शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

उल्हासनगरातील जीन्स कंपन्यांच्या बाबत तोडगा काढा, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे राज्य सरकारला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 7:50 PM

उल्हासनगर येथील जीन्स कंपन्यांच्या संदर्भात तातडीने तोडगा काढण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणिकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे.

ठाणे - उल्हासनगर येथील जीन्स कंपन्यांच्या संदर्भात तातडीने तोडगा काढण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणिकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे. तसेच, पालकमंत्री शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करून तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी यांचे सचिव आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी यांची बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले.

उल्हासनगर येथील जीन्स कारखान्यांमुळे वालधुनी आणि उल्हास या नद्यांचे होत असलेले प्रदूषण आणि हे कारखाने बंद होण्यामुळे सुमारे अडिल लाख लोकांवर कोसळणारी बेरोजगारीची कुऱ्हाड या दोन्हीचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होणार नाही, अशा प्रकारे या प्रश्नातून तोडगा काढण्याची मागणी खा. डॉ. शिंदे आणि आमदार डॉ. किणिकर यांनी केली. खा. डॉ. शिंदे यांच्या विनंतीनुसार उद्योगमंत्री  देसाई आणि पर्यावरण मंत्री कदम यांच्या मंत्रालयातील दालनांत मंगळवारी दोन स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. जीन्स कारखान्यांच्या वॉशिंग युनिट्सनाअॅडिशनल अंबरनाथ एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून देणे, या युनिट्समधील सांडपाण्यावर तेथील सीईटीपीमध्ये प्रक्रिया करणे, ज्या ठिकाणी जीन्स कारखाने मोठ्या संख्येने आहेत, तिथे कारखान्यांचे गट करून त्यांच्यासाठी ईटीपी उभारणे आदी पर्यायांची चाचपणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्य शासन याबाबत सकारात्मक असल्याचे  देसाई आणि कदम यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणिकर, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पर्यावरण विभागाचे अप्पर मुख्य सचिव गवई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अल्बनगण, उल्हासनगर जीन्स वॉश वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष परशुराम पाटील, ‘आमा’चे अध्यक्ष उमेश तायडे, औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र केंद्रे,अॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (आमा) अध्यक्ष उमेश तायडे, तसेच ‘एमआयडीसी’ आणि‘एमपीसीबी’चे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमBJPभाजपाulhasnagarउल्हासनगर