शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

'शरीराला सोसेल एवढाच आहार घ्यावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 02:46 IST

अमित डांगे यांनी दिला सल्ला; आरोग्यविषयक व्याख्यानमाला

डोंबिवली : आहार किती आणि कसा घ्यावा, यावरून आहारतज्ज्ञांमध्येच अनेक मतप्रवाह दिसून येतात. काही दोन वेळा खाण्याचा सल्ला देतात, तर काही थोड्याथोड्या वेळाने खा, असे सांगतात. त्यामुळे कोणती आहारपद्धती अवलंबावी, याबाबत सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. मात्र, प्रत्येकाने शरीरप्रकृतीनुसार आपल्याला सोसेल एवढाच आहार घेतल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते उपकारक ठरेल, असा सल्ला डॉ. अमित डांगे यांनी दिला.एका रुग्णालयातर्फे शनिवारी सर्वेश सभागृहात ‘आरोग्य हिताय आरोग्य सुखाय’ याअंतर्गत झालेल्या व्याख्यानमालेत ‘मला बारीक व्हायचंय’ या विषयावर डॉ. डांगे बोलत होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. चिंतन सांगाणी यांनी ‘मधुमेह बरा होतो का’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.डॉ. डांगे म्हणाले की, शरीरप्रकृती ही वात, कफ, पित्त प्रवृत्तीने बनलेली असते. त्यामुळे शरीरप्रकृती जाणून प्रत्येकाने आपला आहार ठेवायला हवा. कफप्रकृतीच्या व्यक्तींनी दिवसातून दोनदाच खावे, तर ज्यांना कधी भूक लागते, कधी लागत नाही, अशा व्यक्तींनी दोन ते तीन वेळा खाण्यास हरकत नाही. दुधातून आंबा वगळता दुसरे कोणतेच फळ खाऊ नये. आहार नियंत्रण होत नाही, तोपर्यंत वजन कमी होणार नाही. आहारात कर्बोदके आणि प्रोटीनचा वापर जास्त करावा. आपण ज्या प्रदेशात राहतो, त्या पद्धतीचाच आहार ठेवावा. आपण खात असलेल्या पदार्थांमध्ये किती कॅलरी आहेत, त्यांचा विचार करावा. वडापाव, पोहे, उपमा यात ज्वारी आणि नाचणीपेक्षा जास्त कॅलरी असतात. त्यामुळे भाकरी खाणे केव्हाही उत्तम असते. कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांना जास्त प्राधान्य द्यावे. दररोज सायकल चालवावी. त्यासारखा दुसरा चांगला व्यायाम नाही, असे ते म्हणाले....तर इन्सुलिनचा तुटवडा जाणवेल!डॉ. सांगाणी म्हणाले की, २०३० मध्ये आठ कोटी लोकांना इन्सुलिनची गरज भासून इन्सुलिनचा तुटवडा जाणवेल. त्यामुळे हा आकडा कमी करण्यावर भर हवा. केवळ साखर न खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित होत नाही. आम्लपदार्थ म्हणजेच सॉस, पाणीपुरी यामुळेही मधुमेह बळावतो. लोकांना वाटते की, आम्ही साखर किंवा गोड पदार्थ खात नाही, तरीही मधुमेह नियंत्रणात का राहत नाही. आहारात मीठ जास्त वापरले, तरी मधुमेह वाढतो. पनीर, चीज हे पदार्थही मधुमेही व्यक्तींनी टाळावेत, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य