शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संविधान जाळण्याचा प्रकार सरकारच्या आशीर्वादानेच, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 14:52 IST

 'संविधान के सन्मान मे हम उतरेंगे मैदान मे' संपूर्ण भारतभर आंदोलन छेडण्याची आव्हाड यांची घोषणा

ठाणे - मराठा आरक्षणाचा बागुलबुवा करत जंतरमंतरवर संविधान जाळण्याचा झालेला प्रकार हा सरकारच्या आशीर्वादानेच झाला असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. संविधान जाळणाऱ्यांच्या  विरोधात हे सरकार देशद्रोहाचा गुन्हा करत नसल्याने सरकारचा काही समझोता तर नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहत नसल्याचे आव्हान यांनी सांगितले. या देशात सर्वकाही बदलेल मात्र संविधान बदलू देणार नाही अशी घोषणा करत येत्या काही दिवसात संविधान प्रेमी असलेले आणि पुरोगामी विचारांचे हजारो तरुण रस्त्यावर उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितले. 'संविधान के सन्मान में हम उतरंगे मैदान में' असा भारतभर कार्यक्रम राबवण्याची घोषणा देखील आव्हाड यांनी केली असून समविचारी संघटनेबरोबर आपली बोलणी सुरु असल्याची माहिती ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड यांनी दिली आहे. तर दुसरीकडे नालासोपाऱ्यात सापडलेली स्फोटाके ही दिवाळीमध्ये वाजवण्यासाठी आणण्यात आली होती का असा टोला लगावत यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण तापले असताना जंतरमंतर या ठिकाणी काही विशिष्ट घटकांकडून संविधान जाळण्याचा प्रकार झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या भूमिकेविषयीच शंका उपस्थित केली आहे. या देशात पुन्हा मनुस्मृतीचे नियम लादण्यात येत आहे. संविधान जाळल्यामुळे हा १२० कोटी जनतेचा अपमान असून संपूर्ण भारतामध्ये याचे तीव्र प्रतिसाद उमटतील असे आव्हाड यांनी सांगितले. आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून काही लोकांना संविधान नको आहे त्यामुळेच संविधान जाळण्याचे प्रकार होत असून अशा लोकांवर सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नसून सरकारचे बगलबच्चेच हा प्रकार करत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

नालासोपाऱ्यात जी स्फोटके सापडली आहेत ती काही दिवाळीमध्ये फोडण्यासाठी आणली होती का असा उपहासात्मक टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. ही स्फोटके मराठा आंदोलनामध्ये फोडायची होती किंवा अन्य ठिकाणी जरी फोडण्याचा डाव असला तरी ही देशविघातक कृत्य असून सरकार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नसल्याने सरकारचाच छुपा समझोता आहे की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्याचा प्रकार झाला असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस