शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
5
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
6
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
7
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
8
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
9
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
10
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
11
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
12
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
13
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
14
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
15
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
16
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
17
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
18
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
19
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
20
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'

नेत्यांनी दाखवले महाआघाडीचे ‘पाणी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 04:15 IST

नितीन गडकरींच्या घोषणेला विरोध; अगोदर ठाणेकरांची तहान भागवा, मग नाशिक-नगरचे बोला

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहून समुद्राला मिळणारे पाणी धरण बांधून अडवून नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांना देण्याची घोषणा करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ठाण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विरोध करून आपले एकजुटीचे पाणी दाखवले आहे. अगोदर तहानलेल्या ठाणे जिल्ह्याला त्या धरणांतून पाणी द्या. मग, पाणी उरलेच तर नाशिक-नगर जिल्ह्यांना द्या, अशी रोखठोक भूमिका नेत्यांनी घेतली आहे.ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेचे वर्चस्व असले, तरी सध्या भाजपासोबत सेनेची सतत खडाखडी सुरू असते. घनकचरा व्यवस्थापन, राज्य सरकारचा निधी, फेरीवाले, नागरी सुविधा अशा अनेक मुद्द्यांवरून शिवसेना-भाजपा यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे कल्याण-डोंबिवली किंवा मीरा-भार्इंदर या महापालिकांत दिसते. उल्हासनगरात तर सत्तेकरिता शिवसेनेने आपली सर्व ताकद पणाला लावली होती. ऐनवेळी शिवसेनेने माघार घेतली. खुद्द ठाणे शहरात भाजपाचे नगरसेवक हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक झालेले दिसतात. मात्र, ठाणेजिल्ह्यातील पाण्याच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत हेवेदावे विसरून सारे एकत्र आले. दरम्यान, जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात २२ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. यामुळे शहरांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा संपूर्ण बंद असतो. जिल्ह्यालाही पाण्याची अतिशय गरज आहे.दरवर्षी उन्हाळ्यात ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील विकासाची कामे झाल्याने लोकसंख्या वाढत आहे. असे असताना त्यांच्यासाठी शासनाने नव्याने पाणीयोजना राबवली पाहिजे. यापूर्वीमुंबई व इतर महापालिका क्षेत्रांतील नागरिकांना नियमित पाणी मिळावे, म्हणून शहापूर व भिवंडी तालुक्यांत धरणे बांधली. परंतु, बाधित गावांना व तालुक्यातील नागरिकांना पाणी न मिळाल्याने त्यांना अनेकवेळा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तत्कालीन शासनाने निश्चित धोरण न आखल्याने ही स्थिती निर्माण झाली. शहापूरमध्ये धरण बांधले जात असेल, तर तेथील लोकांना त्याचे पाणी मिळालेच पाहिजे. जिल्ह्यात कोठेही धरण बांधले जाणार असेल, तर स्थानिकांना पाणी मिळाले पाहिजे.- कपिल पाटील, खासदार, भाजपाठाणे जिल्हा हा पाण्याच्या दृष्टीने अतृप्त आहे. ही गोष्ट खरी आहे की, नाशिक आणि ठाण्याने मुंबई नव्हे तर महाराष्ट्राची तहान भागवली आहे. परंतु, ठाणे जिल्हा त्यादृष्टीने पाण्यासाठी नेहमीच उपाशी राहिलेला आहे. आता पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईची स्थितीनिर्माण झाली आहे. मागील २५ वर्षे धरण बांधणार म्हणून आश्वासन दिले जात आहे. परंतु, ते काही बांधले गेले नाही. २००३ साली जे धरण मी आणले, ते धरण शिवसेनेच्या टक्केवारीमुळे रद्द झाले. आजही ठाणे शहराला भीक मागून पाणी आणावे लागत आहे. करोडो रुपयांच्या योजना जाहीर होत आहेत. परंतु, पाण्यासाठी कोणतीच योजना आखली जात नाही. त्यामुळे गडकरी आणि मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, आधी ठाणे जिल्ह्याची तहान भागवा, मग हव्या त्या योजना आणा.- जितेंद्र आव्हाड,आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसमागील ६० वर्षे ठाणे जिल्हा हा मुंबईची तहान भागवत आहे. ठाण्यासाठी धरण असावे, म्हणून शाई आणि काळू धरणांसाठी प्रयत्न झाले. परंतु, तेथील रहिवाशांनी विरोध केल्याने धरण रखडलेले आहे. नगर आणि नाशिकला पाणी देण्यास काही हरकत नाही. परंतु, ते करतअसताना ठाणे जिल्ह्याची तहान आधी भागवणे गरजेचे आहे.- प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीShiv SenaशिवसेनाWaterपाणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस