शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

मीरा भाईंदर शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ ; एमआयडीसी कडून ५ दशलक्ष लिटरचा अतिरिक्त पुरवठा

By धीरज परब | Updated: June 11, 2024 17:19 IST

मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात होते .

मीरारोड : मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात होते . मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कडे पाठपुरावा केल्या नंतर ८ जून पासून शहराला ५ दशलक्ष लिटर पाणी वाढवून दिले असून आणखी ५  दशलक्ष लिटर पाणी सुद्धा लवकरच वाढवून मिळेल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे . यामुळे दर आठवड्याच्या शट डाऊन मुळे पाणी समस्येचा नागरिकांचा त्रास काही अंशी कमी होईल असे त्यांनी सांगितले . 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडून मीरा भाईंदर शहराला १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे . परंतु एमआयडीसी मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी देत होती . त्यातच विविध दुरुस्ती आणि देखभाल कामे , जलवाहिनी फुटणे आदी कारणांनी  शहराचा पाणी पुरवठा खंडित झाल्यास तो सुरळीत होण्यास चार चार दिवस लागतात . आधीच पाणी कमी मिळते त्यात शटडाऊन मुळे आणखी पाणी टंचाई लोकांना सहन करावी लागत असते असे आ .सरनाईक म्हणाले . 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पाण्यात वाढ करण्यासाठी तसेच मंजूर कोट्यानुसार १२५ दशलक्ष लिटर  पाणी पुरवठा मिळावा या साठी शासन आणि एमआयडीसी कडे पाठपुरावा केला जात होता . महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारवी जलशुध्दीकरण केंद्र येथील काही कामे तसेच कटईनाका ते शिळफाटा पर्यंतची जलवाहिनी कामे अपुर्ण असल्यामुळे ती पुर्ण झाल्याशिवाय पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे गेल्या ३ - ४ वर्षां पासून प्रशासन सांगत होते . 

गेल्या काही दिवसात  सलग शटडाऊन मुळे तसेच पाण्याची गळती कारणांनी शहरातील पाणी पुरवठ्यावर जास्तच विपरीत परिणाम झाला होता . त्यामुळे अनेक भागात ३ - ३ दिवस पाणी लोकांना मिळाले नाही अश्या तक्रारी वाढल्या . शहरातील सद्याची तसेच भविष्यातील पाण्याची मागणी पुर्ण करण्यासाठी सुर्या प्रकल्पातून शहरासाठी सुमारे २१८ एम.एल.डी. पाणी पुरवठा योजना मंजूर असून त्याला आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे . सूर्याचे पाणी मिळणे सुरु होताच शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे . 

परंतु सद्यस्थितीत होत असलेल्या पाणी पुरवठ्यात किमान १० दशलक्ष लिटर पाणी तात्काळ वाढवून देण्या संदर्भात आ . सरनाईक यांच्या मागणी नुसार उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे नुकतीच बैठक झाली . त्या बैठकीत मंत्री सामंत यांनी  मंजूर कोट्यानुसार मीरा भाईंदरला पाणी पुरवठा करावा असे निर्देश दिले .

त्यानुसार ८ जून पासून शहराला एमआयडीसी कडून आणखी ५ दशलक्ष लिटर पाणी वाढवून मिळाले आहे . त्यामुळे एमआयडीसी कडून १२० दशलक्ष लिटर पाणी मिळू लागले असून उर्वरित ५ दशलक्ष लिटर पाणी सुद्धा लवकरच मिळेल असे आ . सरनाईक म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMIDCएमआयडीसीWaterपाणीUday Samantउदय सामंत