शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गणेश नाईक म्हणाले, 'मंत्र्यांनी हवा तिथे जनता दरबार घ्यावा', शिंदे-पवार नवी मुंबईत दरबार घेणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 11:55 IST

Thane News: राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी रात्री ठाण्यात वंदे मातरम् संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचे दर्शन घेतले.

ठाणे : जनता दरबार कोणी, कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे जनता दरबार घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी ठाण्यात केले. जनता दरबार म्हणजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्या दूर करणे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नवी मुंबईत जनता दरबार घ्या, असे सांगितल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

नाईक यांनी बुधवारी रात्री ठाण्यात वंदे मातरम् संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचे दर्शन घेतले. नाईक म्हणाले की, राज्याचा कुठलाही मंत्री कुठेही जनता दरबार घेऊ शकतो. मी पालघर जिल्ह्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. तेथील पोलिस अधीक्षक तसेच इतर अधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडविण्यासाठी सूचना केल्या. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या मध्यापर्यंत पालघर जिल्ह्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, असे त्यांनी सांगितले. तसेच ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीही प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

शिंदे-पवार नवी मुंबईत दरबार घेणार का?

एका कार्यक्रमात ठाण्यात आपण जनता दरबार घेणार असल्याची घोषणा नाईक यांनी केली होती. त्यानंतर ठाण्यातील राजकीय वादळ चांगलेच तापले होते. 

त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीमधील कोणताही मंत्री अशा पद्धतीने जनतेसमोर जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेऊ शकतो, त्यात वावगे काहीच नाही, असे सांगितले. परंतु आता नाईक यांनीही शिंदे आणि पवार यांनी नवी मुंबईत जनता दरबार घ्यावा असे सांगितल्याने आता हे दोघे जनता दरबार घेणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीNavi Mumbaiनवी मुंबई