळवाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस