शहरं
Join us  
Trending Stories
1
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
2
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
3
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
4
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
5
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
6
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
7
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
8
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
9
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
10
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
12
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
13
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
14
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
15
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
16
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
17
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
18
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
19
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
20
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ

नदी पात्रातील उग्र वासाने नागरिक हैराण; उल्हासनगराला वालधुनी नदी ठरते शाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 16:08 IST

प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्याकडून नदीची पाहणी

- सदानंद नाईक

उल्हासनगर : वालधुनी नदी पात्रातून मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता वडोलगाव व नदी किनारील परिसरात उग्र वास आल्याने, नागरिकांना श्वसनासह इतर त्रास होऊ लागला. स्थानिक नगरसेवकांसह समाजसेवक शिवाजी रगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन, पोलीस व प्रदूषण मंडळाला माहिती दिली.

 उल्हासनगरातून वाहणारी वालधुनी नदी गटारगंगा झाली असून नदी पत्रात केमिकल कंपन्या टाकाऊ विषारी द्रव सोडत आहे. मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान वडोलगाव परिसरात नदी पात्रातून उग्र वास आल्याने, नागरिक घरा बाहेर पडले. श्वसनसह इतर त्रास नागरिकांना होत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नगरसेवक गजानन शेळके यांच्यासह समाजसेवक शिवाजी रगडे, रामेश्वर गवई आदींनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली. प्रदूषण मंडळासह पोलिसांना माहिती दिली. बुधवारी सकाळी प्रदूषण मंडळाचे अधिकारी, पोलीस यांनी स्थानिकांच्या मदतीने नेहमी प्रमाणे नदी किनाऱ्याची पाहणी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे.

 गुजरात, पुणे आदी ठिकाणाहून आणलेले विषारी सांडपाणी टँकरद्वारे नदी पात्रात वेगवेगळ्या ठिकाणाहून सोडले जात असल्याचे बोलले जाते. नदी पात्रात पाणी कमी असल्याने सोडलेल्या विषारी द्रवाचा उग्र वास परिसरात येतो. उग्र वासाने श्वसनाच्या त्रासासह उलट्या, डोळे चुरचुरने, अंगाला खास सुटण्याचा प्रकार होत आहे. गेल्या महिन्यातही कैलास कॉलनी, भरतनगर, समतानागर आदि नदी किनारी परिसरात रात्रीच्या वेळी उग्र वास आल्याने, नागरिक भीती पोटी घराबाहेर पडले होते. त्यापूर्वी वडोलगाव, संजय गांधीनगर, सम्राट अशोकनगर आदी परिसरात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. एकुणच वालधुनी नदी शहराला वरदान ठरण्या ऐवजी शाप ठरली आहे.

संच्युरी कंपनी रक्षकांनी पकडलेल्या टँकर मधील विषारी द्रव अतिघातक 

गेल्या आठवड्यात संच्युरी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना कंपनी शेजारील नाल्यातून उग्र वास येत असल्याने, नाल्याची पाहणी केली. तेंव्हा शेजारी उभ्या असलेल्या टँकरमधून तसाच उग्र वास येत असल्याने, टँकर चालकाकडे सुरक्षा रक्षकांनीचौकशी केली असता, चालक पळून गेला. याबाबतची माहिती उल्हासनगर पोलीस, प्रदूषण मंडळ यांना देऊनही कारवाई झाली नोव्हती. अखेर संच्युरी कंपनीच्या रक्षकांनी तक्रार दिल्यावर टँकर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. दरम्यान टँकर मधील टाकाऊ द्रव अतिघातक असल्याचा अहवाल उघड झाला आहे. शहराच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरriverनदी