शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

राजा, प्रजेच्या खानपान सेवेत तफावत; नगरसेवक-अधिकाऱ्यांसाठी १५० रुपयांची थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 00:40 IST

कोरोनाग्रस्तांना दोनवेळचे जेवण, नाश्ता, चहासाठी फक्त १५१ रुपये

- धीरज परब मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेतील नगरसेवक आणि अधिकारी महासभा, समित्या यांच्या बैठकांना हजेरी लावतात, तेव्हा एकवेळच्या जेवणाच्या थाळीचा दर १५० रुपये असतो. मात्र, महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील रुग्णांना दिले जाणारे दोन्ही वेळचे जेवण, नाश्ता, चहा-बिस्कीट यावर मिळून महापालिका १५१ रुपये खर्च करीत आहे. यावरून, लोकप्रतिनिधी आपल्या पोटाचा प्रश्न येतो, तेव्हा करदात्या जनतेच्या पैशांतून ऐश करतात. परंतु, नागरिकांना जेव्हा सुविधा द्यायची वेळ येते, तेव्हा हात आखडता घेतात, हेच सिद्ध झाले आहे. 

अनागोंदी, दुर्लक्ष व पैसे देण्यास टाळाटाळ आदी कारणांनी कोविड रुग्णालये, कोविड केअर व अलगीकरण कक्षांतील शेकडो कोरोनाग्रस्त नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम सुरू असल्याचे भयाण वास्तव निदर्शनास आले आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदरच्या पं. भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्यांना उपचारासाठी दाखल केलेले आहे. तेथील रुग्णांना आ. गीता जैन यांच्या माध्यमातून विनामूल्य जेवण, नाश्ता आदी पुरवले जायचे. हे जेवण, नाश्ता डॉक्टर व आहारतज्ज्ञांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे बनवून दिले जायचे. त्यासाठी जवळच्याच हॉटेलच्या भागीदारांनी स्वत:चे किचन, कर्मचारी उपलब्ध केले.

सामाजिक भावनेने हे कार्य सुरू असताना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने स्वखर्चातून ही सुविधा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हॉटेलच्या चालकांना पैसे अदा करून जेवण पुरवा, असे सांगण्यात आले. जूनपासून दर ठरवून रुग्णांना जेवण पुरवण्याचे काम केले जात असताना पालिकेकडून मात्र बिलाची रक्कम अदा करण्यात चालढकल सुरू झाली. मोफत किती पुरवणार म्हणून शेवटी एक दिवस रुग्णांना सकाळचा नाश्ता देणे अशक्य झाले. परंतु, नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांना याचे काही सोयरसुतक नाही.भार्इंदर येथेच पालिकेने सुरू केलेल्या अलगीकरण कक्षातील नागरिकांना सुरुवातीच्या महिनाभर ‘फाइट फॉर राइट’चे राजू विश्वकर्मा आणि सहकाºयांनी मोफत जेवण, नाश्ता पुरवला.

परंतु, वाढत्या रुग्णसंख्येमुळे संस्थेने असमर्थता दर्शवल्यावर पालिकेने संस्थेच्या पदाधिकाºयांना बोलावून काम बंद करू नका, पालिका पैसे देईल, असे सांगितले. त्यानुसार, १५ मेनंतर ‘जीवन ज्योत’ संस्थेमार्फत अलगीकरण केंद्र व नंतर कोविड केअर केंद्र येथील रुग्ण व क्वारंटाइन लोकांना जेवण दिले जाऊ लागले. यासाठी दरमाणसी १५१ रुपये संस्थेला दिले जातात. तेही पंधरापंधरा दिवस मिळत नाहीत. या रकमेत दोनवेळचे जेवण, सकाळचा नाश्ता, चहा, सायंकाळी चहा बिस्किटे दिली जातात. एखाद्या रुग्णाने दूध मागितल्यास ते दिले जाते.

जेवण बनवण्यासाठी पालिकेने अलगीकरण कक्षाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर जागा दिली आहे. जेवण वितरणाची जबाबदारी स्वच्छतेसाठी नियुक्त ठेक्याचे कामगार करतात. अलगीकरण व कोविड केअरमध्ये जेवणाच्या तक्रारी जुलै महिन्यापासून अधिक आल्या. जेवण-नाश्ता वेळेवर मिळत नाही. अन्नाला चव नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत.

ताळमेळ नसल्याने गैरसोय

रोज किती रुग्ण व क्वारंटाइन लोक दाखल होणार व किती घरी जाणार, याचा ताळमेळ नसल्याने अचानक २००-३०० माणसे वाढली की, त्यांना जेवण बनवून देण्यास वेळ लागतो. पालिकेच्या अधिकाºयांनी लक्ष ठेवणे, जेवण-नाश्त्याची चव पाहणे आणि वितरणावर लक्ष देणे गरजेचे आहे. नगरसेवक-अधिकाºयांना महासभा, समित्यांच्या बैठकांवेळी एकवेळच्या थाळीकरिता महापालिका १५० रुपये खर्च करते. कोरोनाग्रस्त नागरिकांचे दोनवेळचे जेवण, नाश्ता, दोनवेळचा चहा, बिस्किटे यावर अवघे १५१ रुपये खर्च केले जात आहेत. राजा व प्रजा यांच्या खानपान सेवेतील ही तफावत हेच बेचव जेवणाचे मुख्य कारण आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर