शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

संविधान जाळण्याचा प्रकार सरकारच्या आशीर्वादानेच, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 14:52 IST

 'संविधान के सन्मान मे हम उतरेंगे मैदान मे' संपूर्ण भारतभर आंदोलन छेडण्याची आव्हाड यांची घोषणा

ठाणे - मराठा आरक्षणाचा बागुलबुवा करत जंतरमंतरवर संविधान जाळण्याचा झालेला प्रकार हा सरकारच्या आशीर्वादानेच झाला असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. संविधान जाळणाऱ्यांच्या  विरोधात हे सरकार देशद्रोहाचा गुन्हा करत नसल्याने सरकारचा काही समझोता तर नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहत नसल्याचे आव्हान यांनी सांगितले. या देशात सर्वकाही बदलेल मात्र संविधान बदलू देणार नाही अशी घोषणा करत येत्या काही दिवसात संविधान प्रेमी असलेले आणि पुरोगामी विचारांचे हजारो तरुण रस्त्यावर उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितले. 'संविधान के सन्मान में हम उतरंगे मैदान में' असा भारतभर कार्यक्रम राबवण्याची घोषणा देखील आव्हाड यांनी केली असून समविचारी संघटनेबरोबर आपली बोलणी सुरु असल्याची माहिती ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड यांनी दिली आहे. तर दुसरीकडे नालासोपाऱ्यात सापडलेली स्फोटाके ही दिवाळीमध्ये वाजवण्यासाठी आणण्यात आली होती का असा टोला लगावत यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण तापले असताना जंतरमंतर या ठिकाणी काही विशिष्ट घटकांकडून संविधान जाळण्याचा प्रकार झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या भूमिकेविषयीच शंका उपस्थित केली आहे. या देशात पुन्हा मनुस्मृतीचे नियम लादण्यात येत आहे. संविधान जाळल्यामुळे हा १२० कोटी जनतेचा अपमान असून संपूर्ण भारतामध्ये याचे तीव्र प्रतिसाद उमटतील असे आव्हाड यांनी सांगितले. आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून काही लोकांना संविधान नको आहे त्यामुळेच संविधान जाळण्याचे प्रकार होत असून अशा लोकांवर सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नसून सरकारचे बगलबच्चेच हा प्रकार करत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

नालासोपाऱ्यात जी स्फोटके सापडली आहेत ती काही दिवाळीमध्ये फोडण्यासाठी आणली होती का असा उपहासात्मक टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. ही स्फोटके मराठा आंदोलनामध्ये फोडायची होती किंवा अन्य ठिकाणी जरी फोडण्याचा डाव असला तरी ही देशविघातक कृत्य असून सरकार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नसल्याने सरकारचाच छुपा समझोता आहे की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्याचा प्रकार झाला असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस