शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

नदी पात्रातील उग्र वासाने नागरिक हैराण; उल्हासनगराला वालधुनी नदी ठरते शाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 16:08 IST

प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्याकडून नदीची पाहणी

- सदानंद नाईक

उल्हासनगर : वालधुनी नदी पात्रातून मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता वडोलगाव व नदी किनारील परिसरात उग्र वास आल्याने, नागरिकांना श्वसनासह इतर त्रास होऊ लागला. स्थानिक नगरसेवकांसह समाजसेवक शिवाजी रगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन, पोलीस व प्रदूषण मंडळाला माहिती दिली.

 उल्हासनगरातून वाहणारी वालधुनी नदी गटारगंगा झाली असून नदी पत्रात केमिकल कंपन्या टाकाऊ विषारी द्रव सोडत आहे. मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान वडोलगाव परिसरात नदी पात्रातून उग्र वास आल्याने, नागरिक घरा बाहेर पडले. श्वसनसह इतर त्रास नागरिकांना होत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नगरसेवक गजानन शेळके यांच्यासह समाजसेवक शिवाजी रगडे, रामेश्वर गवई आदींनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली. प्रदूषण मंडळासह पोलिसांना माहिती दिली. बुधवारी सकाळी प्रदूषण मंडळाचे अधिकारी, पोलीस यांनी स्थानिकांच्या मदतीने नेहमी प्रमाणे नदी किनाऱ्याची पाहणी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे.

 गुजरात, पुणे आदी ठिकाणाहून आणलेले विषारी सांडपाणी टँकरद्वारे नदी पात्रात वेगवेगळ्या ठिकाणाहून सोडले जात असल्याचे बोलले जाते. नदी पात्रात पाणी कमी असल्याने सोडलेल्या विषारी द्रवाचा उग्र वास परिसरात येतो. उग्र वासाने श्वसनाच्या त्रासासह उलट्या, डोळे चुरचुरने, अंगाला खास सुटण्याचा प्रकार होत आहे. गेल्या महिन्यातही कैलास कॉलनी, भरतनगर, समतानागर आदि नदी किनारी परिसरात रात्रीच्या वेळी उग्र वास आल्याने, नागरिक भीती पोटी घराबाहेर पडले होते. त्यापूर्वी वडोलगाव, संजय गांधीनगर, सम्राट अशोकनगर आदी परिसरात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. एकुणच वालधुनी नदी शहराला वरदान ठरण्या ऐवजी शाप ठरली आहे.

संच्युरी कंपनी रक्षकांनी पकडलेल्या टँकर मधील विषारी द्रव अतिघातक 

गेल्या आठवड्यात संच्युरी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना कंपनी शेजारील नाल्यातून उग्र वास येत असल्याने, नाल्याची पाहणी केली. तेंव्हा शेजारी उभ्या असलेल्या टँकरमधून तसाच उग्र वास येत असल्याने, टँकर चालकाकडे सुरक्षा रक्षकांनीचौकशी केली असता, चालक पळून गेला. याबाबतची माहिती उल्हासनगर पोलीस, प्रदूषण मंडळ यांना देऊनही कारवाई झाली नोव्हती. अखेर संच्युरी कंपनीच्या रक्षकांनी तक्रार दिल्यावर टँकर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. दरम्यान टँकर मधील टाकाऊ द्रव अतिघातक असल्याचा अहवाल उघड झाला आहे. शहराच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरriverनदी