शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

लग्नाच्या वाढदिवसादिनी ठाण्यातील जोशी दाम्पत्याचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 23, 2020 4:06 PM

ठाण्यातील जोशी दाम्पत्या मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देठाण्यातील जोशी दाम्पत्य करणार मरणोत्तर नेत्रदानइतरांमध्येही करत आहेत जनजगरुतीलग्नाच्या 14 व्या वाढदिवसादिनी केला संकल्प

ठाणे : लहान असताना दृष्टिहीन मुलांना मिळणारी वागणूक मनाला बोचली होती. या मुलांना डोळे असते तर त्यांनी आपल्यासारखेच जग पाहिले असते आणि त्यांना कोणी हिणवले देखील नसते. त्यातूनच नेत्रदान करण्याचा मनात विचार आला. नेत्रदान करायचे हे मनाशी पक्के केले आणि लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत ठाण्यातील जोशी दाम्पत्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला.            ठाण्यात लुईस वाडी येथे राहणारे तुषार जोशी आणि तनुश्री जोशी या दाम्पत्यांनी आपल्या लग्नाच्या 14 व्या वाढदिवसानिमित्त मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. तनुश्री या लहान असताना त्यांच्या परिसरात राहणाऱ्या दृष्टिहीन मुलाला त्याच्या मित्राकडून होणारी टिंगल पाहिली होती. खेळत असताना त्या मुलाला त्याचे मित्र तो बरोबर असताना तो चुकीचा असल्याचे दाखवत. तो दृष्टिहीन असल्याने त्याला ती मुले चिडवत असत. हे पाहून तनुश्री याना प्रचंड वाईट वाटले होते. एकेवेळी ट्रेन मधून प्रवास करताना दृष्टीहीन मुलगी आणि तिची दृष्टिहीन आई त्यांच्या नजरेस पडली. त्यावेळी  त्या मुलीची आई नवीन 50 रुपयांची न कशी ओळखायची हे त्या मुलीला शिकवत होती आणि मुलीला ते ओळखणे जड जात होते अशा अनेक घटना मनाला टोचत असल्याने पती तुषार यांच्याशी चर्चा करून या दोघांनीही मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. नेत्र ही देवाची देणगी आहे आपण एका दृष्टिहीन व्यक्तीला नेत्रदान केले तर ती व्यक्ती उर्वरित आयुष्य नव्याने जगू शकते म्हणूनच हा संकल्प केला आणि इतरांनीही तो करावा असे जोशी दाम्पत्यांनी सांगितले. नेत्रदान विषयी अनेक शंका तनुश्री यांच्या मनात होत्या त्या सर्व शंकांचे निरसन नेत्रदान प्रतिष्ठानच्या समन्वयक - समुपदेशक अश्विनी जोशी यांनी केले. नेत्रदान केल्यावर आपले नेत्र दृष्टिहीन व्यक्तीलाच मिळतात का ? नेत्रदान केल्यावर त्याची माहिती संपूर्ण कुटुंबाला मिळते का असे प्रश्न मला होते आणि त्याची समाधानकारक उत्तरे मिळल्यावरच आम्ही दोघांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला. लग्नाच्या वाढदिवस हा संकल्प करूनच साजरा केला. तसेच यानिमितातने कापूरबावडी येथील गोर गरिबांना सकाळ आणि संध्याकाळी जाऊन जेवण ही दिले असल्याचे तुषार यांनी सांगितले. हे दाम्पत्य आता इतरांनीही नेत्रदानासाठी पुढे यावे यासाठी जनजागृती करीत आहे. देहदनाविषयी योग्य मार्गदर्शन मिळाले तर देहदानही करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नेत्रदानाचा ऑनलाइन अर्ज हे दाम्पत्य भरणार आहेत. हा संकल्प माझ्या 12 वर्षाच्या मुलीला सांगितलं तेव्हा ती खूप खुश झाली. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे असे ती म्हणल्याचे तनुश्री यांनी सांगितले. नेत्रदानविषयी जनजागृती होत असली तरी हव्या तेवढ्या प्रमाणात लोक पुढे येत नाही. आज कित्येक दृष्टिहीन मुले डोळे मिळण्याची वाट पाहत आहेत अशी खंत जोशी यांनी व्यक्त केली. ज्यांना नेत्रदान करायचे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन ही त्यांनी केले.  नेत्रदानाचा संकल्प केल्याची माहिती सोशल मीडियावर टाकल्यानंतर या दाम्पत्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र