शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

संविधान जाळण्याचा प्रकार सरकारच्या आशीर्वादानेच, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 14:52 IST

 'संविधान के सन्मान मे हम उतरेंगे मैदान मे' संपूर्ण भारतभर आंदोलन छेडण्याची आव्हाड यांची घोषणा

ठाणे - मराठा आरक्षणाचा बागुलबुवा करत जंतरमंतरवर संविधान जाळण्याचा झालेला प्रकार हा सरकारच्या आशीर्वादानेच झाला असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. संविधान जाळणाऱ्यांच्या  विरोधात हे सरकार देशद्रोहाचा गुन्हा करत नसल्याने सरकारचा काही समझोता तर नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहत नसल्याचे आव्हान यांनी सांगितले. या देशात सर्वकाही बदलेल मात्र संविधान बदलू देणार नाही अशी घोषणा करत येत्या काही दिवसात संविधान प्रेमी असलेले आणि पुरोगामी विचारांचे हजारो तरुण रस्त्यावर उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितले. 'संविधान के सन्मान में हम उतरंगे मैदान में' असा भारतभर कार्यक्रम राबवण्याची घोषणा देखील आव्हाड यांनी केली असून समविचारी संघटनेबरोबर आपली बोलणी सुरु असल्याची माहिती ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड यांनी दिली आहे. तर दुसरीकडे नालासोपाऱ्यात सापडलेली स्फोटाके ही दिवाळीमध्ये वाजवण्यासाठी आणण्यात आली होती का असा टोला लगावत यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण तापले असताना जंतरमंतर या ठिकाणी काही विशिष्ट घटकांकडून संविधान जाळण्याचा प्रकार झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या भूमिकेविषयीच शंका उपस्थित केली आहे. या देशात पुन्हा मनुस्मृतीचे नियम लादण्यात येत आहे. संविधान जाळल्यामुळे हा १२० कोटी जनतेचा अपमान असून संपूर्ण भारतामध्ये याचे तीव्र प्रतिसाद उमटतील असे आव्हाड यांनी सांगितले. आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून काही लोकांना संविधान नको आहे त्यामुळेच संविधान जाळण्याचे प्रकार होत असून अशा लोकांवर सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नसून सरकारचे बगलबच्चेच हा प्रकार करत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

नालासोपाऱ्यात जी स्फोटके सापडली आहेत ती काही दिवाळीमध्ये फोडण्यासाठी आणली होती का असा उपहासात्मक टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. ही स्फोटके मराठा आंदोलनामध्ये फोडायची होती किंवा अन्य ठिकाणी जरी फोडण्याचा डाव असला तरी ही देशविघातक कृत्य असून सरकार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नसल्याने सरकारचाच छुपा समझोता आहे की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्याचा प्रकार झाला असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस