शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

मीरा भाईंदर शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ ; एमआयडीसी कडून ५ दशलक्ष लिटरचा अतिरिक्त पुरवठा

By धीरज परब | Updated: June 11, 2024 17:19 IST

मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात होते .

मीरारोड : मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात होते . मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कडे पाठपुरावा केल्या नंतर ८ जून पासून शहराला ५ दशलक्ष लिटर पाणी वाढवून दिले असून आणखी ५  दशलक्ष लिटर पाणी सुद्धा लवकरच वाढवून मिळेल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे . यामुळे दर आठवड्याच्या शट डाऊन मुळे पाणी समस्येचा नागरिकांचा त्रास काही अंशी कमी होईल असे त्यांनी सांगितले . 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडून मीरा भाईंदर शहराला १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे . परंतु एमआयडीसी मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी देत होती . त्यातच विविध दुरुस्ती आणि देखभाल कामे , जलवाहिनी फुटणे आदी कारणांनी  शहराचा पाणी पुरवठा खंडित झाल्यास तो सुरळीत होण्यास चार चार दिवस लागतात . आधीच पाणी कमी मिळते त्यात शटडाऊन मुळे आणखी पाणी टंचाई लोकांना सहन करावी लागत असते असे आ .सरनाईक म्हणाले . 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पाण्यात वाढ करण्यासाठी तसेच मंजूर कोट्यानुसार १२५ दशलक्ष लिटर  पाणी पुरवठा मिळावा या साठी शासन आणि एमआयडीसी कडे पाठपुरावा केला जात होता . महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारवी जलशुध्दीकरण केंद्र येथील काही कामे तसेच कटईनाका ते शिळफाटा पर्यंतची जलवाहिनी कामे अपुर्ण असल्यामुळे ती पुर्ण झाल्याशिवाय पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे गेल्या ३ - ४ वर्षां पासून प्रशासन सांगत होते . 

गेल्या काही दिवसात  सलग शटडाऊन मुळे तसेच पाण्याची गळती कारणांनी शहरातील पाणी पुरवठ्यावर जास्तच विपरीत परिणाम झाला होता . त्यामुळे अनेक भागात ३ - ३ दिवस पाणी लोकांना मिळाले नाही अश्या तक्रारी वाढल्या . शहरातील सद्याची तसेच भविष्यातील पाण्याची मागणी पुर्ण करण्यासाठी सुर्या प्रकल्पातून शहरासाठी सुमारे २१८ एम.एल.डी. पाणी पुरवठा योजना मंजूर असून त्याला आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे . सूर्याचे पाणी मिळणे सुरु होताच शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे . 

परंतु सद्यस्थितीत होत असलेल्या पाणी पुरवठ्यात किमान १० दशलक्ष लिटर पाणी तात्काळ वाढवून देण्या संदर्भात आ . सरनाईक यांच्या मागणी नुसार उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे नुकतीच बैठक झाली . त्या बैठकीत मंत्री सामंत यांनी  मंजूर कोट्यानुसार मीरा भाईंदरला पाणी पुरवठा करावा असे निर्देश दिले .

त्यानुसार ८ जून पासून शहराला एमआयडीसी कडून आणखी ५ दशलक्ष लिटर पाणी वाढवून मिळाले आहे . त्यामुळे एमआयडीसी कडून १२० दशलक्ष लिटर पाणी मिळू लागले असून उर्वरित ५ दशलक्ष लिटर पाणी सुद्धा लवकरच मिळेल असे आ . सरनाईक म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMIDCएमआयडीसीWaterपाणीUday Samantउदय सामंत