शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

पावणेतीन लाख रहिवासी टांगणीला, धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:41 IST

मुंंबईत चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला, तर ८ जखमी झाले आहेत.

ठाणे : मुंंबईत चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला, तर ८ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आजघडीला ठाण्यात अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या असल्या तरी धोकादायक इमारतींमध्ये आजही सुमारे पावणेतीन लाख रहिवाशांचे वास्तव्य आहे. त्यात इमारत किती जुनी आहे, यावर ती पडणार की नाही, असे गणित ठरत नाही. ज्या इमारती धोकादायक यादीत नाहीत, अशा इमारतीसुद्धा यापूर्वी ठाण्यात पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या डोक्यावरही टांगती तलवार असून प्रशासन आणि राजकीय नेते मात्र या विषयावर श्रेयवादाच्या लढाईत ढिम्म आहेत.ठाणे महापालिका हद्दीत १०३ अतिधोकादायक म्हणजेच सी वन प्रकारात मोडणाºया इमारती असून त्यातील ९४ इमारती रिकाम्या केल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर, यातील १८ इमारतींवरच पालिकेला हातोडा टाकता आलेला आहे.उर्वरित इमारती मात्र आजही उभ्या आहेत. यामध्ये रहिवाशांचे वास्तव्य नसले, तरी येत्या काळात यातील काही कोसळल्या, तर आजूबाजूच्या रहिवाशांना मात्र निश्चित धोका होऊ शकणार आहे. दुसरीकडे ठाण्यात किसननगर, वागळे, कळवा आणि मुंब्रा यासारख्या भागांत तर अशा इमारतींचे इमलेच्या इमले उभे आहेत. किसननगर भागातील कित्येक इमारती या दाटीवाटीने उभ्या असून कोणालाही एका इमारतीतून दुसºया इमारतीमध्ये सहजासहजी उडी मारता येऊ शकत आहे.या इमारती २५ ते ३० वर्षांहून अधिक काळ जुन्या आहेत. काही इमारतींपर्यंत तर सूर्याची किरणेसुद्धा पोहोचत नसल्याचे येथे विदारक चित्र आहे. मुंब्य्राच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. कळव्यातही अनेक भागांत अशाच इमारती आ वासून उभ्या आहेत.ठाणेकरांना क्लस्टरचे गाजर दाखविण्यात आले आहे. त्यानुसार, सहा भागांमध्ये क्लस्टरचा सर्व्हेसुद्धा पूर्ण झाला आहे. येत्या १५ आॅगस्ट रोजी काही भागांत क्लस्टरचा नारळ वाढविला जाणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यासाठी आता राजकीय मंडळींची धावपळ सुरूझाली आहे. परंतु, असे असले तरी या धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटेल का, याचे उत्तर मात्र अद्यापही शासन किंवा या राजकीय मंडळींकडे नाही.>स्ट्रक्चरल आॅडिटनंतरही प्रश्न जैसे थेकाही वर्षांपूर्वी नौपाड्यात धोकादायक इमारत पडून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांना आपले जीव गमवावे लागले होते. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचेही बंधनकारक केले. परंतु, आजही अनेक इमारतधारक त्यासाठी पुढे येताना दिसत नाही. महापालिकेच्या आॅडिट कमिटीवर ९५ लोकांची नियुक्तीही केली आहे. त्यानुसार, यांच्या माध्यमातून स्ट्रक्चरल आॅडिटची कारवाई केली जात आहे. परंतु, असे कित्येक उपाय केल्यानंतरही आजही धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटू शकलेला नाही. या धोकादायक इमारतींमध्ये सुमारे 55,000कुटुंबांचे वास्तव्य असून यामध्ये रहिवाशांची संख्या ही पावणेतीन लाखांच्या घरात जात आहे. त्यामुळे या रहिवाशांचा जीव आता मुंबईच्या दुर्घटनेनंतर टांगणीला लागला आहे.>ठाण्यात ४२८० इमारती धोकादायक : महापालिका हद्दीत १०३ इमारती या अतिधोकादायक आहेत, तर मुंब्य्रात १४६०, वागळे इस्टेट १३५५, उथळसर १०६, कळवा १३४, नौपाडा-कोपरी ७८२, माजिवडा-मानपाडा ६८, लोकमान्य-सावरकरनगर २१० आणि वर्तकनगरमध्ये ६२ अशा ४२८० इमारती अतिधोकादायक/धोकादायक आहेत. या इमारतींमधील रहिवाशांच्या तात्पुरत्या स्वरूपातील पुनर्वसनासाठी पालिकेने २५७० गाळे भाड्यानेदेखील घेतले आहेत.