शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

एलपीजी शवदाहिनी मोजतेय शेवटच्या घटका, पालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 3:07 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीत २०१० मध्ये सुरू केलेली एलपीजी शवदाहिनी सध्या देखभाल, दुरूस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहे.

- राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीत २०१० मध्ये सुरू केलेली एलपीजी शवदाहिनी सध्या देखभाल, दुरूस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहे. देखभाल, दुरूस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त करुनही तीची दुरवस्था कशी काय झाली, यावर संभ्रम निर्माण झाला आहे.पालिकेने ही शवदाहिनी बसविण्यासाठी ७० लाखांची तरतूद केली. सुरूवातीला ती भार्इंदर पश्चिमेकडील आंबेडकरनगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीत बसविण्यात आली. एकूण २४ एलपीजी सिलिंडरची क्षमता आहे. याा सिलिंडरवर किमान १८ तर कमाल २६ मृतांना अग्नी दिला जातो. एलपीजी शवदाहिनीचा वापर वाढल्याने पालिकेने त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी चिरंतर उद्योग या कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यासाठी कंत्राटदाराला दर महिन्याला ३० हजार दिले जातात. त्यामुळे शवदाहिनीची दुरूस्ती वेळेत व व्यवस्थित चालण्यायोग्य व्हावी, अशी अपेक्षा असतानाही त्याकडे कंत्राटदारासह प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागल्याने आजमितीस या शवदाहिनीची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेने कंत्राटदाराला देखभाल, दुरूस्तीसाठी दिलेली रक्कम गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना एकावेळी सर्व सिलिंडर एकावेळी सुरू करावे लागतात. त्यातून गॅसची गळती होऊ लागल्याने तेथील कर्मचाऱ्याने प्रशासनाला अनेकदा तक्रारी केल्याचे सांगण्यात येते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भविष्यात गॅस गळतीमुळे जिवीतहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या स्मशानाच्या बाजूला भोलानगर व डॉ. आंबेडकर झोपडपट्टी आहे. मृतदेह भट्टीत नेण्यासाठी बसविण्यात आलेली ट्रॉली अनेकदा मध्येच थांबत असल्याने कर्मचाºयांना ती लोखंडी रॉडने ढकलावी लागते. भट्टीतील विटांची दुरवस्था झाली असून खालील भागाला गळती लागली आहे. भट्टीत मृतदेह जळताना त्यातील द्रवपदार्थ बाहेर पडत असल्याचे कर्मचाºयांकडून सांगण्यात येते. त्यामुळे दुरवस्था झालेली एलपीजी शवदाहिनीची त्वरित दुरूस्ती, ते शक्य नसल्यास बंद करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.सिलिंडरचे रेग्युलेटर बदलण्यात आले आहेत. उर्वरित नादुरुस्त भागांची दुरूस्तीचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.- दीपक खांबित, कार्यकारी अभियंतापालिकेच्या भ्रष्ट कारभाराकडे सत्ताधाºयांचाही कानाडोळा होत असल्यानेच एलपीजी शवदाहिनीची दुरवस्था झाली आहे. तीची दुरूस्ती त्वरित व्हावी, अशी अपेक्षा असून अन्यथा काँग्रेस जनआंदोलन छेडेल.- अनिल सावंत, काँग्रेस नगरसेवकअंत्यसंस्कारावेळी स्मशानात गेलो असता एलपीजी शवदाहिनीची दुरवस्था निदर्शनास आली. त्याची कल्पना प्रशासनाला दिल्यानंतरही कार्यवाही झाली नाही. अशा पायाभूत सुविधांकडेच दुर्लक्ष होऊ लागल्यास नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची.- अनिल नोटियाल, समाजसेवक

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक