शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात सार्वजनिक बांधकाम विभागाचा अविष्कार, ६८ कोटीच्या निधीतून रस्त्यावर रस्ता बांधणी

By सदानंद नाईक | Updated: November 29, 2024 20:14 IST

रस्ता निकृष्ट? चौकशीची मागणी

सदानंद नाईकउल्हासनगर : गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या ६८ कोटीच्या निधीतील कल्याण ते अंबरनाथ रस्त्याच्या कामाला निवडणुकीत दरम्यान मुहूर्त लागला. मात्र मुख्य रस्त्यावर रस्ता बांधला जात असल्याने, रस्त्याच्या गुणवत्तावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून विभागाने मात्र रस्त्याची डिझाईन व्हीजेटीआय संस्थेकडून मंजूर केल्याची माहिती दिली.

उल्हासनगरातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण झाल्यावर, रस्ता बांधणीसाठी राज्य शासनाने एकूण ४ टप्प्यात ६८ कोटींचा निधी दिला. मात्र दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी पडून होता. शहरांत भुयारी गटार योजनेचे काम सुरु असून रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकल्यानंतर रस्ता बांधणीला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मानकर यांनी यापूर्वी दिली होती. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते रस्ते भूमिपूजन झाल्यावर रस्ता बांधणीचे काम सुरुवात झाली. मात्र रस्ता खोदून बांधण्यात ऐवजी जुन्याच रस्त्यावर एका फुटाचा आरसीसी रस्ता बांधण्याचे काम सुरु झाले. रस्त्यावर रस्ता बांधण्यात येत असल्याने, भविष्यात रस्त्याचे काम निकृष्ट होणार असल्याची भीती स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक आदिनी व्यक्त केली. 

तब्बल ६८ कोटीच्या निधीतून बांधण्यात येणारा रस्ता खोदून न बांधता रस्त्यावर रस्ता बांधला जात आहे. याबाबत सार्वजनिक विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मानकर यांना विचारले असता, रस्ताचे काम सुरु झाले. पावसाळापूर्वी रस्त्याचे पूर्ण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. रस्त्यावर रस्ता बांधण्याचे डिझाईन व्हीजेटीआयकडून मंजूर केल्याची माहिती मानकर यांनी दिली. रस्त्यावर रस्ता बांधला जात असल्याने, रस्ता ऐक फूट उंच झाला. त्यामुळे रस्त्या लगतची अनेक दुकानें रस्त्या खाली गेली. पावसाळ्यात दुकानात पाणी घुसण्याची शक्यता दुकानदारांनी व्यक्त केली. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने पावसाचे पाणी जाण्यासाठी नाल्या बनविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच अनेक ठिकाणी रस्त्याची उंची कमी असल्याने, रस्त्यात पाणी साचते. असी माहिती मानकर यांनी दिली. एकूणच ६८ कोटीच्या निधीतून बांधन्यात येणाऱ्या रस्त्यावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. याबाबत चौकशीची मागणी शहरातून होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर