शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

काळातलावात शिकारा, हाउस बोटीची गरज, बोटिंगला मिळतोय अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:45 IST

शहरातील काळातलाव व परिसराच्या सुशोभीकरणावर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, काळातलाव परिसरात पार्किंग व कॅफेटेरियाची सुविधा नसल्याने तलावातील बोटिंगला कमी प्रतिसाद मिळतो

कल्याण : शहरातील काळातलाव व परिसराच्या सुशोभीकरणावर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, काळातलाव परिसरात पार्किंग व कॅफेटेरियाची सुविधा नसल्याने तलावातील बोटिंगला कमी प्रतिसाद मिळतो. केवळ शनिवार व रविवारीच बोटिंगसाठी नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद वाढावा, यासाठी महापालिकेने सोयीसुविधा पुरवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याला स्थानिक शिवसेना नगरसेवक सुधीर बासरे यांनीही दुजोरा दिला आहे.पश्चिमेत ऐतिहासिक काळातलाव आहे. त्याचा परीघ सव्वा किलोमीटरचा असून खोली २० फूट आहे. या तलावात कंत्राटदार सहारा मच्छीमार संस्थेमार्फत बोटिंग खासकरून पॅडल बोट सुरू आहे. मात्र, बोटिंगला फारसा प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेने तीन वर्षांसाठी ‘सहारा’ची नेमणूक केली आहे. ‘सहारा’ने वर्षाला पाच लाख रुपये उत्पन्न महापालिकेस देणे बंधनकारक आहे.काळातलाव परिसर सुशोभीकरणावर महापालिकेने यापूर्वी आठ कोटी रुपये खर्च केले आहेत. तलावानजीक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले असून त्यावरही किमान १० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही बोटिंग केवळ शनिवारी, रविवारी आणि सुट्यांच्या दिवशीच सायंकाळी जास्त प्रतिसाद मिळतो. इतर दिवशी काही प्रतिसाद मिळत नाही. तलावाशेजारील झोपड्या हटवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. झोपड्यांमुळे सध्या तेथे पार्किंगची सुविधा नाही. तसेच तलाव परिसरात कॅफेटेरिया नाही. त्यामुळे येथे तलाव परिसरात विरंगुळ्यासाठी येणाºयांना रिफ्रेशमेंटची सुविधा मिळत नाही. महापालिकेने कंत्राटदाराला तलावातील बोटिंगकरिता एक शिकारा व हाउस बोट दिल्यास बोटिंगला प्रतिसाद वाढू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.बोटीचे साधे इंजीनच साडेतीन लाख रुपये किमतीचे आहे. फेरीबोटीची किंमत १२ लाख रुपये आहे. दोनआसनी पॅडल बोटीसाठी ८० हजार रुपये लागतात. तर, चारआसनी पॅडल बोटीच्या खरेदीसाठी एक लाख २० हजार रुपये खर्च येतो. ही खरेदी कंत्राटदाराला झेपणारी नाही. महापालिकेने शिकारा व हाउस बोट उपलब्ध करून दिल्यास बोटिंगचा आनंद द्विगुणीत होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रांत तलावाचे कंत्राट देताना राज्य सरकारच्या अध्यादेशाचे पालन केले जाते. या अध्यादेशानुसार, तलावात बोटिंगची सुविधा देणाºया मच्छीमार सहकारी संस्थेला किमान पाच वर्षे कंत्राट दिले जावे, संस्थेची गुंतवणूक करण्याची तयारी असल्यास त्याचा कालावधी १५ ते ३० वर्षे असावा. मच्छीमार संस्थेला रोजगार उपलब्ध करून देणे, हा सरकारचा उदात्त हेतू त्यामागे आहे. मात्र, केडीएमसीने ‘सहारा’ला तीन वर्षांचे कंत्राट दिले आहे.काळातलावात अन्य एक मच्छीमार संस्था मासेमारी करते. या तलावात रो, कटला, तेलप्पा या जातींचे मासे आहेत. मासेमारीसाठी संस्था जाळे टाकत असल्याने बोटिंगला अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कोणत्याही एका संस्थेला काम द्यावे, जेणेकरून सरकारचा उद्देश साध्य होईल. महापालिका सरकारच्या अध्यादेशाला हरताळ फासण्याचे काम करते, याकडे सहारा सहकारी मच्छीमार संस्थेने लक्ष वेधले आहे. तसेच राज्यातील अन्य ठिकाणी तलावाचे काम हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली दिले जाते. मात्र, केडीएमसीत हे काम बांधकाम व मालमत्ता विभागाच्या अखत्यारीत आहे.