शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सरकारचा अध्यादेश : पं. भीमसेन जोशी रुग्णालयात अखेर ३६५ पदांना मिळाली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:10 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील वर्षभरापासून रेंगाळलेल्या ३६५ पदनिर्मितीला अखेर राज्य सरकारने १६ जानेवारीला मान्यता दिल्याचा अध्यादेश २६ फेब्रुवारीला काढण्यात आला.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील वर्षभरापासून रेंगाळलेल्या ३६५ पदनिर्मितीला अखेर राज्य सरकारने १६ जानेवारीला मान्यता दिल्याचा अध्यादेश २६ फेब्रुवारीला काढण्यात आला. यामुळे रुग्णालय हस्तांतरणाच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी सांगितले.पालिकेने १० जानेवारी २०१६ रोजी लोकार्पण केलेल्या या रुग्णालयाच्या हस्तांतरणाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी हिरवा कंदील दाखवला. त्याला ३० नोव्हेंबर २०१६ च्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. दरम्यान, ९ आॅगस्ट २०१६ रोजी पालिकेने रुग्णालय हस्तांतरणाचा प्रारूप सामंजस्य करार राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवला असता त्याला मान्यता देण्यात आली. यामुळे रुग्णालय हस्तांतरणातील तांत्रिक अडसर दूर झाल्याने पालिका व आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे यांच्यामध्ये सामंजस्य करार होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच रुग्णालयासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने हस्तांतरणात पदनिर्मिती मंजुरीअभावी अडसर निर्माण झाला.पालिका आस्थापनावरील सुमारे ३६ अधिकारी व कर्मचारी सरकारी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परंतु, हे रुग्णालय चालवण्यासाठी शंभरहून अधिक मनुष्यबळ आवश्यक ठरणार असल्याने त्यांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेअभावी लालफितीत अडकला. पदनिर्मितीचा निर्णय राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोअर कमिटीकडे मंजुरीसाठी वर्ग केल्याने त्याच्या प्रतीक्षेत पालिका असताना जिल्हा शल्यचिकित्सकांनी सामंजस्य करारालादेखील बासनात गुंडाळले.पदनिर्मितीनंतरच करार करणे हितावह असल्याचे त्यांच्याकडून पालिकेला कळवल्याने रुग्णालय हस्तांतर रेंगाळले. अखेर, १६ जानेवारीला कोअर कमिटीच्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत रुग्णालयातील एकूण ३६५ पदनिर्मितीला मान्यता देण्यात आली. रुग्णालयात कार्यरत असलेल्या ३६ पैकी ३५ अधिकारी व कर्मचाºयांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याखेरीज, नियमित १०२ पदांना मंजुरी दिली असून ‘क’ गटातील अधिपरिचारिकांचा समावेश आहे.१६८ काल्पनिक कुशल पदांमध्ये बालरोग परिचारिकांपासून ते सिटी स्कॅन विभागातील ‘क’ गटातील कक्षसेवकाचा समावेश आहे. ३६ पदांवर कंत्राटी कर्मचारी व कामगारांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.मालमत्तेची नोंद सरकार नावे नाही-या रुग्णालयाच्या मालमत्तेची नोंद राज्य सरकारच्या नावे अद्याप झाली नसली, तरी पदनिर्मितीच्या मान्यतेमुळे रुग्णालय हस्तांतरणाच्या सामंजस्य कराराला गती मिळून काही दिवसांतच रुग्णालय राज्य सरकारमार्फत चालवले जाणार असल्याचे डॉ. पडवळ यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक