शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पदराने दीड लाख लिटर दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:03 IST

मुंबईसह जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या क्षेत्रात ग्रामीण भागातून गायी, म्हशीच्या सुमारे एक लाख ६० हजार लिटर ताज्या दुधाचा पुरवठा होत आहे

ठाणे : मुंबईसह जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या क्षेत्रात ग्रामीण भागातून गायी, म्हशीच्या सुमारे एक लाख ६० हजार लिटर ताज्या दुधाचा पुरवठा होत आहे. मात्र, यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाºया अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी तालुक्यातील शेतकºयांना अवघा ४० ते ५० रूपये अल्प दर मिळत असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.मुंबई, ठाणे परिसरातील दुधांची गरज पूर्ण करण्यासाठी राज्यातील अन्य जिल्ह्यांसह गुजरात राज्यातून मोठ्याप्रमाणात येत आहे. मात्र या दुधाची गरज पूर्ण करण्याची क्षमता मुंबईचे प्रवेशव्दार असलेल्या ठाणे जिल्ह्यात आहे. त्याकडे लक्ष केंद्रीत करून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून तांदूळ उत्पादनासह भाजीपाल्यात गुंतलेल्या शेतकºयांना दुग्ध उत्पादनाकडे वळवण्याची काळाची गरज आहे. दुग्ध उत्पादनासह संकलन क्षमता असल्यामुळे जिल्ह्यात विविध कंपन्या पाय पसरवित आहेत. प्रारंभी या कंपन्यांनी फॅट (स्निग्धता) न लावता शेतकºयांकडून दूध संकलीत केले. आता मात्र फॅट लावून दूध घेत असल्याचे वास्तव उघडकीस आले. यास शासनाच्या पशुसंवर्धन विभागानेदेखील दुजोरा दिला.सुमारे सात ते आठ फॅटच्या दुधास या कंपन्यांकडून मागणी आहे. परंतु, या स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकरी कमी पडत आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन अवघ्या ४० ते ५० रूपये लिटर दराने त्यांच्याकडून दूध घेत असल्याचे मुरबाडमधील शेतकºयांकडून सांगितले जात आहे.जिल्ह्यात पावसाळ्यानंतर फारसा हिरवा चारा, गवत तेथील गायी, म्हशीना मिळत नाही. दर्जेदार पशूखाद्याची मागणी नसल्यामुळे ७ ते ८ फॅटचे दूध मिळत नाही. केवळ ६ फॅटच्या दुधाचे उत्पादन जिल्ह्यात मिळत आहे. दुधाचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यातील माळरानाचा चांगला उपयोग करणे शक्य होईल. त्यासाठी सहकार क्षेत्रातून दूध डेअरीची स्थापना होणे अपेक्षित असल्याचे टीडीसीसी बँकेच्या पशूधन विभागाचे डॉ. प्रकाश भोंडीवले यांनी लोकमतला सांगितले.टीडीसीसी बँकेकडे ज्या सोसायट्या आहेत. त्या केवळ मतदाना पुरत्या असल्याचा आरोपही बांगर यांनी केला. मात्र, टीडीसीसी बँकेने हा आरोप खोडून जिल्ह्यातील शेतकºयांना दुग्ध उत्पादनासाठी दहा कोटी ५८ लाखांचे कर्ज म्हशींच्या खरेदीसाठी दिल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर दुग्ध उद्योजक विकास योजनेअंतर्गत ७६६ सभासदांना सहा कोटी ४० लाख ५५ हजार रूपये अनुदान तत्त्वावर दिले आहेत.२८ फेब्रुवारीपर्यंत या योजनेव्दारे शेतकºयाना प्रस्ताव सादर करता येणार आहे. या योजनेव्दारे आतापर्यंत ८७५ सभासदाना आठ कोटी १३ लाख रकमेचे क्लेम मंजूर आहेत . त्यातून सहा कोटी ४० लाख ५५ हजार रूपये अनुदान प्राप्त झाले आहेत. उर्वरित १०९ सभासदांंंचे एक कोटी ७२ लाखांचे क्लेम प्रलंबित असल्याचा दावा टीडीसीसी बँकेने केला आहे.दुग्ध उत्पादनास वावजिल्ह्यात सद्यस्थितीला दोन लाख गायी, म्हशी आदी जनावरे आहेत. त्यातील काही भाकड गायी, म्हशी वगळता सुमारे १० ते १५ हजार दुभत्या गायी म्हशी असल्याचा अंंदाज आहे. त्याव्दारे एक लाख ६० हजार लिटर दूधाचे ग्रामीण भागात उत्पादन होत आहे. मात्र, त्या मोबदल्यात शेतकºयांना फारसा आर्थिक लाभ होत नसल्याची खंत मुरबाड येथील बांगर या दुग्ध व्यवसाय शेतकºयांने व्यक्त केली.पंतप्रधानांच्या पुढाकाराने ‘अमुल’चा शिरकावमुंबईला ३० हजार लिटर दुधाचा पुरवठा करणाºया अमुल कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने शेतकºयांच्या प्रयत्नातून ठाणे जिल्ह्यात प्रवेश केला आहे. शहापूर, मुरबाड परिसरात त्यांची यंत्रणा कार्यरत आहे. जिल्ह्यातील दूध अमूलने घ्यावे म्हणून शेतकºयांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर अमुलने जिल्ह्यात हातपाय पसरले आहेत.भिवंडीच्या गोवे येथे मदर डेअरीचा लवकरच प्रकल्पशासनाच्या प्रयत्नाने मदर डेअरी फ्रु ट अ‍ॅन्ड व्हिजिटेबल या कंपनीने भिवंडीजवळील गोवे येथे सात हेक्टरमध्ये कंपनी उभारण्याची तयारी सुरू केली आहे. सुमारे पाच लाख लिटर दूध ही कंपनी दिवसाला संकलीत करणार आहे. या कंपनीला दुग्ध विकास विभागाने जागा देऊन कंपनी उभारण्यास सहमती दिली आहे. या कंपन्याबरोबर शेतकºयांचे हित सांभाळणाºया सहकार क्षेत्रातून अन्य जिल्ह्यांप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन शेतकºयांसाठी डेअरी स्थापनेची शेतकºयांची मागणी आहे. मात्र, त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त होते.