शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Maratha Reservation: संविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार?- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 16:51 IST

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मराठा आरक्षणावरही भाष्य केलं आहे.

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मराठा आरक्षणावरही भाष्य केलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत राहणार.आरक्षण हा संविधानाचा भाग आहे. ज्या सरकारमधील मंडळींचा संविधानालाच वैचारिक विरोध आहे ते आरक्षण काय देणार?, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरही ते म्हणाले, विकासाच्या, प्रगतीच्या मुद्द्यावर आपल्याला मतं मिळणार नाही हे पंतप्रधानांना कळून चुकलंय, तेव्हा मग यांना रामाची आठवण झाली, मंदिर वही बनाऐंगे पर तारीख नही बतायेंगे, 2019ची निवडणूक जवळ येतेय, सगळे मुद्दे हे आता आपल्या विरोधात आहेत हे समजल्यावर आता भावनिक मुद्द्यांना हात घालणे हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे. ठाणे शहरातील मूलभूत समस्या ठाणे महापालिकेने सोडविल्या नाहीत, आजही रस्ते, कचरा, पाणी, शौचालय यांसारख्या प्राथमिक प्रश्नांकडे पालिका दुर्लक्ष करत आहे, जुनंच ठाणे पालिकेला सांभाळत येत नाही, नवीन ठाणे कसे करणार? नवीन ठाण्याचे प्लॅंनिंग बिल्डरांसाठी आहे.नवीन ठाणे करायचे असेल तर आधी या बिल्डर्सला बाहेर काढा. नवीन ठाण्याची संकल्पना ही 10 ते 12 वर्षांपूर्वी झालेली आहे. आज ठाण्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, येत्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवणार आहे, स्वतःचे धारण बांधता आले नाही. ठाणे महापालिकेची हद्द ठरली आहे मग नवीन ठाण्याचा प्रस्ताव कशासाठी आणलाय. हे सगळे प्लॅंनिंग कोणासाठी?, असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtraमहाराष्ट्र