शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतीन लाख रहिवासी टांगणीला, धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:41 IST

मुंंबईत चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला, तर ८ जखमी झाले आहेत.

ठाणे : मुंंबईत चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला, तर ८ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आजघडीला ठाण्यात अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या असल्या तरी धोकादायक इमारतींमध्ये आजही सुमारे पावणेतीन लाख रहिवाशांचे वास्तव्य आहे. त्यात इमारत किती जुनी आहे, यावर ती पडणार की नाही, असे गणित ठरत नाही. ज्या इमारती धोकादायक यादीत नाहीत, अशा इमारतीसुद्धा यापूर्वी ठाण्यात पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या डोक्यावरही टांगती तलवार असून प्रशासन आणि राजकीय नेते मात्र या विषयावर श्रेयवादाच्या लढाईत ढिम्म आहेत.ठाणे महापालिका हद्दीत १०३ अतिधोकादायक म्हणजेच सी वन प्रकारात मोडणाºया इमारती असून त्यातील ९४ इमारती रिकाम्या केल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर, यातील १८ इमारतींवरच पालिकेला हातोडा टाकता आलेला आहे.उर्वरित इमारती मात्र आजही उभ्या आहेत. यामध्ये रहिवाशांचे वास्तव्य नसले, तरी येत्या काळात यातील काही कोसळल्या, तर आजूबाजूच्या रहिवाशांना मात्र निश्चित धोका होऊ शकणार आहे. दुसरीकडे ठाण्यात किसननगर, वागळे, कळवा आणि मुंब्रा यासारख्या भागांत तर अशा इमारतींचे इमलेच्या इमले उभे आहेत. किसननगर भागातील कित्येक इमारती या दाटीवाटीने उभ्या असून कोणालाही एका इमारतीतून दुसºया इमारतीमध्ये सहजासहजी उडी मारता येऊ शकत आहे.या इमारती २५ ते ३० वर्षांहून अधिक काळ जुन्या आहेत. काही इमारतींपर्यंत तर सूर्याची किरणेसुद्धा पोहोचत नसल्याचे येथे विदारक चित्र आहे. मुंब्य्राच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. कळव्यातही अनेक भागांत अशाच इमारती आ वासून उभ्या आहेत.ठाणेकरांना क्लस्टरचे गाजर दाखविण्यात आले आहे. त्यानुसार, सहा भागांमध्ये क्लस्टरचा सर्व्हेसुद्धा पूर्ण झाला आहे. येत्या १५ आॅगस्ट रोजी काही भागांत क्लस्टरचा नारळ वाढविला जाणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यासाठी आता राजकीय मंडळींची धावपळ सुरूझाली आहे. परंतु, असे असले तरी या धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटेल का, याचे उत्तर मात्र अद्यापही शासन किंवा या राजकीय मंडळींकडे नाही.>स्ट्रक्चरल आॅडिटनंतरही प्रश्न जैसे थेकाही वर्षांपूर्वी नौपाड्यात धोकादायक इमारत पडून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांना आपले जीव गमवावे लागले होते. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचेही बंधनकारक केले. परंतु, आजही अनेक इमारतधारक त्यासाठी पुढे येताना दिसत नाही. महापालिकेच्या आॅडिट कमिटीवर ९५ लोकांची नियुक्तीही केली आहे. त्यानुसार, यांच्या माध्यमातून स्ट्रक्चरल आॅडिटची कारवाई केली जात आहे. परंतु, असे कित्येक उपाय केल्यानंतरही आजही धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटू शकलेला नाही. या धोकादायक इमारतींमध्ये सुमारे 55,000कुटुंबांचे वास्तव्य असून यामध्ये रहिवाशांची संख्या ही पावणेतीन लाखांच्या घरात जात आहे. त्यामुळे या रहिवाशांचा जीव आता मुंबईच्या दुर्घटनेनंतर टांगणीला लागला आहे.>ठाण्यात ४२८० इमारती धोकादायक : महापालिका हद्दीत १०३ इमारती या अतिधोकादायक आहेत, तर मुंब्य्रात १४६०, वागळे इस्टेट १३५५, उथळसर १०६, कळवा १३४, नौपाडा-कोपरी ७८२, माजिवडा-मानपाडा ६८, लोकमान्य-सावरकरनगर २१० आणि वर्तकनगरमध्ये ६२ अशा ४२८० इमारती अतिधोकादायक/धोकादायक आहेत. या इमारतींमधील रहिवाशांच्या तात्पुरत्या स्वरूपातील पुनर्वसनासाठी पालिकेने २५७० गाळे भाड्यानेदेखील घेतले आहेत.