शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

‘बारवी’ क्षेत्रात पावसाचा जोर, मुुंबईची पाणी चिंता कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 01:52 IST

मुुंबईची पाणी चिंता कायम : अन्य धरण पाणलोट क्षेत्रात प्रमाण कमी

ठाणे : मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत केलेल्या या पावसाचा जोर बारवी धरणवगळता अन्य धरणांमध्ये नाही. धरणांचे तालुके म्हणून ओळखल्या जाणाºया शहापूर, मुरबाडला तर अनुक्रमे ४८ मिमी आणि २४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत मोडकसागरसह तानसा, बारवी धरणांत १०० टक्के पाणीसाठा होऊन ते भरले होते. मात्र, या पावसाळ्यात धरणांमध्ये आजपर्यंत कमीअधिक ५० टक्कयांपर्यंत पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्याविषयी चिंता वाढली आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची गरज आहे. अन्यथा, यंदा पाणीकपात अटळ दिसून येत आहे. मुंबईला ३०० मिमीपेक्षा अधिक पडलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण, या महानगरास आधीच २० टक्के पाणीकपात लागू केली आहे. पाणीपुरवठा करणाº­या भातसा धरणात अवघा ५६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.भातसात ५८ टक्के तर तानसात अवघा ३५ टक्के पाणीसाठामुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडक सागर धरण गेल्या वर्षी १०० टक्के भरले होते. पण, गुरुवारी या धरणात फक्त ४६ टक्के पाणीसाठा आहे. येथे गुरुवारी ४१ मिमी पाऊस पडला. भातसा धरणात ५८ टक्के पाणीसाठा तयार झाला. गेल्या वर्षी तो ८८ टक्के होता. या धरणात गुरुवारी फक्त ५६ मिमी पाऊस पडला. तानसा धरणात फक्त ३५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो ९९ टक्के होता.तर, गुरुवारी ७६ मिमी पाऊस पडला. मध्य वैतरणा धरणात आतापर्यंत ४१ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो ९३.९४ टक्के होता. गुरुवारी या धरणात २९ मिमी पाऊस पडला. धरणांतील या चिंताजनक पाणीसाठ्यामुळे काळजी वाढली आहे. आगामी दिवसात धरणांच्या या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.बारवीत ५३ टक्के पाणीसाठा : ठाणे जिल्ह्यातील शहरांना, उद्योग, कारखाने आणि कंपन्यांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात ५३ टक्के पाणीसाठा झाला आहे. गुरुवारी केवळ १०४ मिमी पाऊस पडला. तर, पाणलोट क्षेत्रातील कानिवरे १२७, कानहोळ ३८, पाटगावला ५२ आणि ठाकूरवाडीला ५१ मिमी पाऊस पडला आहे. या धरणात सरासरी ६७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या धरणाची पाणीपातळी ७२.६० मीटरपैकी सध्या ६५.६८ मीटर आहे. गेल्या वर्षी धरणात ९७ टक्के आजच्या दिवसापर्यंत असलेला पाणीसाठा आतापर्यंत ५३ टक्के झाला आहे. आंध्रा धरणात ३७ टक्के पाणीसाठा आहे. येथे गुरुवारी ५९ मिमी पाऊस पडला.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस