शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शिंदेंना नाईकांचे आव्हान; ठाण्यात जनता दरबार सुरू करणार; म्हणाले, भाजप स्वबळावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 05:37 IST

महापालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपची युती होणार की नाही, अशी चर्चा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे महापालिका आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यासाठी ठाण्याची जबाबदारी भाजपने वनमंत्री गणेश नाईक यांच्या खांद्यावर सोपवली. ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत देत ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा नाईक यांनी मंगळवारी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  कोपरी मतदारसंघातील कार्यक्रमात नाईक यांनी ही घोषणा केल्याने ठाण्यात नाईक विरूध्द शिंदे असा सामना रंगणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

शिंदेसेनेकडून आगामी सर्वच निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याचे संकेत दिले जात आहेत. परंतु, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह आता मंत्री नाईक यांनी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपची युती होणार की नाही, अशी चर्चा आहे. 

यापूर्वी दोन नेत्यांमध्ये काय घडले होते?ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी भाजप श्रेष्ठींनी नाईक यांच्या  खांद्यावर दिली आहे. नाईक  आणि शिंदे यांचे यापूर्वीदेखील  पटले नव्हते.  लोकसभा निवडणुकीत नाईक यांनी शिंदे यांच्या विरोधात थेट नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीत महायुती असतानाही नाईक यांच्या विरोधात ऐरोली मतदारसंघात अपक्ष म्हणून शिंदेसेनेचे विजय चौगुले हे रिंगणात उतरविण्यात आले होते.  परंतु, शिंदेसेनेने चौगुले यांच्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई  केली नाही. त्यामुळे नाईक नाराज झाले.

... म्हणूनच ठाण्याची जबाबदारी माझ्यावर!ठाण्याच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे व नाईक यांच्यात रस्सीखेच होती. अखेर पालघर जिल्ह्याची जबाबदारी नाईक यांच्यावर सोपविण्यात आली.  ठाण्यातील सत्काराच्या कार्यक्रमात नाईक यांनी आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल आणि ठाणे महापालिकेवर कमळ फुलवेल, असे जाहीर केले.  त्यासाठीच ठाण्याची जबाबदारी ही माझ्या खांद्यावर देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा जनता दरबार घेण्याची  घोषणा करून त्यांनी शिंदे यांनाच थेट आव्हान दिले. 

महायुतीमधील प्रत्येक मंत्री हे जनतेसमोर जात आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने एखादा मंत्री काही करत असेल तर त्यात काहीच वावगे नाही.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेतला, तर शिंदेसेनेचे मंत्री पालघर जिल्ह्यात जनता दरबार घेतील. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. सर्वांनी महायुतीचा धर्म पाळावा.नरेश म्हस्के, खासदार, ठाणे

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGanesh Naikगणेश नाईकThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMahayutiमहायुती