शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीची माघार; मनसे उमेदवाराला पाठिंबा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 14:55 IST

ठाणे विधानसभा निवडणूक २०१९ - काही दिवसांपूर्वी कोथरूड मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

ठाणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीच्या बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न युतीकडून सुरु आहे. यात बहुतांश जागांवर शिवसेना-भाजपाला यश आलं आहे. तर पालघरमधून अमित घोडा यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं होतं पण त्यांनी माघार घेत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना होणार असल्याचं चित्र आहे तर ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुहास देसाई यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे याचा फायदा मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना होणार असल्याचं चित्र आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि मनसे यांच्यात अधिकृत युती जाहीर झाली नसली तरी काही ठिकाणी या दोन्ही पक्षांनी एकमेकांना पुरक असलेली भूमिका घेतल्याने मनसे-राष्ट्रवादीत छुपी युती झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वी कोथरूड मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या भागात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवित आहे. त्यांच्याविरोधात एकाच उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत विरोधी पक्षांमध्ये एकमत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. 

ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास सुर्यकांत देसाई यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस तथा ठामपातील गटनेते नजीब मुल्ला यांनी दिली आहे. दरम्यान, आपण पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षहीत पाहून हा निर्णय घेतलेला असल्याने आपण आपला निवडणूक अर्ज मागे घेत असल्याचे सुहास देसाई यांनी स्पष्ट केले.

तर ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार मागे घेतल्याने याठिकाणी मनसेचे अविनाश जाधव आणि भाजपाचे संजय केळकर यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. त्यात विरोधी पक्षांच्या मतांमध्ये फूट पडू नये अशी काळजी मनसे-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :thane-acठाणे शहरMNSमनसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस