शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: राज्याच्या राजकारणात ठाणे केंद्रस्थानी, सेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईकांवर जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 01:40 IST

सत्तास्थापनेसाठी शनिवारी राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्ताधारी आणि विरोधातील आमदारांभोवती प्रत्येक पक्षाने संरक्षक कठडे उभारले आहे.

- जितेंद्र कालेकरठाणे : सत्तास्थापनेसाठी शनिवारी राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्ताधारी आणि विरोधातील आमदारांभोवती प्रत्येक पक्षाने संरक्षक कठडे उभारले आहे. मुंबईतील खासगी हॉटेलमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना ठेवले असून, शिवसेनेचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील शिवसेनेच्या आमदारांची, तर राष्ट्रवादीच्या आमदारांची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविली आहे. विशेष म्हणजे भाजपनेही माजी पालकमंत्री गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षातील आमदारांची जबाबदारी सोपविल्याने ठाणे जिल्हा सतेच्या केंद्रस्थानी असल्याचे चित्र दिसत आहे.शिवसेनेने याआधीच माजी पालकमंत्री तथा कोपरी-पाचपाखाडीतील शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह राष्ट्रवादीने सोडला, तर शिंदे यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. राज्यातील सत्ता समीकरणात शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षितस्थळी ठेवण्याची, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये फुटू नयेत, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी शिंदे यांच्याकडेच आहे. शिंदे यांची संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकहाती पकड आहे. जिल्ह्यात कल्याण ग्रामीण आणि शहापूर या दोन जागा वगळता शिवसेनेने लढवलेल्या सर्व पाच जागा जिंकल्या आहेत. ठाणे महापालिकेत शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांची महापौरपदी बिनविरोध निवड होण्यात आणि उल्हासनगरातही सत्तांतर घडवून महापौरपदी लीलाबाई अशान या विराजमान होण्यात शिंदे यांचेच डावपेच यशस्वी ठरले. याशिवाय, अहमदनगरसारख्या ठिकाणीही शिंदेशाहीची नीती यशस्वी ठरल्याने ते ठाकरे कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे मानले जातात. याच पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये शिंदे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी पक्षाने दिली आहे.दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची साथ सोडून त्यांचे पुतणे अजित पवार यांनी फडणवीस यांच्या जोडीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण, अशाही स्थितीत मोठ्या साहेबांची साथ न सोडणाऱ्या जयंत पाटील यांच्यासह ठाण्यातील कळवा, मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचेही नाव घेतले जाते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासूनच आव्हाड हे त्यांच्याबरोबर आहेत. म्हणूनच पक्षाचे आमदार एकजुटीने राहावेत, याची खबरदारी घेण्यापासून अनेक महत्त्वाच्या जबाबदाºया ते सांभाळताना दिसत आहेत.जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे ८, शिवसेनेचे ५, राष्ट्रवादीचे दोन, तर मनसे, सपा आणि अपक्ष मिळून प्रत्येकी एक आमदार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास ठाण्यातील शिलेदारांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक मुख्य भूमिकेतविधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात दोन जागा अतिरिक्त घेऊन आठ जागा जिंकल्यामुळे भाजपची सरशी झाली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतून जिल्हाभर भाजपची मोट सांभाळणारे रवींद्र चव्हाण तसेच निवडणुकीच्या तोंडावर राष्टÑवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेल्या गणेश नाईकांवरही भाजप नेतृत्वाने आपल्या आमदारांची जबाबदारी सोपविली आहे. आपले आमदार फुटू नये, कोणतीही दगाबाजी होऊ नये, यासाठी शिवसेना राष्टÑवादीप्रमाणेच भाजपचेही चव्हाण आणि नाईक हे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील आमदारांवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रthaneठाणेPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा