शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

करोडोंची फसवणूक करणा-या मैत्रेय घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 22:45 IST

पैसे दुप्पट करुन देण्याच्या अमिषाने गरीब गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेय गु्रप मार्केटींग कंपनीच्या संचालकांना अटक करण्याची मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे.

 ठाणे  - पैसे दुप्पट करुन देण्याच्या अमिषाने गरीब गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेय गु्रप मार्केटींग कंपनीच्या संचालकांना अटक करण्याची मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे. यात फसवणूक झालेल्या जिह्यातील २० गुंतवणूकदारांसह केळकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन ही मागणी केली. त्यानुसार याप्रकरणाचा तपास पोलीस आयुक्तांनी गुरुवारी आता आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास सोपविला.मैत्रेय ग्रुप मार्केटींग कंपनीने पैसे दुप्पट करुन देण्याच्या अमिषाने तसेच या ग्रुपमधील विविध उद्योग समुहाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक दलालांचे जाळे तयार करून त्यांच्या मदतीने प्रामुख्याने महिला, कामगार आणि शेतमजूरांकडून या दलालांनी दरमहा पैसे घेतले. नवी मुंबईतील सरस्वती मरतूर यांनी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेल्या तक्रारीनुसार २००६ मध्ये त्यांनी या मैत्रेय उद्योग समुहामध्ये एका महिला दलालामार्फत पैसे गुंतविले. दरमला ६०० प्रमाणे ७८ महिन्यांसाठी ७२ हजार रुपये बोनससह मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले होते. २०१३ च्या सुरुवातीला त्यांना ही रक्कमही मिळाल्याने त्यांचा या योजनेवर चांगल्या प्रकारे विश्वास बसला. त्यानंतर त्यांच्याच शेजारी राहणाºया अनिता हल्लाळे यांनी या योजनेत पैसे गुंतविण्यास त्यांना भाग पाडले. नव्या योजनेनुसार जमिनीमध्ये प्लॉटींग करुन ते विकसित करुन त्यामध्ये बांधकाम करुन भविष्यात त्यांची विक्री करून त्यातून मिळणाºया नफ्याचे वाटप हे गुंतवणूकदाराने केलेल्या रकमेच्या प्रमाणात करण्यात येते किंवा गुंतवणूकदारास त्याने योजनेंतर्गत केलेल्या गुंतवणूकीवर प्लॉट देते, असे सांगण्यात आले. त्यामुळेच त्यांनी १२ हजार ६०० प्रमाणे सहा वर्षांसाठी भरल्यावर एक लाख १२ हजार ६०० रुपये इतकी रक्कम मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र, कालांतराने ही रक्कम मागण्यास त्यांनी सुरुवात केल्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली.मरतूर यांच्याप्रमाणेच ठाणे, नवी मुंबईतील अनेक कामगार, महिलांनी या योजनेत पैसे गुंतविले. पैसे दुप्पट करण्याच्या अपेक्षेने अनेकांनी यात गुंतवणूक केली. मात्र, भिवंडी, कल्याण, घोडबंदर रोड येथील शेकडो गुंतवणूकदारांकडून १० ते १५ कोटींच्या रकमा स्वीकारुन त्यांचा अपहार करुन मैत्रेच्या संचालकांनी पळ काढला. यातील अनेक गुंतवणूकदारांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन ही कैफियत मांडली. तेंव्हा त्यांनी मैत्रेय गुं्रपच्या मधूसुदन सत्पाळकर याच्यासह सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली.कंपनीने विविध प्रलोभने दाखवून कोटयवधी रुपये गोळा केले. त्याचा परतावा मात्र दिलाच नाही. सुमारे ६०० गोरगरीबांची यात फसवणूक झाली असून हे प्रकरण गंभीर आहे. त्यातील आरोपींना तात्काळ अटक करून पीडितांना न्याय द्यावा, असे केळकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा