शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

उल्हासनगरात सार्वजनिक बांधकाम विभागाचा अविष्कार, ६८ कोटीच्या निधीतून रस्त्यावर रस्ता बांधणी

By सदानंद नाईक | Updated: November 29, 2024 20:14 IST

रस्ता निकृष्ट? चौकशीची मागणी

सदानंद नाईकउल्हासनगर : गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या ६८ कोटीच्या निधीतील कल्याण ते अंबरनाथ रस्त्याच्या कामाला निवडणुकीत दरम्यान मुहूर्त लागला. मात्र मुख्य रस्त्यावर रस्ता बांधला जात असल्याने, रस्त्याच्या गुणवत्तावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून विभागाने मात्र रस्त्याची डिझाईन व्हीजेटीआय संस्थेकडून मंजूर केल्याची माहिती दिली.

उल्हासनगरातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण झाल्यावर, रस्ता बांधणीसाठी राज्य शासनाने एकूण ४ टप्प्यात ६८ कोटींचा निधी दिला. मात्र दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी पडून होता. शहरांत भुयारी गटार योजनेचे काम सुरु असून रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकल्यानंतर रस्ता बांधणीला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मानकर यांनी यापूर्वी दिली होती. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते रस्ते भूमिपूजन झाल्यावर रस्ता बांधणीचे काम सुरुवात झाली. मात्र रस्ता खोदून बांधण्यात ऐवजी जुन्याच रस्त्यावर एका फुटाचा आरसीसी रस्ता बांधण्याचे काम सुरु झाले. रस्त्यावर रस्ता बांधण्यात येत असल्याने, भविष्यात रस्त्याचे काम निकृष्ट होणार असल्याची भीती स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक आदिनी व्यक्त केली. 

तब्बल ६८ कोटीच्या निधीतून बांधण्यात येणारा रस्ता खोदून न बांधता रस्त्यावर रस्ता बांधला जात आहे. याबाबत सार्वजनिक विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मानकर यांना विचारले असता, रस्ताचे काम सुरु झाले. पावसाळापूर्वी रस्त्याचे पूर्ण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. रस्त्यावर रस्ता बांधण्याचे डिझाईन व्हीजेटीआयकडून मंजूर केल्याची माहिती मानकर यांनी दिली. रस्त्यावर रस्ता बांधला जात असल्याने, रस्ता ऐक फूट उंच झाला. त्यामुळे रस्त्या लगतची अनेक दुकानें रस्त्या खाली गेली. पावसाळ्यात दुकानात पाणी घुसण्याची शक्यता दुकानदारांनी व्यक्त केली. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने पावसाचे पाणी जाण्यासाठी नाल्या बनविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच अनेक ठिकाणी रस्त्याची उंची कमी असल्याने, रस्त्यात पाणी साचते. असी माहिती मानकर यांनी दिली. एकूणच ६८ कोटीच्या निधीतून बांधन्यात येणाऱ्या रस्त्यावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. याबाबत चौकशीची मागणी शहरातून होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर