शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

डोंबिवलीत फेरीवाल्यांचा रोजगार हक्क मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 2:57 PM

डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात 150 मीटर परिसरातून फेरीवाल्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

डोंबिवली - डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात 150 मीटर परिसरातून फेरीवाल्यांना बाहेर काढण्यात आले आहे. आम्हाला पर्यायी जागा दिली नाही तर आम्ही उपाशी रहायचे का?  त्यामुळे जो पर्यंत पर्यायी जागा देणार नाही तो पर्यंत आम्ही तिथेच बसणार आहोत. पोलीस कारवाई झाली तरी चालेल पण आमच्या सामानाचा पंचनामा झाला पाहिजे अशी मागणी करत फेरीवाल्यांनी केडीएमसीवर शुक्रवारी (19 ऑक्टोबर) दोन तास मोर्चा काढला होता. 

कष्टकरी हॉकर्स व भाजीविक्रेता युनियनच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला होता. रोजगार हक्क मोर्चाला शेकडो फेरीवाले उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी नेतृत्व करत संगितले की, व्यवसाय करणे हा आमचा हक्क आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे आजपासून आपण स्थानक परिसरात बसणारच. भले कारवाई होऊ दे, अटक होऊ दे, पण समानाचे पंचनामे करण्यात यावेत ही मागणी कांबळे यांनी केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला 1 वर्षे होणार असून आद्यपही आम्हाला हक्काची जागा मिळलेली नाही. त्यात दबावतंत्र करण्यात येत आहे, हे योग्य नाही याची नोंद घ्यावी. फेरीवाल्यांना पथ विक्रेता प्रमाणपत्र (वेडिंग सर्टिफिकेट) तातडीने देण्यात यावे, तापूर्ती जागा विनाविलंब  देण्यात यावा. याची अमलबजावणी झाली नाही तर मात्र आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नसून तसे झाल्यास त्याची जबाबदारी ही शासनाची राहील असेही सांगण्यात आले. त्यांच्या मागण्याचे निवेदन युनियनने ग प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत याना दिले. त्यावेळी कांबळे, राजेंद्र सोनवणे, मधु बिरमोळे, आशा मगरे, नूतन रणदिवे, भाऊ पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी सांगितले की, आम्ही कायदा सुव्यवस्था पाळणार, न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही होणे महत्त्वाचे असून त्याचे उल्लंघन कोणी करू नये, अन्यथा कार्यवाही करावी लागणारच असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीhawkersफेरीवाले