शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

घरांची दुरुस्ती वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:54 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेंंतर्गत उभारलेल्या घरात राहणाºयांच्या इमारतीची झाडलोट, देखभाल, दुरुस्ती केली जात नाही

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेंंतर्गत उभारलेल्या घरात राहणाºयांच्या इमारतीची झाडलोट, देखभाल, दुरुस्ती केली जात नाही. या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आयुक्तांनी प्रभाग अधिकाºयांवर सोपवली असली तरी आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवण्यात येत आहेत.कचोरे येथील बीएसयूपीच्या घरात ४०० सदनिकाधारक राहतात. या सदनिकाधारकांनी देखभाल दुरुस्तीकरिता ३७ हजार ५०० रुपये महापालिकेत जमा केले आहेत. मात्र तरीही त्याठिकाणी महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीच केली जात नाही. इमारतीच्या आवारातील कचरा उचलला जात नाही. इमारतीत झाडलोट केली जात नाही. इमारतीसाठी असलेली लिफ्ट ही चार ते पाच दिवस बंदच असते. सदनिकाधारक त्याठिकाणी राहण्यासाठी गेले त्याला १८ महिने उलटून गेले. १८ महिन्यानंतरही सदनिकाधारकांना महापालिकेनी ताबापत्र दिलेले नाही. त्यामुळे सदनिकाधारकांना सोसायटी स्थापन करण्यात अडसर येत आहे. इमारतीला दिलेले सुरक्षा रक्षक नीट काम पाहत नाहीत. वृद्ध व्यक्तीची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. रिक्त सदनिकांमध्ये अवैध धंदे करणारे लोक घुसले आहेत. ते वृद्ध सुरक्षा रक्षकांना दमदाटी करुन मनमानी करतात. अनेक लोक घरात जबरदस्तीने घुसले असून त्यांनी रिक्त सदनिकांचा ताबा घेतला आहे. या सगळ््या तक्रारींचा पाढा गुलशन नगर चॅरिटेबल ट्रस्टचे हबीब शेख यांनी वाचला आहे. शेख यांचे बीएसयूपी योजनेत घर नाही. त्याठिकाणी त्यांचे भाऊ राहतात. त्या ठिकाणी राहत असलेले राशीद खान व जाफर खान यांनी शेख यांच्याकडे हा विषय मांडला. त्यांनी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. देखभाल दुरुस्तीचा खर्च ३७ हजार ५०० रुपये भरुनही देखभाल दुरुस्तीकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. याकडे शेख यांनी लक्ष वेधले. जवळपास ६०० सदनिका वाटप न झाल्याने धूळ खात पडलेल्या आहेत. त्याठिकाणी एक पोलीस चौकी उभारल्यास बेकायदा हालचालींना वचक बसेल, असे शेख म्हणाले.कचोरे बीएसयूपी प्रकल्पात १ हजार ८२ घरे बांधून तयार होती. त्यापैकी ४४३ घरे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली होती. ज्यांनी पैसे भरले त्यांना ताबा दिलेला आहे. ताबा देण्याची ४०० प्रकरणे प्रलंबित असतील असा आरोप शेख यांनी केला असला तरी त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट करीत १० ते २० सदनिकाधारकांचा ताबा देणे बाकी असेल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.तत्कालीन आयुक्त ई रवींद्रन यांनी बीएसयूपी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतीची देखभाल दुरुस्ती जोपर्यंत सोसायटी स्थापन होत नाही, तोपर्यंत करायची आहे, असे स्पष्ट केले. त्याची जबाबदारी संबंधित प्रभाग अधिकाºयाकडे असेल. इमारतीच्या लिफ्ट नादुरुस्त झाल्या असून खिडक्यांच्या काचा फुटल्या असतील तर त्याची दुरुस्ती प्रभाग क्षेत्रातील उपअभियंत्याने करायची आहे. त्यासाठी महापालिका निधीतून पैसे खर्च केले जातील. हा आदेश वर्षभरापूर्वी रवींद्रन यांनी दिला होता. त्यांच्या पश्चात पी. वेलरासू आयुक्त आले. त्यांची बदली झाल्यानंतर आता आयुक्त गोविंद बोडके काम पाहत आहे. अद्याप रवींद्रन यांच्या आदेशाची अंंमलबजावणी महापालिका प्रभाग अधिकाºयांकडून केली गेली नाही. त्यांच्या विरोधात नंतरच्या आयुक्तांनी कारवाईचा बडगा अद्याप उगारलेला नाही.