शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान, धन कधी?; निवडणुकीत कर्तव्य बजावणारे कर्मचारी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:09 IST

१४३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला झाले होते मतदान 

सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाली. मात्र, त्याला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊनही या निवडणुकीत काम केलेले अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांना मानधन मिळालेले नाही. यामुळे अशा दोन हजार ९०० अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर्तव्य बजावण्याचा केवळ मान मिळाला, पण आता धनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा सूर आहे.

जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यात १४३ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी १५ जानेवारीला मतदान झाले आहे. एप्रिल ते डिसेंबरदरम्यान मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींमधील एक हजार ४७२ सदस्यांसाठी निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी चार हजार ३८ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी आठ ग्रामपंचायतींमधील ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ४७९ मतदान केंद्रांवर मतदान झाले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रिंगणात दोन हजार ४१३ उमेदवार होते. या निवडणुकीसाठी दोन लाख ५० हजार ५०० मतदारांकरिता ४७९ मतदान केंद्रे होती. 

तीन हजार पोलिसांचा होता फौजफाटाग्रामपंचायत निवडणुकीवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यात ग्रामीण कार्यक्षेत्रात पाच उपअधीक्षकांसह दीड हजार पोलीस कर्मचारी, तर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलीस उपायुक्तांसह एक हजार पोलीस व अधिकारी असा सुमारे अडीच ते तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. या मनुष्यबळावर निवडणुका निर्विघ्नपणे पार पडल्या आहेत. 

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला निवडणूक प्रक्रियेसाठी २१ हजारांचा निधी दिला होता. निवडणुकीआधी आठ हजार रुपये आणि त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीला १३ हजारांचा निधी वाटप केला आहे. यात निधीतून मानधनाची रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांना देणे शक्यच झाले नाही. या मानधनासह अन्य खर्च झालेली रक्कम तालुका पातळीवरून वेळेत मिळणे अपेक्षित आहे; पण या रकमेची काही तालुक्यांनीच मागणी केली आहे.

तालुकानिहाय आढावातालुका    ग्रामपंचायती    सदस्य मुरबाड    ४४    ३३८ठाणे    ५    ५१ अंबरनाथ    २७     २४७ भिवंडी    ५६    ५७४ कल्याण    २१    २११शहापूर    ५    ५१ 

टॅग्स :Electionनिवडणूक