शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

केडीएमसीकडून होतेय पाणीबिलाची सरसकट वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 2:32 AM

केडीएमसीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा गाजावाजा केला असला तरी महापालिका हद्दीतील एक लाख २० हजार नळजोडणीधारकांपैकी केवळ २६ हजार नळजोडणीधारकांना मीटरप्रमाणे पाणी बिले दिली जात आहेत.

कल्याण - केडीएमसीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा गाजावाजा केला असला तरी महापालिका हद्दीतील एक लाख २० हजार नळजोडणीधारकांपैकी केवळ २६ हजार नळजोडणीधारकांना मीटरप्रमाणे पाणी बिले दिली जात आहेत. तर, उर्वरित ७५ टक्के नळजोडणीधारकांकडून केवळ सरसरी पद्धतीने बिले आकारली जात आहेत. त्यामुळे पाणी वापराची योग्य मोजमाप तसेच पाणीबिलाची योग्य वसुली होत नसल्याचे उघडकीस आले आहे.महापालिकेने नळजोडण्यांवर पाणीमीटर बसविण्याचे काम हाती घेतले होते. त्यापैकी ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. एक लाख २० हजार नळजोडण्यांपैकी जवळपास ८० हजार नळ जोडणीधारकांना मीटर बसविले आहे. त्यापैकी केवळ २६ हजार नळजोडणीधारकांना मीटरप्रमाणे पाणीबिल दिले जाते.उर्वरित नळजोडणीधारकांना मीटर लावूनही त्याप्रमाणे पाणीबिले का पाठविली जात नाहीत, याविषयी पाणीपुरवठा विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे पाणीबिलाच्या वसुलीचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. तो मागील वर्षी मांडण्यात आला. दरम्यान आयुक्त बदलेले गेले. त्यामुळे हा प्रस्तावही बारगळला. आमच्या विभागाला मनुष्यबळ हवे असून, ते पुरवले जात नाही. या खात्यातील रिक्त पदे भरा, अशी मागणी करूनही त्याकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. खाजगी कंपनीने महापालिकेस पाणीबिलाची ६० कोटी रुपयांची वसुली करून द्यावी, असा हा प्रस्ताव होता. तर, ६० कोटी रुपयांपेक्षा त्यात वाढ करावी, अशी नगरसेवकांची सूचना होती.स्मार्ट सिटी प्रकल्पात स्मार्ट सेवा , सुविधा पुरविणे हा भाग अंतर्भूत आहे. त्याचबरोबर महापालिकेचा ई-गव्हर्नन्स प्रकल्प हा राज्यात आदर्श ठरला आहे. महापालिकेने ७५ टक्के नळजोडणीधारकांकडून मीटरप्रमाणे बिले घेण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्यास काय हरकत आहे. त्यात अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दाच उद्भवत नाही. महापालिका कोट्यवधी रुपये संगणक विभागावर खर्च करते. त्याचा महापालिकेस काय उपयोग होतो, हा सवाल यातून उपस्थित केला जात आहे.२० हजार बेकायदा नळजोडण्या?बेकायदा नळजोडण्यांचाही मुद्दा महापालिका हद्दीत गाजत आहे. अशा नळजोडण्यांची संख्या जवळपास २० हजार असण्याची शक्यता आहे.महापालिकेने मालमत्ता सर्वेक्षणाचे काम कोलब्रो कंपनीला दिले होते. या कंपनीने केवळ ६५६ बेकायदा नळजोडण्यांचा शोध घेतला होता. या सर्वेक्षणाविषयी सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.त्याचबरोबर डोंबिवली शहरातील अनेक सोसाट्यांमधील पाणीमीटर चोरीला गेली होती. त्यामुळे अशा सोसायट्यांनाही सरसकट पाणीबिल पाठवले जात आहे. तेथील पाणीवापराची नोंदच होत नाही.

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या