शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

केडीएमसीत साडेपाच हजार जणांची कमतरता : भरतीचा प्रस्ताव सरकार दरबारी धूळखात पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 01:09 IST

एक हजार लोकांच्या मागे पाच सफाई कामगार हवेत हे प्रमाण लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील १५ लाख लोकसंख्येकरिता सात हजार ५०० सफाई कामगार हवे आहेत.

कल्याण : एक हजार लोकांच्या मागे पाच सफाई कामगार हवेत हे प्रमाण लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील १५ लाख लोकसंख्येकरिता सात हजार ५०० सफाई कामगार हवे आहेत. प्रत्यक्षात महापालिका क्षेत्रात एक हजार ८६६ सफाई स्वच्छतेचे काम करीत आहेत. तात्पर्य, महापालिकेस आणखीन पाच हजार ५०० सफाई कामगारांची आवश्यकता आहे. सफाई कामगारांची भरती करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारच्या दरबारी धूळ खात पडला आहे.महापालिका हद्दीत १५ लाख लोकसंख्या आहे. शहरात ६५० मेट्रीक टन कचरा गोळा होता. हा कचरा उचलणे, झाडणे, तो कचरा कुंडीत गोळा करणे ही कामे महापालिकेच्या सफाई कामगारांकडून केली जातात. शहर स्वच्छतेची मदार या कामगारावर असते. महापालिकेच्या सफाई खात्यात एक हजार ८६६ कामगार कार्यरत आहेत. संख्या कमी असल्याने या कामगारांवर कामाचा ताण पडत आहे. शहरातील स्वच्छेतेचे अनेकवेळा वाभाडे निघाले आहेत. शहर स्वच्छतेच्या सर्वेक्षणात महापालिकेचा क्रमांक अजून बराच खाली आहे.महापालिकेने एकूण दहा प्रभाग क्षेत्रापैकी चार प्रभाग क्षेत्रातील कचरा उचलण्याचे काम खाजगी कंत्राटदार कंपनी आर अ‍ॅण्ड डी यांना दिले आहे. या कंपनीच्या कामाविषयी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीकडून योग्य प्रकारे काम केले जात नाही. तसेच कचऱ्याचे खाजगीकरण झालेल्या प्रभागातील सफाई कामगार अन्य प्रभागात वर्ग करण्यात आलेले नाहीत. अन्य सहा प्रभाग क्षेत्र कार्यालयात स्वच्छतेचे काम सफाई कामगारांकडूनच केले जात आहे. महापालिकेच्या हद्दीत लोकसंख्येनुसार सात हजार ५०० सफाई कामगारांची आवश्यकता आहे. सध्या उपलब्ध सफाई कामगारांकडून पुरेशा क्षमतेने काम करुन घेता येत नाही. त्यांना दोन शिफ्टमध्ये काम दिले जाते. मात्र कामगारांच्या गैरहजेरीचे प्रमाण जास्त असल्याने सगळ््याच कामगारांचा सफाईकरिता उपयोग होत नाही. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून दोन हजार ५०० सफाई कामगारांची भरती केली जावी, असा प्रस्ताव तयार करुन तो राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर सरकारने विचार केलेला नाही. दरम्यानच्या काळात महापालिकेच्या घनकचरा विभागाने ३८० कामगार कंत्राटी पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने विरोध केला होता. त्याच्या विरोधात ‘झाडू आंदोलन’ व ‘काम बंद’ आंदोलनही केले होते. त्यानंतरही सरकारने सफाई कामगारांची भरती केलेली नाही.पावसामुळे स्वच्छतेवर पडतोय ताणसतत पडणाºया पावसात महापालिकेच्या सफाई कामगारांवर कचरा उचलण्याचा व स्वच्छतेचा ताण आहे. असे असतानाही महापालिकेने कुठेही कचरा साचू दिला नाही. अन्यथा पावसाळ््यात साथीचे रोग झपाट्याने पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे वेळीच कचरा उचलण्यावर भर दिल्याचा दावा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आला. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास शहरात शून्य कचरा मोहीम राबवणे शक्य होऊ शकते, याकडे घनकचरा व्यवस्थापनाने लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका