शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

घुसखोरी हा भारताला झालेला कॅन्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 5:33 AM

हेमंत महाजन : ए.पी. शाह विद्यालयात राष्ट्रीय सुरक्षेवर व्याख्यान, देशाला बाह्य सुरक्षेची चिंता नाही

ठाणे : भारताला सर्वात मोठा धोका अंतर्गत सुरक्षेचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅ न्सर आहे, असे मत वरिष्ठ लेखक, वक्ते, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले. राष्ट्रभक्ती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. यावेळी ‘राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर हेमंत महाजन बोलत होते.

ए.पी. शाह महाविद्यालयात शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होेते. यावेळी संस्थेचे कैलास म्हात्रे, दत्ता घाडगे, सुरज दळवी, जितेंद्र ढाकणे, प्रमोद धुमाळ, वर्षा सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाजन म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षा ही अंतर्गत व बाह्य या दोन प्रकारांत मोडते. अंतर्गत सुरक्षेमध्ये नक्षलवाद, दहशतवादी कारवाया, छुपे युद्ध तसेच काश्मीर, पूर्वांचलमध्ये होणारी घुसखोरी इत्यादी विषय येतात. बाह्य सुरक्षेमध्ये जमिनीवरील सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि अवकाश सुरक्षा इत्यादी येतात. सध्या देशाची बाह्य सुरक्षा खूप चांगली आहे. आपल्या शेजारील चीन, पाकिस्तान, बांगलादेश यांच्याकडून भारताला धोका आहे. भारताला ७६०० किलोमीटर सागरी सीमा लाभली आहे. भारताच्या तिन्ही बाजूंना समुद्र असल्याने भारत आणि चीन यांच्यामध्ये डोकलाम विषयावरून वाद असला, तरी चीन भारतावर आक्रमण करण्याचा विचारही करू शकत नाही. चीनला लढाईचा अजिबात अनुभव नाही. १९७८ नंतर चीनची लढाई झाली नाही. लढाई झालीच तर चीन, पाकिस्तान, बांगलादेश व देशांतर्गत आक्रमण एकाच वेळी होऊ शकते. चीनची तेलवाहतूक ही भारताच्या समुद्री हद्दीजवळून होत असते. त्यामुळे लढाई झाली, तर चीनचा तेलपुरवठा भारत बंद करू शकतो. म्हणून, चीन भारतावर कधी आक्रमण करू शकत नाही. पाकिस्तानही युद्ध करू शकत नाही, म्हणून ते प्रॉक्झी वॉर करत आहेत. पाकिस्तानची स्थिती हलाखीची आहे. शिवाय, दहशतवादामुळे आंतरराष्ट्रीय दबावही खूप आहे, असे महाजन यांनी सांगितले.

भारताचे सध्याचे परराष्ट्र धोरण योग्य असल्याने शेजारी राष्ट्रे भारताच्या बाजूने आहेत. त्यामुळे बाह्य सुरक्षेबाबत भारताला चिंता करण्याची गरज नाही. भारताबाबत आंतरराष्ट्रीय शक्तीअंतर्गत लढाईमध्ये जास्त रस दाखवते, म्हणून अंतर्गत कारवाईच्या माध्यमातून त्रास देणे सुरू असते. भारतामध्ये विकासविरोधी गट खूप सक्रिय आहे. हे देशासमोर एक मोठे आव्हान आहे. अनेक प्रकल्प स्थानिक लोकांमध्ये गैरसमजुती पसरवून थांबवले जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये वादविवाद निर्माण केले जातात. जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून अंतर्गत सुरक्षा बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे चिनी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. त्यामुळे विकासावर फरक पडतो, असे महाजन म्हणाले.भारत सुपरपॉवर नक्की बनेलच्केंद्र सरकार लष्कराच्या बाबतीत चांगल्या योजना राबवत आहे. आपली सागरी सुरक्षा नक्कीच सुधारलेली आहे. आपल्या नॅशनल सिक्युरिटी गार्डची (एनएसजी) दहशत शेजारील राष्ट्रांमध्ये नक्कीच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारत सुपरपॉवर नक्कीच बनेल.च्नागरिकांनी स्वच्छता ठेवली पाहिजे. सोशल मीडियातून चुकीच्या गोष्टी पसरवू नये. जर अनुचित प्रकार घडत असतील, तर पोलिसांना माहिती द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.च्कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास म्हात्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जगदीश खैरालिया, जितेंद्र ढाकणे, दत्ता घाडगे यांनी परिश्रम केले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका