शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

उल्हासनगरला हवा वाढीव एफएसआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:24 IST

शहर विकास आराखड्यासंदर्भात उलटसुलट येणा-या प्रतिक्रिया, संभ्रम, राजकीय आरोपामुळे नेमके चित्र स्पष्ट होण्यासाठी गुरूवारी झालेल्या विशेष बैठकीत वाढीव एफएसआयची मागणी करण्यात आली.

उल्हासनगर : शहर विकास आराखड्यासंदर्भात उलटसुलट येणा-या प्रतिक्रिया, संभ्रम, राजकीय आरोपामुळे नेमके चित्र स्पष्ट होण्यासाठी गुरूवारी झालेल्या विशेष बैठकीत वाढीव एफएसआयची मागणी करण्यात आली. भविष्यात उल्हासनगर जर उंच वाढमार असेल, तर क्लस्टरला मंजुरी, टीडीआरबद्दल धोरण ठरवावे लागेल, असे आराखडा तयार केलेल्या सेफ्ट कंपनीने स्पष्ट केले. त्याला आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनीही सहमती दर्शवली.स्थानिक केबल वाहिनीवरून या बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. पण ज्यांच्यासाठी ही बैठक झाली, ज्यांनी याचे राजकारण करत त्याला विरोध करण्यास सुरूवात केली, त्यातील ७० टक्के नगरसेवकांनी या बैठकीला दांडी मारली. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आरखड्यावर आक्षेप घेत रिंग रोडमुळे झोपडपट्टीवर नांगर फिरणार असल्याची प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेते धनजंय बोडारे, शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक अरूण अशांत, सुनील सुर्वे, पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले, भारिपच्या गटनेत्या सविता तोरणे, शिवाजी रगडे आदींनी विकास आराखडयातील उणीवांवर बोट ठेवले.विकास आराखडा बनवणारी अहमदाबाद येथील सेफ्ट कंपनीच्या अधिकाºयांनी स्वरूप, विकासक्षेत्र, हरित पट्टे आरक्षण, रहिवासी क्षेत्र, औघोगिक व व्यापारी क्षेत्र यांची माहिती दिली. शहराची उभी वाढ करणे शक्य असल्याने चार चटईक्षेत्राची गरज आहे. तसेच शहराचे क्षेत्रफळ जेमतेम १३ किलोमीटर असून ७ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या आहे. गेल्या १० वर्षापासून लोकसंख्या वाढण्याची क्षमता घटली असून सध्या तो दर सात टक्के आहे, असे त्यांनी लक्षात आणून दिले.हा तर बुलडोझर प्लॅन२०१३ मध्ये सरकारकडे पाठवलेल्या विकास आराखडयावर तब्बल १६ हजार हरकती नागरिकांनी घेतल्या होत्या. त्यापैकी फक्त सहा हजार सूचना ऐकल्या. आराखडा बिल्डरधार्जीणा असल्याची टीका शिवसेनेचे नगरसेवक सुनील सुर्वे, अरूण अशांत यांनी केली. हा बुलडोझर प्लॅन असल्याची टीका बैठकीत त्यांनी केली.आराखड्डयाचे दोन भागसरकारने विकास आराखडयाचे दोन भाग केले असून एका भागाला सरकारची अंतिम मंजुरी आहे. त्यात फेरबदल करायचे असल्यास महासभेत प्रस्ताव आणून मंजूर केलेला प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे पाठवावा लागणार आहे. तर दुसºया भागातील आराखड्यातील विविध आरक्षण, रस्ते, हरितपट्टे आदी बाबत आक्षेप असेल तर त्याची तक्रार कोकण विभागीय आयुक्तांकडील सहसंचालक नगररचनाकार विभागाकडे करावी लागणार आहे. नगरसेवकांच्या हाती फारसे काही राहिले नसून मोठ्या भूखंडावरील आरक्षण आदी हटवण्यात किंवा लावण्यात बिल्डरांना यश आल्याची टीका त्यांच्याकडून सुरू आहे.उल्हासनगरची झेप सिंगापूरकडेकाही अपवाद वगळल्यास आराखडा शहरहिताचा असल्याची प्रतिक्रिया महापौर मीना आयलानी, सभागृह नेते जमनु पुरस्वानी, मनोज लासी, माजी आमदार कुमार आयलानी, प्रदीप रामचंदानी, प्रकाश माखिजा आदींनी दिली. आराखडयामुळे शहराचा विकास सिंगापूरच्या दिशेने होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर