शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

Maharashtra Election 2019: ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीची माघार; मनसे उमेदवाराला पाठिंबा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 14:55 IST

ठाणे विधानसभा निवडणूक २०१९ - काही दिवसांपूर्वी कोथरूड मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

ठाणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीच्या बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न युतीकडून सुरु आहे. यात बहुतांश जागांवर शिवसेना-भाजपाला यश आलं आहे. तर पालघरमधून अमित घोडा यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं होतं पण त्यांनी माघार घेत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना होणार असल्याचं चित्र आहे तर ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुहास देसाई यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे याचा फायदा मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना होणार असल्याचं चित्र आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि मनसे यांच्यात अधिकृत युती जाहीर झाली नसली तरी काही ठिकाणी या दोन्ही पक्षांनी एकमेकांना पुरक असलेली भूमिका घेतल्याने मनसे-राष्ट्रवादीत छुपी युती झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वी कोथरूड मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या भागात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवित आहे. त्यांच्याविरोधात एकाच उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत विरोधी पक्षांमध्ये एकमत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. 

ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास सुर्यकांत देसाई यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस तथा ठामपातील गटनेते नजीब मुल्ला यांनी दिली आहे. दरम्यान, आपण पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षहीत पाहून हा निर्णय घेतलेला असल्याने आपण आपला निवडणूक अर्ज मागे घेत असल्याचे सुहास देसाई यांनी स्पष्ट केले.

तर ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार मागे घेतल्याने याठिकाणी मनसेचे अविनाश जाधव आणि भाजपाचे संजय केळकर यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. त्यात विरोधी पक्षांच्या मतांमध्ये फूट पडू नये अशी काळजी मनसे-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :thane-acठाणे शहरMNSमनसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस