शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

Maharashtra Election 2019: भाजप-मनसे थेट लढतीमुळे रंगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 06:37 IST

Maharashtra Election 2019: ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर हे सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

- अजित मांडकेठाणे - ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर हे सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत ही मनसेचेअविनाश जाधव यांच्याशी होणार आहे. ठाण्यात युतीचे वर्चस्व असले तरी मनसेला आता राष्ट्रवादीचा साथ लाभल्याने येथे या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे तमाम ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ शिवसेनेने सुरवातीला मागितला होता. त्यामुळे काही शिवसेनेची ज्येष्ठ मंडळी नाराज झाली होती. परंतु, आता एकनाथ शिंदेच यांनीच या निवडणुकीत लक्ष घातल्याने या नाराजांची नाराजीही दूर झाली आहे.  

मनसेकडून अविनाश जाधव हे प्रथमच विधानसभा निवडणूक लढवित आहेत. ठाण्यासह पालघर जिल्ह्याचे नेतृत्व त्यांच्या खांद्यावर आहे. पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. परंतु मतदार त्यांच्यावर कितपत विश्वास टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यात मनसेकडून लोकसभा निवडणुक लढली गेली नसली तरी विविध आंदोलनाच्या माध्यमातून मनसे काही अंशी ठाण्यात चर्चेत राहिली आहे.

जमेच्या बाजू

स्वच्छ चेहरा, शांत स्वभाव जनतेच्या सतत संपर्कात असणारे म्हणूनही संजय केळकर यांची ओळख आहे. तसेच जुन्या ठाण्यासह नव्याने तयार झालेल्या सोसायटींमध्येही त्यांना मानणारा एक गट आहे. शिवाय शिवसेनेबरोबर झालेली युती ही सुध्दा त्यांच्यासाठी एक जमेची बाजू मानली जात आहे. सर्वसामान्यांसाठी लढणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. भाजपसह शिवसेनेतील नाराजांची नारजीही आता दूर झाल्याने हा फायदा आहे.

अविनाश जाधव हे मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख आहेत. विविध आंदोलनाच्या माध्यमातून ते सतत चर्चेत राहिल्याचे दिसले आहेत. त्यामुळेच पक्षाने त्यांच्यावर दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. तरुणांना अपेक्षित असलेले नेतृत्व गुण त्यांच्याकडे आहेत. शिवाय आताच्या निवडणुकीत त्यांना राष्टवादीची साथ लाभली असल्याने ही एक जमेची बाजू मानली जात आहे. मराठी-गुजराती वादाला त्यांनी खतपाणी घातले.

उणे बाजू

संजय केळकर हे फारसे आक्रमक नाहीत. सुुशिक्षित मतदार मतदानाला उतरण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत घटले आहे. यावेळी मतदार मतदानाला उतरला तर ठीक अन्यथा त्यांना यंत्रणा राबवावी लागेल. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या नियोजनातील गोंधळावरुन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हजेरी घेतली होती. सभेतील गोंधळाची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये अन्यथा त्याचा त्रास पक्षाला व उमेदवाराला विनाकारण होऊ शकतो.

अविनाश जाधव हे अतिशय आक्रमक म्हणून ओळखले जातात. अतिआत्मविश्वास हा त्यांच्यातील मायनस पॉइंट मानला जात आहे. त्यांचा घात करण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यात राष्ट्रवादीने साथ दिली असली तरी ठाण्यातीन सुजाण मतदारांना ही साथ न पटण्यासारखी आहे. मनसेनी लोकसभा निवडणूक लढवली नसल्याने किती मते पडू शकतात, याचा काहीच अंदाज त्यांना व त्यांच्या पक्षाला आलेला नाही.

टॅग्स :thane-acठाणे शहरAvinash Jadhavअविनाश जाधवMNSमनसेBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019