शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

पावणेतीन लाख रहिवासी टांगणीला, धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:41 IST

मुंंबईत चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला, तर ८ जखमी झाले आहेत.

ठाणे : मुंंबईत चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला, तर ८ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आजघडीला ठाण्यात अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या असल्या तरी धोकादायक इमारतींमध्ये आजही सुमारे पावणेतीन लाख रहिवाशांचे वास्तव्य आहे. त्यात इमारत किती जुनी आहे, यावर ती पडणार की नाही, असे गणित ठरत नाही. ज्या इमारती धोकादायक यादीत नाहीत, अशा इमारतीसुद्धा यापूर्वी ठाण्यात पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या डोक्यावरही टांगती तलवार असून प्रशासन आणि राजकीय नेते मात्र या विषयावर श्रेयवादाच्या लढाईत ढिम्म आहेत.ठाणे महापालिका हद्दीत १०३ अतिधोकादायक म्हणजेच सी वन प्रकारात मोडणाºया इमारती असून त्यातील ९४ इमारती रिकाम्या केल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर, यातील १८ इमारतींवरच पालिकेला हातोडा टाकता आलेला आहे.उर्वरित इमारती मात्र आजही उभ्या आहेत. यामध्ये रहिवाशांचे वास्तव्य नसले, तरी येत्या काळात यातील काही कोसळल्या, तर आजूबाजूच्या रहिवाशांना मात्र निश्चित धोका होऊ शकणार आहे. दुसरीकडे ठाण्यात किसननगर, वागळे, कळवा आणि मुंब्रा यासारख्या भागांत तर अशा इमारतींचे इमलेच्या इमले उभे आहेत. किसननगर भागातील कित्येक इमारती या दाटीवाटीने उभ्या असून कोणालाही एका इमारतीतून दुसºया इमारतीमध्ये सहजासहजी उडी मारता येऊ शकत आहे.या इमारती २५ ते ३० वर्षांहून अधिक काळ जुन्या आहेत. काही इमारतींपर्यंत तर सूर्याची किरणेसुद्धा पोहोचत नसल्याचे येथे विदारक चित्र आहे. मुंब्य्राच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. कळव्यातही अनेक भागांत अशाच इमारती आ वासून उभ्या आहेत.ठाणेकरांना क्लस्टरचे गाजर दाखविण्यात आले आहे. त्यानुसार, सहा भागांमध्ये क्लस्टरचा सर्व्हेसुद्धा पूर्ण झाला आहे. येत्या १५ आॅगस्ट रोजी काही भागांत क्लस्टरचा नारळ वाढविला जाणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यासाठी आता राजकीय मंडळींची धावपळ सुरूझाली आहे. परंतु, असे असले तरी या धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटेल का, याचे उत्तर मात्र अद्यापही शासन किंवा या राजकीय मंडळींकडे नाही.>स्ट्रक्चरल आॅडिटनंतरही प्रश्न जैसे थेकाही वर्षांपूर्वी नौपाड्यात धोकादायक इमारत पडून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांना आपले जीव गमवावे लागले होते. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचेही बंधनकारक केले. परंतु, आजही अनेक इमारतधारक त्यासाठी पुढे येताना दिसत नाही. महापालिकेच्या आॅडिट कमिटीवर ९५ लोकांची नियुक्तीही केली आहे. त्यानुसार, यांच्या माध्यमातून स्ट्रक्चरल आॅडिटची कारवाई केली जात आहे. परंतु, असे कित्येक उपाय केल्यानंतरही आजही धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटू शकलेला नाही. या धोकादायक इमारतींमध्ये सुमारे 55,000कुटुंबांचे वास्तव्य असून यामध्ये रहिवाशांची संख्या ही पावणेतीन लाखांच्या घरात जात आहे. त्यामुळे या रहिवाशांचा जीव आता मुंबईच्या दुर्घटनेनंतर टांगणीला लागला आहे.>ठाण्यात ४२८० इमारती धोकादायक : महापालिका हद्दीत १०३ इमारती या अतिधोकादायक आहेत, तर मुंब्य्रात १४६०, वागळे इस्टेट १३५५, उथळसर १०६, कळवा १३४, नौपाडा-कोपरी ७८२, माजिवडा-मानपाडा ६८, लोकमान्य-सावरकरनगर २१० आणि वर्तकनगरमध्ये ६२ अशा ४२८० इमारती अतिधोकादायक/धोकादायक आहेत. या इमारतींमधील रहिवाशांच्या तात्पुरत्या स्वरूपातील पुनर्वसनासाठी पालिकेने २५७० गाळे भाड्यानेदेखील घेतले आहेत.