शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'शरीराला सोसेल एवढाच आहार घ्यावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 02:46 IST

अमित डांगे यांनी दिला सल्ला; आरोग्यविषयक व्याख्यानमाला

डोंबिवली : आहार किती आणि कसा घ्यावा, यावरून आहारतज्ज्ञांमध्येच अनेक मतप्रवाह दिसून येतात. काही दोन वेळा खाण्याचा सल्ला देतात, तर काही थोड्याथोड्या वेळाने खा, असे सांगतात. त्यामुळे कोणती आहारपद्धती अवलंबावी, याबाबत सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. मात्र, प्रत्येकाने शरीरप्रकृतीनुसार आपल्याला सोसेल एवढाच आहार घेतल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते उपकारक ठरेल, असा सल्ला डॉ. अमित डांगे यांनी दिला.एका रुग्णालयातर्फे शनिवारी सर्वेश सभागृहात ‘आरोग्य हिताय आरोग्य सुखाय’ याअंतर्गत झालेल्या व्याख्यानमालेत ‘मला बारीक व्हायचंय’ या विषयावर डॉ. डांगे बोलत होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. चिंतन सांगाणी यांनी ‘मधुमेह बरा होतो का’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.डॉ. डांगे म्हणाले की, शरीरप्रकृती ही वात, कफ, पित्त प्रवृत्तीने बनलेली असते. त्यामुळे शरीरप्रकृती जाणून प्रत्येकाने आपला आहार ठेवायला हवा. कफप्रकृतीच्या व्यक्तींनी दिवसातून दोनदाच खावे, तर ज्यांना कधी भूक लागते, कधी लागत नाही, अशा व्यक्तींनी दोन ते तीन वेळा खाण्यास हरकत नाही. दुधातून आंबा वगळता दुसरे कोणतेच फळ खाऊ नये. आहार नियंत्रण होत नाही, तोपर्यंत वजन कमी होणार नाही. आहारात कर्बोदके आणि प्रोटीनचा वापर जास्त करावा. आपण ज्या प्रदेशात राहतो, त्या पद्धतीचाच आहार ठेवावा. आपण खात असलेल्या पदार्थांमध्ये किती कॅलरी आहेत, त्यांचा विचार करावा. वडापाव, पोहे, उपमा यात ज्वारी आणि नाचणीपेक्षा जास्त कॅलरी असतात. त्यामुळे भाकरी खाणे केव्हाही उत्तम असते. कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांना जास्त प्राधान्य द्यावे. दररोज सायकल चालवावी. त्यासारखा दुसरा चांगला व्यायाम नाही, असे ते म्हणाले....तर इन्सुलिनचा तुटवडा जाणवेल!डॉ. सांगाणी म्हणाले की, २०३० मध्ये आठ कोटी लोकांना इन्सुलिनची गरज भासून इन्सुलिनचा तुटवडा जाणवेल. त्यामुळे हा आकडा कमी करण्यावर भर हवा. केवळ साखर न खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित होत नाही. आम्लपदार्थ म्हणजेच सॉस, पाणीपुरी यामुळेही मधुमेह बळावतो. लोकांना वाटते की, आम्ही साखर किंवा गोड पदार्थ खात नाही, तरीही मधुमेह नियंत्रणात का राहत नाही. आहारात मीठ जास्त वापरले, तरी मधुमेह वाढतो. पनीर, चीज हे पदार्थही मधुमेही व्यक्तींनी टाळावेत, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य