शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

शहापूरमधील प्रस्थापितांना दणका; बलाढ्य उमेदवारांना घरचा रस्ता, राष्ट्रवादी, शिवसेनेचा वर्चस्वाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 09:17 IST

शहापूर तालुक्यात २०२१ च्या सुरुवातीस गेल्यावर्षीच्या मुदत संपलेल्या, पण कोरोना महामारीमुळे पुढे ढकलेल्या दहिवली, चेरपोली, अल्याणी, भावसे, डोलखांब या पाच ग्रामपंचायतींसाठी १५ तारखेला मतदान झाले होते. एकूण सदस्य संख्या ५१ साठी १३५ अर्ज दाखल केले होते.

भातसानगर : १५ तारखेला घेतलेल्या पाच ग्रामपंचायतींचे निकाल साेमवारी जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादीने तीन, तर शिवसेनेने चार ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. राष्ट्रवादीने दहिवली, चेरपोली, अल्याणी, तर शिवसेनेने चेरपोली, डोलखांब, भावसे, आल्याणी ग्रामपंचायती जिंकल्याचे परस्पर दावे केले आहेत.शहापूर तालुक्यात २०२१ च्या सुरुवातीस गेल्यावर्षीच्या मुदत संपलेल्या, पण कोरोना महामारीमुळे पुढे ढकलेल्या दहिवली, चेरपोली, अल्याणी, भावसे, डोलखांब या पाच ग्रामपंचायतींसाठी १५ तारखेला मतदान झाले होते. एकूण सदस्य संख्या ५१ साठी १३५ अर्ज दाखल केले होते. पैकी ४५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे १९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये दहिवली ०६, चेरपोली ०३, आल्याणी ५, भावसे १, डोळखांब ४, उर्वरित ३२ जागांसाठी ७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये ३५ महिला उमेदवार, तर ३६ पुरुष उमेदवार निवडणूक लढवत होत्या. आजच्या मतमोजणीत बलाढ्य उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. सहाव्यावेळी निवडणूक लढविणारे माजी उपसरपंच विठ्ठल भेरे व दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे भाचे धीरज झुगर यांना पराभवाचा सामना करावा लागला. मागील वर्षी घरकुले मंजूर न झाल्याने ती या ग्रामपंचायतींना कोणत्याही लाभार्थ्याला देता आली नाहीत. तर पाणीपुरवठा हा कळीचा मुद्दा अनेक ग्रामपंचायतींमध्ये बनला होता.भावसे ग्रामपंचायतीतील अभिमन्यू ठाकरे, जनार्दन महाले, नयना भुसारे, सुधीर गोधडे, रोशनी वरठा, प्रज्ञा वेखंडे, छाया धपाटे, आराध्या महाले हे उमेदवार विजयी झाले आहेत. अल्याणी ग्रामपंचायतीत विनायक सापळे तीनवेळा पराभव पत्करल्यानंतर पहिल्यांदा विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अन्य दर्शना घोडविंदे, बुधाजी वाघ, मनोज दळवी हे विजयी झाले आहेत. चेरपोली ग्रामपंचायतीत जगदीश पवार हे तालुक्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले असून, त्यांना ६९७ इतकी मते मिळाली आहेत, तर अन्य चारुशीला भोये, ज्योती भोईर, प्रज्वल जाधव, ऋतुजा गावित, सुनील पांढरे, वैशाली मोरघे, राजश्री भोईर, किरण गोरे, सचिन शेलार, सुनील भेरे, तर ज्योती म्हसकर व अश्विनी फराड यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने ज्योती म्हस्कर विजयी झाल्या, तर धीरज झुगरे यांचा चार मतांनी पराभव झाला. त्यांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी करूनही निकाल कायम राहिला, तर भावसे ग्रामपंचायतीत सुधीर गोडदे, रोशनी वराठा, प्रज्ञा वेखंदे, छाया धाप आराध्या महाले, डोलखांबमध्ये उज्वला सांबरे या विजयी झाल्या आहेत. दहिवली ग्रामपंचायतीतून अरुण पाटील, निराबाई मुकणे, जयश्री पाटील, तर डोलखांब ग्रामपंचायतीत उज्वला सांबरे, सुधाकर वाघ, रवींद्र फर्डे, सुरेश मुकणे, करुणा चौधरी हे विजयी झाले आहेत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लाेष केला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतthaneठाणेElectionनिवडणूक