Mumbra Train Accident Today in Marathi: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे मार्गावर दुर्दैवी घटना घडली. गर्दीमुळे दारात लटकून प्रवास करत असलेले काही प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ खाली पडले. यात काही जणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल बोलताना काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड केंद्र सरकारवर भडकल्या. मुंबईत नोकरी करायाला जाणे म्हणजे जीवासोबत खेळण्यासारखे झाले आहे, असे त्या म्हणाल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंब्रातील लोकल रेल्वे घटनेबद्दल वर्षा गायकवाड म्हणाल्या, "आम्ही संसदेत वारंवार सांगितले की, रोज जवळपास ७ लोकांचा मुंबई लोकलमधून पडून मृत्यू होत आहे. आज भरलेल्या कसारा लोकल ट्रेनमधून पडून ५ लोकांचा मृत्यू झाला. तर इतर जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयाप्रती सहवेदना व्यक्त करते."
सरकार गंभीर दिसत नाहीये
वर्षा गायकवाड यांनी पुढे म्हटले आहे की, "मुंबईत नोकरी करायला जाणे आता जीवाशी खेळण्यासारखे बनले आहे. आम्ही वारंवार संसदेत मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये वाढत्या अपघातांचा मांडला. पण, या विषयावर सरकार गंभीर दिसत नाहीये."
वाचा >>ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू
"आयुष्यभर कष्ट उपसणाऱ्या मुंबईकरांच्या जीवाची काही किंमत नाहीये का? सातत्याने सातत्याने अपघात होत असूनही रेल्वे मंत्री रील मंत्री बनले आहे. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी माझी मागणी आहे", असे खासदार गायकवाड म्हणाल्या.
"रेल्वे प्रशासनाने उपनगरीय रेल्वे सेवेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमी जितकी शक्य आहे, तितकी तात्काळ केली जावी. मुंबईच्या लाइफलाइनला डेथ लाइन बनवणाऱ्या या सरकारची जितकी निंदा करावी तितकी कमीच आहे", अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.