शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

संविधान जाळण्याचा प्रकार सरकारच्या आशीर्वादानेच, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 14:52 IST

 'संविधान के सन्मान मे हम उतरेंगे मैदान मे' संपूर्ण भारतभर आंदोलन छेडण्याची आव्हाड यांची घोषणा

ठाणे - मराठा आरक्षणाचा बागुलबुवा करत जंतरमंतरवर संविधान जाळण्याचा झालेला प्रकार हा सरकारच्या आशीर्वादानेच झाला असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. संविधान जाळणाऱ्यांच्या  विरोधात हे सरकार देशद्रोहाचा गुन्हा करत नसल्याने सरकारचा काही समझोता तर नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहत नसल्याचे आव्हान यांनी सांगितले. या देशात सर्वकाही बदलेल मात्र संविधान बदलू देणार नाही अशी घोषणा करत येत्या काही दिवसात संविधान प्रेमी असलेले आणि पुरोगामी विचारांचे हजारो तरुण रस्त्यावर उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितले. 'संविधान के सन्मान में हम उतरंगे मैदान में' असा भारतभर कार्यक्रम राबवण्याची घोषणा देखील आव्हाड यांनी केली असून समविचारी संघटनेबरोबर आपली बोलणी सुरु असल्याची माहिती ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड यांनी दिली आहे. तर दुसरीकडे नालासोपाऱ्यात सापडलेली स्फोटाके ही दिवाळीमध्ये वाजवण्यासाठी आणण्यात आली होती का असा टोला लगावत यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण तापले असताना जंतरमंतर या ठिकाणी काही विशिष्ट घटकांकडून संविधान जाळण्याचा प्रकार झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या भूमिकेविषयीच शंका उपस्थित केली आहे. या देशात पुन्हा मनुस्मृतीचे नियम लादण्यात येत आहे. संविधान जाळल्यामुळे हा १२० कोटी जनतेचा अपमान असून संपूर्ण भारतामध्ये याचे तीव्र प्रतिसाद उमटतील असे आव्हाड यांनी सांगितले. आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून काही लोकांना संविधान नको आहे त्यामुळेच संविधान जाळण्याचे प्रकार होत असून अशा लोकांवर सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नसून सरकारचे बगलबच्चेच हा प्रकार करत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

नालासोपाऱ्यात जी स्फोटके सापडली आहेत ती काही दिवाळीमध्ये फोडण्यासाठी आणली होती का असा उपहासात्मक टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. ही स्फोटके मराठा आंदोलनामध्ये फोडायची होती किंवा अन्य ठिकाणी जरी फोडण्याचा डाव असला तरी ही देशविघातक कृत्य असून सरकार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नसल्याने सरकारचाच छुपा समझोता आहे की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्याचा प्रकार झाला असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस