शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राष्ट्रवादीच्या चार नेत्यांची, चार दिशेला तोंडे

By नारायण जाधव | Published: September 05, 2022 11:01 AM

गेल्या काही वर्षांत थातूरमातूर आंदोलने वगळता पक्षाचा एकही मोठा कार्यक्रम झालेला नाही. श्रेष्ठींतील अजित पवार यांची सिडकोतील शासकीय बैठक वगळता एकही मोठा नेता शहरात फिरकला नाही.

नारायण जाधव, उप-वृत्तसंपादक

ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद अगदीच तोळामासा झाली आहे. एकेकाळी पक्षाचे महापालिकेवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, त्यात गणेश नाईक यांच्या ताकदीचा प्रभाव होता. परंतु, पाच-सहा नगरसेवक वगळता पक्षाचे सर्वच नगरसेवक नाईक यांच्यासाेबत भाजपमध्ये गेल्याने पक्षाला लागलेली घरघर आजही कायम आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत घेतली. तिला नवी मुंबईतील पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. परंतु, या सर्वांनी या बैठकीत पक्षाची नवी मुंबईत नेमकी ताकद काय, याची वेगवेगळी मते मांडून सावळागोंधळ असल्याचे दाखवून दिले. एवढेच नाही तर या बैठकीनंतर दोन-तीन दिवसांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे हे एकनाथ शिंदे सेनेत जाणार असल्याची पुडी कुणी तरी सोडली. यामुळे पक्षात किती बेशिस्त आहे, याचाही प्रत्यय कार्यकर्त्यांनी आणून दिला आहे. 

वास्तविक पाहता, गणेश नाईक यांच्या टीमने राष्ट्रवादी सोडल्यानंतर सुरुवातीला जितेंद्र आव्हाड यांनी माथाडी कामगारांची मोठी व्होट बँक असलेल्या नवी मुंबईत ताकद वाढविण्यासाठी मेहनत घेतली. कार्यकर्त्यांना नैतिक बळ दिले होते. त्यांच्यासोबत माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि उरणहून नवी मुंबईत ‘बार, बार’ येणारे प्रशांत पाटील यांना निरीक्षक नेमले. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे-पाटील समर्थक अशोक गावडे यांना विधानसभेसाठी उभे केले. त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी बऱ्यापैकी मते घेतली होती. यामुळेच नंतर त्यांच्यावरच नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सोपविली. मात्र, श्रेष्ठींनी यानंतर पक्षबांधणीकडे पाहिजे तसे लक्ष दिल्याचे कधीच दिसले नाही. पक्षाचा नेमका प्रदेशाध्यक्ष कोण, असा प्रश्नही तळागाळातील कार्यकर्ते एकमेकांना विचारताना दिसतात. 

एवढेच नाही तर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर श्रेष्ठी स्थानिक नेत्यांना बळ देतील, अशी आशा होती. परंतु, ती आतापर्यंत फोल ठरली आहे. मधल्या काळात नेरूळमधील शिवसेनेचे नामदेव भगत यांच्यासारख्या जुन्या नेत्यांनी पार्थ पवार यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्याशी जवळीक साधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, श्रेष्ठींनी त्यांचा भ्रमनिरास केला. 

शशिकांत शिंदे हे पक्षाचे नेते असले तरी त्यांचे मन जास्तीत जास्त आपल्या मूळ सातारा जिल्ह्यातील मतदारसंघात रमते. उरणचे असलेले प्रशांत पाटील हे नवी मुंबईत अधूनमधून येत असले तरी त्यांचा जास्त वेळ सोशल मीडियात रमतो. दुसरे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी पक्षांतर्गत वादाला कंटाळून केव्हाच हातात कमळ घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे नाव हातावर गोंदवून घेतले. यामुळे एकेकाळी राष्ट्रवादीचे हक्काचे मतदार असलेल्या माथाडी कामगारांत उघड उघड दोन गट पडले आहेत. पक्षाचे आणखी एक नेते चंद्रकांत पाटील अर्थात सी. आर. पाटील यांची माथाडी कामगारांसह स्थानिक आगरी कोळी समाजात ऊठबस असली तरी त्यांनाही पक्षाने बळ दिलेले नाही.  

गेल्या काही वर्षांत थातूरमातूर आंदोलने वगळता पक्षाचा एकही मोठा कार्यक्रम झालेला नाही. श्रेष्ठींतील अजित पवार यांची सिडकोतील शासकीय बैठक वगळता एकही मोठा नेता शहरात फिरकला नाही. वास्तविक, मुंबईनंतर एमएमआरडीए क्षेत्रातील सर्वांत सक्षम महापालिका म्हणून नवी मुंबईकडे पाहिले जाते. आता शरद पवार यांनीच पक्षबांधणीकडे लक्ष घातल्याने काय सकारात्मक बदल होतात, याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीAjit Pawarअजित पवार