शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ ; एमआयडीसी कडून ५ दशलक्ष लिटरचा अतिरिक्त पुरवठा

By धीरज परब | Updated: June 11, 2024 17:19 IST

मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात होते .

मीरारोड : मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात होते . मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कडे पाठपुरावा केल्या नंतर ८ जून पासून शहराला ५ दशलक्ष लिटर पाणी वाढवून दिले असून आणखी ५  दशलक्ष लिटर पाणी सुद्धा लवकरच वाढवून मिळेल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे . यामुळे दर आठवड्याच्या शट डाऊन मुळे पाणी समस्येचा नागरिकांचा त्रास काही अंशी कमी होईल असे त्यांनी सांगितले . 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडून मीरा भाईंदर शहराला १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे . परंतु एमआयडीसी मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी देत होती . त्यातच विविध दुरुस्ती आणि देखभाल कामे , जलवाहिनी फुटणे आदी कारणांनी  शहराचा पाणी पुरवठा खंडित झाल्यास तो सुरळीत होण्यास चार चार दिवस लागतात . आधीच पाणी कमी मिळते त्यात शटडाऊन मुळे आणखी पाणी टंचाई लोकांना सहन करावी लागत असते असे आ .सरनाईक म्हणाले . 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पाण्यात वाढ करण्यासाठी तसेच मंजूर कोट्यानुसार १२५ दशलक्ष लिटर  पाणी पुरवठा मिळावा या साठी शासन आणि एमआयडीसी कडे पाठपुरावा केला जात होता . महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारवी जलशुध्दीकरण केंद्र येथील काही कामे तसेच कटईनाका ते शिळफाटा पर्यंतची जलवाहिनी कामे अपुर्ण असल्यामुळे ती पुर्ण झाल्याशिवाय पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे गेल्या ३ - ४ वर्षां पासून प्रशासन सांगत होते . 

गेल्या काही दिवसात  सलग शटडाऊन मुळे तसेच पाण्याची गळती कारणांनी शहरातील पाणी पुरवठ्यावर जास्तच विपरीत परिणाम झाला होता . त्यामुळे अनेक भागात ३ - ३ दिवस पाणी लोकांना मिळाले नाही अश्या तक्रारी वाढल्या . शहरातील सद्याची तसेच भविष्यातील पाण्याची मागणी पुर्ण करण्यासाठी सुर्या प्रकल्पातून शहरासाठी सुमारे २१८ एम.एल.डी. पाणी पुरवठा योजना मंजूर असून त्याला आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे . सूर्याचे पाणी मिळणे सुरु होताच शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे . 

परंतु सद्यस्थितीत होत असलेल्या पाणी पुरवठ्यात किमान १० दशलक्ष लिटर पाणी तात्काळ वाढवून देण्या संदर्भात आ . सरनाईक यांच्या मागणी नुसार उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे नुकतीच बैठक झाली . त्या बैठकीत मंत्री सामंत यांनी  मंजूर कोट्यानुसार मीरा भाईंदरला पाणी पुरवठा करावा असे निर्देश दिले .

त्यानुसार ८ जून पासून शहराला एमआयडीसी कडून आणखी ५ दशलक्ष लिटर पाणी वाढवून मिळाले आहे . त्यामुळे एमआयडीसी कडून १२० दशलक्ष लिटर पाणी मिळू लागले असून उर्वरित ५ दशलक्ष लिटर पाणी सुद्धा लवकरच मिळेल असे आ . सरनाईक म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMIDCएमआयडीसीWaterपाणीUday Samantउदय सामंत