शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंना नाईकांचे आव्हान; ठाण्यात जनता दरबार सुरू करणार; म्हणाले, भाजप स्वबळावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 05:37 IST

महापालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपची युती होणार की नाही, अशी चर्चा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे महापालिका आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यासाठी ठाण्याची जबाबदारी भाजपने वनमंत्री गणेश नाईक यांच्या खांद्यावर सोपवली. ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत देत ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा नाईक यांनी मंगळवारी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  कोपरी मतदारसंघातील कार्यक्रमात नाईक यांनी ही घोषणा केल्याने ठाण्यात नाईक विरूध्द शिंदे असा सामना रंगणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

शिंदेसेनेकडून आगामी सर्वच निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याचे संकेत दिले जात आहेत. परंतु, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह आता मंत्री नाईक यांनी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपची युती होणार की नाही, अशी चर्चा आहे. 

यापूर्वी दोन नेत्यांमध्ये काय घडले होते?ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी भाजप श्रेष्ठींनी नाईक यांच्या  खांद्यावर दिली आहे. नाईक  आणि शिंदे यांचे यापूर्वीदेखील  पटले नव्हते.  लोकसभा निवडणुकीत नाईक यांनी शिंदे यांच्या विरोधात थेट नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीत महायुती असतानाही नाईक यांच्या विरोधात ऐरोली मतदारसंघात अपक्ष म्हणून शिंदेसेनेचे विजय चौगुले हे रिंगणात उतरविण्यात आले होते.  परंतु, शिंदेसेनेने चौगुले यांच्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई  केली नाही. त्यामुळे नाईक नाराज झाले.

... म्हणूनच ठाण्याची जबाबदारी माझ्यावर!ठाण्याच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे व नाईक यांच्यात रस्सीखेच होती. अखेर पालघर जिल्ह्याची जबाबदारी नाईक यांच्यावर सोपविण्यात आली.  ठाण्यातील सत्काराच्या कार्यक्रमात नाईक यांनी आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल आणि ठाणे महापालिकेवर कमळ फुलवेल, असे जाहीर केले.  त्यासाठीच ठाण्याची जबाबदारी ही माझ्या खांद्यावर देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा जनता दरबार घेण्याची  घोषणा करून त्यांनी शिंदे यांनाच थेट आव्हान दिले. 

महायुतीमधील प्रत्येक मंत्री हे जनतेसमोर जात आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने एखादा मंत्री काही करत असेल तर त्यात काहीच वावगे नाही.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेतला, तर शिंदेसेनेचे मंत्री पालघर जिल्ह्यात जनता दरबार घेतील. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. सर्वांनी महायुतीचा धर्म पाळावा.नरेश म्हस्के, खासदार, ठाणे

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGanesh Naikगणेश नाईकThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMahayutiमहायुती