शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

कल्याण - मुंबई प्रवास ११ तासांचा, गार्ड गोरख पाटील यांचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 11:46 PM

रविवारी रात्री झालेल्या पावसाने सोमवारी दिवसभर चाकरमान्यांना एकतर लोकलमध्ये कैद केले किंवा रेल्वे मार्गातून तीन ते चार तास पायपीट करण्यास भाग पाडले.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : सोमवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकातून ११.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली कसारा जलद लोकल मंगळवारी सकाळी १०.४० वाजता आपल्या नियोजित स्थळी तब्बल ११ तासानंतर पोहोचली. त्या लोकलचे गार्ड गोरख पाटील, मोटारमन आणि मोजकेच ३०० प्रवासी यांनी संपूर्ण रात्र कांजूरमार्ग ते माटुंगा दरम्यान रुळावर साचलेल्या पाच फूट पाण्यातून कूर्मगतीने प्रवास करीत काढली.रविवारी रात्री झालेल्या पावसाने सोमवारी दिवसभर चाकरमान्यांना एकतर लोकलमध्ये कैद केले किंवा रेल्वे मार्गातून तीन ते चार तास पायपीट करण्यास भाग पाडले. सोमवारी रात्री पुन्हा सुरु झालेल्या मुसळधार पावसाने लोकल सेवेची दाणादाण उडवली. जलद लोकलने कल्याण ते सीएसएमटी प्रवासासाठी एरव्ही एक ते सव्वा तास लागतो. पण कांजुरमार्ग, सायन मार्गावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या कल्याण ते सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या जलद लोकलला हे अंतर कापण्याकरिता तब्बल ११ तास लागले. या लोकलचे गार्ड गोरख पाटील यांनी सांगितले की, भांडूप ते कांजूर, घाटकोपर प्रवासासाठी दोन तास आणि पुढे घाटकोपर ते सायन प्रवासाठी पाच तास लागले. सोमवारची रात्र अजिबात विसरू शकत नाही. ११ तासांचा न संपणारा, कंटाळवाणा, जीवघेणा प्रवास कधीच विसरता येणार नाही. पाटील सोमवारी संध्याकाळी सीएसएमटी येथून ६.२५ वाजताची कसारा लोकल घेऊन कसारा स्थानकात रात्री ८.३० वाजता पोहोचले. त्यानंतर रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी ते लोकल घेऊन सीएसएमटीकडे निघाले. लोकल पावणे बाराच्या सुमारास कल्याणपर्यंत आली, परंतु त्यानंतर लोकल सर्वत्र रखडली. कल्याण ते ठाणे प्रवासासाठी रात्रीचे १२.२५ वाजले. मुलुंडनंतर लोकलच्या रांगा लागल्या होत्या. कासवगतीने लोकल पुढे सरकत होती, अर्धाअर्धा तास एका ठिकाणी उभी राहत होती. सतत हॉर्न दे, बेल दे यामुळे हातपाय दुखायला लागले होते. भांडुप ते घाटकोपर हे अंतर कापण्याकरिता मध्यरात्रीचे २.३५ वाजले. घाटकोपर स्थानकातून पहाटे ४.५० वाजता निघालेली लोकल सायन स्थानकात पोहोचायला सकाळचे १० वाजले होते. कांजुरमार्ग ते सायन हा अवघा १० ते १५ मिनिटांचा प्रवास पण पाणी रुळांवर साचल्याने ७ तास २५ मिनिटांचा वेळ लागला.आजुबाजूला प्रचंड पाणी, रात्रीचा मिट्ट अंधार अशा वातावरणात गार्ड केबिनमध्ये बसून रात्र काढावी लागली. त्या पाण्याच्या प्रवाहातून रात्रभर लोकल कशी चालवली असेल याची कल्पनाच करवत नाही, असे ते म्हणाले. सकाळ झाली, पुन्हा स्थानकावर नव्या दमाने नोकरीला जाण्याकरिता आलेल्यांची गर्दी झाली. आम्ही डोळ््याला डोळा न लावता रात्र पावसाच्या पूरात काढल्याची त्यांना कल्पनाही नसेल. अखेर सकाळी १० वाजता सायन स्थानक सोडले आणि लोकल १० वाजून ४० मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात पोहोचल्यानंतर पाटील यांची ड्युटी संपली.घडले माणुसकीचे दर्शनया कठीण प्रसंगातही घाटकोपर, कांजुर, सायन भागामध्ये जेथे लोकल थांबल्या त्या सर्व ठिकाणी आजूबाजूच्या मोजक्याच नागरिकांनी आस्थेने विचारपूस केली. काहींनी चहा, बिस्किटांची सोय केली. केवळ आम्हीच नाही तर अनेक स्थानकात अडकून पडलेल्यांची रात्र पावसा-पाण्यात गेली. पाटील यांनीही त्यांच्याजवळील खाद्यपदार्थ सहप्रवाशांना दिले.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसMumbai Localमुंबई लोकल