शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

वनविभागाला आली जाग, रस्ता खणल्याने नागरिकांना होतोय त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 3:19 AM

चार वर्षे काय केले ? : रस्ता खणल्याने नागरिकांना होतोय त्रास

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेचा विकास आराखड्यातील काँक्रिटचा रस्ता वनविभागाने बंद केला. हा रस्ता चार वर्षांपूर्वी तयार केला होता. मात्र हा रस्ता वनविभागाच्या जागेतून जात असल्याचा दावा केला. वनविभागाची परवानगी न घेता हा रस्ता केल्याने या रस्त्यावर अचानक चार वर्षानंतर कारवाई करत हा रस्ता बंद केला आहे. वनविभागाच्या मुजोरीमुळे नागरिकांच्या रहदारीचा रस्ता बंद झाला आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या विकास आराखड्यातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी हा एक रस्ता हा चिंचपाडा परिसरातून जातो. पालिकेचा १८ मीटर रूंदीच्या या रस्त्याचे काम लोकसहभागातून केले होते. या रस्त्याची अत्यंत गरज असल्याने तो बांधला. हा रस्ता नियमितपणे वापरातही आला. मात्र, अचानक वन विभागाला या रस्त्यामध्ये आपली जागा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तक्रार असल्याचे कारण पुढे करत हा रहदारीचा रस्ता खोदला आहे. वनविभागाच्या या कारवाईला रोखण्याचे प्रयत्न स्थानिक नागरिकांनी केले. मात्र वन विभागाचे अधिकारी आपल्या कारवाईवर ठाम राहिल्याने त्यांनी जेसीबीच्या मदतीने संपूर्ण काँक्रिटचा रस्ताच खोदून ठेवला आहे.या रस्त्यावरून दोन मोठे गृहप्रकल्प जोडले गेले आहे. शेकडो नागरिक या रस्त्यावरून ये-जा करत होते. परिसरातील नागरिकांनाही याच रस्त्याचा आधार होता. मात्र वनविभागाच्या अचानक झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांची कोंडी झाली आहे. वनविभागानेही कधी नव्हे ती यंत्रसामग्री वापरून हा रस्ता तोडला आहे.हा रस्ता पालिकेने केला नाही असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. तर संबंधित बांधकाम व्यावसायिकांनाही या संदर्भात विचारणा केली होती. मात्र त्यांनीही या संदर्भात कोणतीच माहिती दिली नाही. त्यामुळे या रस्त्यावर कारवाई करावी लागली असे त्यांनी स्पष्ट केले.कारवाई करण्यापूर्वी नागरिकांचा विचार होणे गरजेचाया रस्त्यावर कारवाई करतांना वनविभागाने नागरिकांची गैरसोय होणार याचाही विचार करणे गरजेचे होते. ज्या वेळेस रस्ता झाला त्या वेळेसच ही कारवाई होणे गरजेचे होते. मात्र रस्ता वापरात आल्यावर कारवाई करणे चुकीचे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.या संदर्भात वनविभागाचे अधिकारी रमेश रसाळ यांना विचारले असता या रस्त्यामध्ये वनविभागाची जागा असून त्या जागेबाबत वरिष्ठ कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर या रस्त्याचे बांधकाम कुणी केले याची चौकशी करण्यात आली.

टॅग्स :thaneठाणे