शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पिसाळलेल्या कुत्र्यांकडे लक्ष देऊ नका, प्रताप सरनाईकांनी साधला मेहतांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 20:11 IST

शिवसेना मुळासकट उखडून टाकण्याचा दम भरणा-या भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात शिवसैनिक संतप्त झाले आहेत.

मीरा रोड - शिवसेना सर्वात विश्वास घातकी पक्ष असून मीरा भाईंदरमधून शिवसेना मुळासकट उखडून टाकण्याचा दम भरणा-या भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात शिवसैनिक संतप्त झाले आहेत. पण शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना संदेश पाठवून मेहतांनी माफी मागितली. भावनेच्या भरात व मानसिक तणावात आपण बोलून गेल्याचे मेहतांनी फोन करून सांगितले, असे खुद्द सरनाईक यांनी म्हटले आहे. तर पिसाळलेल्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नका, शिवसेना संपवण्याची भाषा करणारे स्वत:च संपले, असे सरनाईक शिवसैनिकांना म्हणाले आहेत.बाळासाहेब ठाकरे कलादालनास विरोध, मेहतांनी उद्धव ठाकरे व शिवसैनिकांचे काढलेले संस्कार आदी कारणांसह सेना नगरसेवक, पदाधिकारी आदीमध्ये विविध कारणांनी मेहतांबद्दल असलेल्या रोषामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी मेहतांना ठरवून धोबीपछाड दिला. त्यामुळे मेहता खवळले असून त्यांनी थेट सेनेला सर्वात मोठी विश्वास घातकी पार्टी म्हणत शहरातून शिवसेना मुळासकट संपवणार, असा दम भरला होता.मेहतांच्या वक्तव्याने सोशल मीडियासह शिवसैनिकांमध्ये निषेध आणि संताप व्यक्त होत होता. नगरसेवक राजू भोईर यांनी तर शिवसेनेला संपवण्याची भाषा करणा-यांना मीरा भाईंदरच्या जागरुक जनतेने आधीच संपवून टाकले आहे. शिवसैनिकांना डिवचणा-यांचे काय होते हे महाराष्ट्राची जनता आणि शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. स्वत:ची खोटी कर्म आणि केलेली पापं याचं प्रायश्चित करा, असा टोला भोईर यांनी लगावला आहे.मेहतांवर शिवसैनिक संतापले असल्याने सरनाईकांनीच समजूत काढली आणि शांत राहण्यास सांगितले. लोकांनीच ज्याला संपवले त्याला नाहक मोठं करू नका, असे सांगतानाच २०२२ पर्यंत मेहतांचं राजकिय अस्तित्व जनता आणि शिवसेना ठेवणार नाही, असे सरनाईक म्हणाले. भले भले शिवसेना संपवण्याची भाषा करणारे संपले. कुत्र्यासारखे हाल झाले. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नका, अशी बोचरी टीका त्यांनी केली. मेहतांनीच आपल्या संदेश पाठवून माफी मागितली असून, भावनेच्या भरात बोललो, असे म्हटल्याचे सरनाईकांनी सांगितले. मेहतांनी फोन देखील केला असे ते बोलले.खासदार राजन विचारे यांनी देखील मेहतांचा समाचार घेत शिवसेना संपवण्याची भाषा करण्याची देखील मेहतांची पात्रता नाही असे म्हणाले. लोकांनी तुमची पात्रता दाखवुन दिली असुन स्वत:च्या कर्माचे खापर दुसरायांवर फोडण्या पेक्षा आत्मचिंतन करुन सुधरा असा सल्ला विचारेंनी दिलाय.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019