शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

पूरग्रस्त कुटुंबीयांना मिळणार भरीव मदत : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 23:37 IST

देवेंद्र फडणवीस : २00५ पेक्षाही जास्त मदत करणार

बदलापूर : शिवसेना आणि भाजपची सत्ता म्हणजे रयतेची सत्ता आहे. शिवरायांना अभिप्रेत असलेली कामे आमचे सरकार करत आहे. सरकारचे सर्व निर्णय जनहितासाठीच घेतले जात आहेत. महापुरात बाधित झालेल्या प्रत्येक कुटुंबाचा संसार उभा करण्यासाठी भरीव मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले.

मुरबाड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, नवे पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीचे उद्घाटन, मुरबाड बसआगार, धान्यसाठवणगृह आणि म्हसा महाविद्यालयाचे भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमांचा मोठा सोहळा मुरबाडमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस यांनी २७ जुलैच्या महापुरात ठाणे जिल्ह्यासह बदलापुरातील बाधित कुटुंबीयांना भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. २००५ च्या महापुरात जी मदत करण्यात आली होती, त्यापेक्षा जास्त मदत कशी करता येईल, याचा निर्णय शासन घेणार आहे. त्यासाठी स्वतंत्र आदेशदेखील काढले जातील, असे ते म्हणाले. पूरपरिस्थितीत नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी शासनस्तरावर आम्ही घेतलेले निर्णय हे योग्य ठरले आहेत. पुरात कोणतीही जीवितहानी होणार नाही, याची काळजी सरकारने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुरबाडमधील विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले की, शिवाजी महाराजांचा पुतळा हा ऊर्जा देणारा आहे. केवळ पूजा करण्यापेक्षा नागरिकांनी छत्रपतींना अभिप्रेत असलेले राज्य निर्माण करण्यासाठी हातभार लावण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच पोलीस स्टेशन असल्याने पोलीसही आता यातून ऊर्जा घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुरबाड मतदारसंघात काम करताना याठिकाणी नागरिकांना काय हवे आहे, याची कल्पना आमदार कथोरे यांना आहे. त्यामुळे ते शासनाकडे पाठपुरावा करताना तशा पद्धतीनेच मागणी करतात. त्यामुळे त्यांची मागणी शासन नाकारत नसून, त्यामुळे मुरबाड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. एमएमआरडीए क्षेत्रात मुरबाडचाही समावेश केल्याने आता मुरबाडला दुहेरी मदत होणार आहे. पूर्वीचे सरकार एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात केवळ ५०० ते ६०० कोटींची कामे करत होते. मात्र, विद्यमान सरकारच्या काळात एकाच विधानसभा मतदारसंघात ५०० कोटींपेक्षा जास्तीची कामे होतात. एमएमआरडीएचा लाभ खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याला झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.च्मुरबाडच्या शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याची उंची चौथºयासह ३० फूट असल्याने या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी मागवण्यात आली होती. उंच शिडीच्या या गाडीच्या मदतीने मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याला हार अर्पण केला.च्मुरबाडमध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे उद्घाटन करत असताना मुख्यमंत्र्यांनी या कामाचे कौतुक केले. खाजगी गृहसंकुलाप्रमाणे पोलीस वसाहत आणि पोलीस स्टेशन उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfloodपूरbadlapurबदलापूर