शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनी दाखवले महाआघाडीचे ‘पाणी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 04:15 IST

नितीन गडकरींच्या घोषणेला विरोध; अगोदर ठाणेकरांची तहान भागवा, मग नाशिक-नगरचे बोला

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहून समुद्राला मिळणारे पाणी धरण बांधून अडवून नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांना देण्याची घोषणा करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ठाण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विरोध करून आपले एकजुटीचे पाणी दाखवले आहे. अगोदर तहानलेल्या ठाणे जिल्ह्याला त्या धरणांतून पाणी द्या. मग, पाणी उरलेच तर नाशिक-नगर जिल्ह्यांना द्या, अशी रोखठोक भूमिका नेत्यांनी घेतली आहे.ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेचे वर्चस्व असले, तरी सध्या भाजपासोबत सेनेची सतत खडाखडी सुरू असते. घनकचरा व्यवस्थापन, राज्य सरकारचा निधी, फेरीवाले, नागरी सुविधा अशा अनेक मुद्द्यांवरून शिवसेना-भाजपा यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे कल्याण-डोंबिवली किंवा मीरा-भार्इंदर या महापालिकांत दिसते. उल्हासनगरात तर सत्तेकरिता शिवसेनेने आपली सर्व ताकद पणाला लावली होती. ऐनवेळी शिवसेनेने माघार घेतली. खुद्द ठाणे शहरात भाजपाचे नगरसेवक हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक झालेले दिसतात. मात्र, ठाणेजिल्ह्यातील पाण्याच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत हेवेदावे विसरून सारे एकत्र आले. दरम्यान, जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात २२ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. यामुळे शहरांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा संपूर्ण बंद असतो. जिल्ह्यालाही पाण्याची अतिशय गरज आहे.दरवर्षी उन्हाळ्यात ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील विकासाची कामे झाल्याने लोकसंख्या वाढत आहे. असे असताना त्यांच्यासाठी शासनाने नव्याने पाणीयोजना राबवली पाहिजे. यापूर्वीमुंबई व इतर महापालिका क्षेत्रांतील नागरिकांना नियमित पाणी मिळावे, म्हणून शहापूर व भिवंडी तालुक्यांत धरणे बांधली. परंतु, बाधित गावांना व तालुक्यातील नागरिकांना पाणी न मिळाल्याने त्यांना अनेकवेळा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तत्कालीन शासनाने निश्चित धोरण न आखल्याने ही स्थिती निर्माण झाली. शहापूरमध्ये धरण बांधले जात असेल, तर तेथील लोकांना त्याचे पाणी मिळालेच पाहिजे. जिल्ह्यात कोठेही धरण बांधले जाणार असेल, तर स्थानिकांना पाणी मिळाले पाहिजे.- कपिल पाटील, खासदार, भाजपाठाणे जिल्हा हा पाण्याच्या दृष्टीने अतृप्त आहे. ही गोष्ट खरी आहे की, नाशिक आणि ठाण्याने मुंबई नव्हे तर महाराष्ट्राची तहान भागवली आहे. परंतु, ठाणे जिल्हा त्यादृष्टीने पाण्यासाठी नेहमीच उपाशी राहिलेला आहे. आता पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईची स्थितीनिर्माण झाली आहे. मागील २५ वर्षे धरण बांधणार म्हणून आश्वासन दिले जात आहे. परंतु, ते काही बांधले गेले नाही. २००३ साली जे धरण मी आणले, ते धरण शिवसेनेच्या टक्केवारीमुळे रद्द झाले. आजही ठाणे शहराला भीक मागून पाणी आणावे लागत आहे. करोडो रुपयांच्या योजना जाहीर होत आहेत. परंतु, पाण्यासाठी कोणतीच योजना आखली जात नाही. त्यामुळे गडकरी आणि मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, आधी ठाणे जिल्ह्याची तहान भागवा, मग हव्या त्या योजना आणा.- जितेंद्र आव्हाड,आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसमागील ६० वर्षे ठाणे जिल्हा हा मुंबईची तहान भागवत आहे. ठाण्यासाठी धरण असावे, म्हणून शाई आणि काळू धरणांसाठी प्रयत्न झाले. परंतु, तेथील रहिवाशांनी विरोध केल्याने धरण रखडलेले आहे. नगर आणि नाशिकला पाणी देण्यास काही हरकत नाही. परंतु, ते करतअसताना ठाणे जिल्ह्याची तहान आधी भागवणे गरजेचे आहे.- प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीShiv SenaशिवसेनाWaterपाणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस