शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

उद्धव ठाकरेंना इगो, नाहीतर आज चित्र वेगळं असतं, राजू पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 12:09 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे यांनीही तशी मागणी केली असती तर त्यांनाही पाठींबा दिला असता, मात्र स्वतःच्या इगोमुळे उद्धव ठाकरे यांनी एकदाही राज ठाकरे यांना विचारणा केली नाही. नाहीतर आज चित्र वेगळं असतं, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

 - मयुरी चव्हाण काकडे 

मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर अनेक  राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्यावर कल्याण लोकसभेची जबाबदारी  सोपवली आहे. याबाबत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी दुजोरा दिला आहे. पुढे ते म्हणाले की,  उद्धव ठाकरे यांनीही तशी मागणी केली असती तर त्यांनाही पाठिंबा दिला असता. मात्र स्वतःच्या इगो मुळे उद्धव ठाकरे यांनी एकदाही राज ठाकरे यांना विचारणा केली नाही. नाहीतर आज चित्र वेगळं असतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात आमदार राजू पाटील हे।लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी जोरदार  चर्चा होती. तसे  चित्र सुद्धा अनेकदा दिसून आले. मात्र त्यानंतर सर्व नेते एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने या चर्चेला पूर्णविराम लागला. आता मनसेने महायुतीला पाठींबा दिल्यावर कल्याण ग्रामीण मधील लाखो मतं महायुतीला मिळवून देण्याची जबाबदारी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यापुर्वीही देवेंद्र फडणवीस यांनी ५ वेळा पाठिंबा/मत मागितले होते, तेव्हा ते दिले होते, असे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे एकप्रकारे तेव्हापासूनच सेना भाजपाचे सूर जुळायला सुरवात झाली, असं म्हणणे वावगं ठरणार नाही.

याविषयी अधिक बोलताना पाटील  यांनी  थेट उद्धव ठाकरे यांच्या इगोचा उल्लेख करत  त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः च्या इगोमुळे राज ठाकरे यांना कधीही विचारणा केली नाही. त्यांनीही पाठिंबा मागितला असता किंवा मागणी केली असती तर कदाचित आज चित्र वेगळे असते, अस पाटील म्हणाले. एकप्रकारे उद्धव यांचा इगो आडवा आला नाहीतर आज दोघे भाऊ एकत्र असल्याचं चित्र कदाचित  दिसून आलं असतं, असंच पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं आहे. 

कल्याण लोकसभेच्या उमेदवारीसाठी राजू पाटील यांनाही ठाकरे गटाकडून ऑफर असल्याची चर्चा होती. त्यानंतर नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील इतर आमदारांशी पाटील यांच्यासोबतची जवळीक दिसून आली होती. मात्र राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर त्यांना महायुतीला मदत करावी लागणार आहे. अस असलं तरी पक्षाच्या पालिकडे जाऊन पाटील यांचे सर्वपक्षीय नेते / पदाधिकारी/ कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध आहेत. मनमोकळा स्वभाव, दिलदार व्यक्तिमत्व, सर्वसामान्य नागरिकांमध्ये सहज मिसळून जाणे आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे पाटील यांना मानणारा देखील मोठा वर्ग आहे. मात्र आता मनसेने महायुतीला केलेल्या मदतीची परतफेड विधानसभा निवडणूकीला  करावी, अशा प्रकारची चर्चा मनसेच्या  गोटात रंगली आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kalyan-pcकल्याणUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaju Patilराजू पाटीलMNSमनसेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४