शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

केडीएमसीचे चार वर्षांत १२५ कोटी ‘खड्ड्यांत’, रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 1:47 AM

कल्याण-डोंबिवली परिसरांत अतिवृष्टीमुळे सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरांत अतिवृष्टीमुळे सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे. मागील चार वर्षांत खड्डे बुजवण्यावर महापालिकेने किमान १२५ कोटी रुपये खर्च केले आहेत. तरीही, रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. त्यामुळे हा निधी वाया गेल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी सांगितले की, महापालिकेची निवडणूक २०१५ मध्ये झाली. त्यानंतर, चार वर्षांत महापालिकेच्या अर्थसंकल्पात खड्डे बुजवण्यासाठी केलेल्या आर्थिक तरतुदींवर नजर टाकल्यास १२५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.तरीही, रस्त्यांची अवस्था बिकट आहे. यंदाच्या वर्षी जोरदार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले असून, रस्ते वाहून गेल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिका खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते. या निधीतून वर्षभरात खड्डे बुजवण्याचे काम केले जाते. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करूनही खड्डे योग्य प्रकारे बुजवले जात नाहीत. खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट होत असल्याने ते टिकत नाही. एखादा रस्ता तयार केल्यावर त्याची देखभाल दुरुस्ती व त्यावर खड्डा पडणार नाही, यासाठी कंत्राटदाराकडून तीन वर्षे हमीपत्र घेतले पाहिजे. चार वर्षांपूर्वी महापालिकेने तशी तजवीज केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशी स्थिती उद्भवली आहे.मागच्या वर्षी कल्याण शहरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनांनंतर महापालिकेने १३ कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी तातडीने मंजूर केले होते. मागच्या वर्षी मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी ३० कोटींची तरतूद सरकारने केली होती. मात्र, महापालिकेने महापालिका हद्दीतील खड्डे बुजविण्यासाठी १३ कोटींची तरतूद केल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. २००९ मध्ये महापालिकेस महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार करण्यासाठी ४०१ कोटी रुपये दोन टप्प्यांत मंजूर केले होते. त्यानंतर, महापालिकेने महापालिकेच्या निधीतून ४३ रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम घेतले. त्यानंतर, आजही बहुतांश रस्ते हे डांबरी आहेत. त्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतल्यास खड्डे बुजवण्यावर होणारा खर्च कमी होऊ शकतो. खड्डे पडू नयेत, यासाठी महापालिकेने यापूर्वी आॅस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर केला होता. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही.दर्जेदार काम करण्याची गरजमहापालिका हद्दीत जास्त पाऊस पडत असल्याने खड्डे पडतात, असे कारण महापालिकेकडून पुढे केले जाते. मात्र, खड्डे बुजवण्याचे काम दर्जेदार केल्यास खड्डेच पडणार नाही. त्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. कंत्राटदारावर वचक नसतो. त्यामुळे खड्ड्यांचा सामना सामान्य प्रवासी, नागरिक आणि वाहनचालकांना करावा लागतो, याकडे हळबे यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाPotholeखड्डे