शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

नेत्यांनी दाखवले महाआघाडीचे ‘पाणी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 04:15 IST

नितीन गडकरींच्या घोषणेला विरोध; अगोदर ठाणेकरांची तहान भागवा, मग नाशिक-नगरचे बोला

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहून समुद्राला मिळणारे पाणी धरण बांधून अडवून नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांना देण्याची घोषणा करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ठाण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विरोध करून आपले एकजुटीचे पाणी दाखवले आहे. अगोदर तहानलेल्या ठाणे जिल्ह्याला त्या धरणांतून पाणी द्या. मग, पाणी उरलेच तर नाशिक-नगर जिल्ह्यांना द्या, अशी रोखठोक भूमिका नेत्यांनी घेतली आहे.ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेचे वर्चस्व असले, तरी सध्या भाजपासोबत सेनेची सतत खडाखडी सुरू असते. घनकचरा व्यवस्थापन, राज्य सरकारचा निधी, फेरीवाले, नागरी सुविधा अशा अनेक मुद्द्यांवरून शिवसेना-भाजपा यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे कल्याण-डोंबिवली किंवा मीरा-भार्इंदर या महापालिकांत दिसते. उल्हासनगरात तर सत्तेकरिता शिवसेनेने आपली सर्व ताकद पणाला लावली होती. ऐनवेळी शिवसेनेने माघार घेतली. खुद्द ठाणे शहरात भाजपाचे नगरसेवक हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक झालेले दिसतात. मात्र, ठाणेजिल्ह्यातील पाण्याच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत हेवेदावे विसरून सारे एकत्र आले. दरम्यान, जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात २२ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. यामुळे शहरांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा संपूर्ण बंद असतो. जिल्ह्यालाही पाण्याची अतिशय गरज आहे.दरवर्षी उन्हाळ्यात ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील विकासाची कामे झाल्याने लोकसंख्या वाढत आहे. असे असताना त्यांच्यासाठी शासनाने नव्याने पाणीयोजना राबवली पाहिजे. यापूर्वीमुंबई व इतर महापालिका क्षेत्रांतील नागरिकांना नियमित पाणी मिळावे, म्हणून शहापूर व भिवंडी तालुक्यांत धरणे बांधली. परंतु, बाधित गावांना व तालुक्यातील नागरिकांना पाणी न मिळाल्याने त्यांना अनेकवेळा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तत्कालीन शासनाने निश्चित धोरण न आखल्याने ही स्थिती निर्माण झाली. शहापूरमध्ये धरण बांधले जात असेल, तर तेथील लोकांना त्याचे पाणी मिळालेच पाहिजे. जिल्ह्यात कोठेही धरण बांधले जाणार असेल, तर स्थानिकांना पाणी मिळाले पाहिजे.- कपिल पाटील, खासदार, भाजपाठाणे जिल्हा हा पाण्याच्या दृष्टीने अतृप्त आहे. ही गोष्ट खरी आहे की, नाशिक आणि ठाण्याने मुंबई नव्हे तर महाराष्ट्राची तहान भागवली आहे. परंतु, ठाणे जिल्हा त्यादृष्टीने पाण्यासाठी नेहमीच उपाशी राहिलेला आहे. आता पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईची स्थितीनिर्माण झाली आहे. मागील २५ वर्षे धरण बांधणार म्हणून आश्वासन दिले जात आहे. परंतु, ते काही बांधले गेले नाही. २००३ साली जे धरण मी आणले, ते धरण शिवसेनेच्या टक्केवारीमुळे रद्द झाले. आजही ठाणे शहराला भीक मागून पाणी आणावे लागत आहे. करोडो रुपयांच्या योजना जाहीर होत आहेत. परंतु, पाण्यासाठी कोणतीच योजना आखली जात नाही. त्यामुळे गडकरी आणि मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, आधी ठाणे जिल्ह्याची तहान भागवा, मग हव्या त्या योजना आणा.- जितेंद्र आव्हाड,आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसमागील ६० वर्षे ठाणे जिल्हा हा मुंबईची तहान भागवत आहे. ठाण्यासाठी धरण असावे, म्हणून शाई आणि काळू धरणांसाठी प्रयत्न झाले. परंतु, तेथील रहिवाशांनी विरोध केल्याने धरण रखडलेले आहे. नगर आणि नाशिकला पाणी देण्यास काही हरकत नाही. परंतु, ते करतअसताना ठाणे जिल्ह्याची तहान आधी भागवणे गरजेचे आहे.- प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीShiv SenaशिवसेनाWaterपाणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस