शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

भार्इंदरऐवजी मीरारोड येथील राखीव भूखंडावर आगरी भवन बांधा; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 21:47 IST

पुर्वेकडील आझादनगर येथील राखीव भूखंडावर प्रस्तावित आगरी भवनासाठी पुरेशी जागा नसल्याने ते मीरारोड येथील सेव्हन ईलेव्हन हॉस्पिटलच्या मागील राखीव भूखंडावर पुरेशा जागेत बांधा

भार्इंदर : पुर्वेकडील आझादनगर येथील राखीव भूखंडावर प्रस्तावित आगरी भवनासाठी पुरेशी जागा नसल्याने ते मीरारोड येथील सेव्हन ईलेव्हन हॉस्पिटलच्या मागील राखीव भूखंडावर पुरेशा जागेत बांधा, अश्या सूचना  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दालनात गुरुवारी आयोजित बैठकीत पालिका आयुक्त बळीराम पवार यांना केली. 

यावेळी मीरा-भाईंदरमधील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. पालिकेने शहर विकास आराखड्यानुसार आझादनगर येथील राखीव भूखंडावर सामाजिक वनीकरण व उद्यानाचे आरक्षण क्रमांक १२२ टाकले आहे. त्याचा विकास पालिकेने अद्याप केलेला नाही. परिणामी त्या जागेवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अशातच त्यावर स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व संग्रहालय साकारण्याचा प्रस्ताव गतवर्षीच्या महासभेत मंजुर करण्यात आला. या भूखंडाच्या एकुण ४६ हजार ७०० चौरस मीटर जागेपैकी ३५ हजार १८२ चौरस मीटर जागा पालिकेच्या ताब्यात आल्याचा दावा सत्ताधा-यांकडून तर ३० हजार ५३३ चौमी जागाच ताब्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. एकुण जागेपैकी ४ हजार ५८० चौरस मीटर जागेवर बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी यंदाच्या प्रशासकीय अंदाजपत्रकात ३ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. मात्र भाजपा सत्ताधा-यांनी त्यावर आगरी भवन निर्मितीच्या प्रस्तावाला २६ फेब्रुवारीच्या महासभेत मान्यता दिली. यामुळे एकाच आरक्षणावर तीन विकासकामे प्रस्तावित करण्यात आल्याने त्यांचा विकास प्रशासन राजकीय कुरघोडीतून कसा काय साधणार, असा प्रश्न सध्या चर्चिला जाऊ लागला आहे. तत्पुर्वी ही विकासकामे साधण्यापूर्वी त्या भूखंडावरील आरक्षणात राज्य सरकारच्या मान्यतेने फेरबदल होणे आवश्यक आहे. त्याचा प्रस्ताव २९ जूलै २०११ रोजीच्या महासभेत मंजुर करण्यात येऊन राज्य सरकारकडे २८ मार्च २०१२ रोजी मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्याला राज्य सरकारने अमान्य केल्याने या भूखंडाऐवजी मीरारोड येथील सर्व समावेशक आरक्षण क्रमांक २४६ वरील २ एकर जागेत आगरी भवनची निर्मिती करावी, अशी सुचना पालकमंत्र्यांनी आयोजित बैठकीत पालिका आयुक्तांना केली. या आरक्षणातील सुमारे ७० टक्के जागा पालिकेच्या ताब्यात आल्याने त्यावर आगरी भवन सहज साकारता येणार असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, आझादनगर येथील उपलब्ध जागेच्या १५ टक्के जागेवरच स्मारक बांधकामाची परवागनी असताना त्याच जागेवर आगरी भवन बांधण्याचा भाजपा सत्ताधा-यांचा अट्टहास त्या समाजाची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप आ. प्रताप सरनाईक यांनी केला आहे. त्याची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी थेट पालकमंत्र्यांनाच साकडे घातल्याने गुरुवारी पालकमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. तसेच स्थानिक नगरसेविका नीलम ढवण यांच्या प्रयत्नाने भार्इंदर पुर्वेलाच सुरु असलेले मार्केटचे काम काही राजकीय मंडळीमार्फत थांबविण्याचा प्रयत्न होत असल्याने ते काम न थांबविण्याच्या सूचना देखील आयुक्तांना करण्यात आल्या. बैठकीत आ.  सरनाईक यांच्यासह पालिका आयुक्त, शहरअभियंता शिवाजी बारकुंड, नगररचनाकार हेमंत ठाकूर, सह नगररचनाकार केशव शिंदे, उपअभियंता नितीन मुकणे, कनिष्ठ अभियंता, श्रीकृष्ण मोहिते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक