शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

ठाण्यात डेंग्यू रूग्णांची संख्या पाचशेच्या पुढे, एकही बळी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 00:22 IST

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदांच्या रुग्णालयांत गतवर्षी वेगवेगळ्या साथीचे आजार झालेल्या साडेचार हजार जणांवर योग्यवेळी उपचार करण्यात आले.

ठाणे : जलजन्य आणि कीटकजन्य साथीच्या आजारांमध्ये शहरी विभागात रुग्णांची संख्या अधिक असली तरी, या आजारांमुळे एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदांच्या रुग्णालयांत गतवर्षी वेगवेगळ्या साथीचे आजार झालेल्या साडेचार हजार जणांवर योग्यवेळी उपचार करण्यात आले. यामध्ये विषमज्वर आणि अतिसार या आजारांच्या रुग्णांनी हजाराचा आकडा पार केला असून डेंग्यूचे रुग्ण पाचशेच्या पुढे गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षभरात (जलजन्य व कीटकजन्य) या साथीच्या आजारांच्या एकूण चार हजार ४२८ रु ग्णांना ठाणे जिल्हा रुग्णालयासह अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदांच्या रुग्णालयांत उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक एक हजार ५१६ रु ग्ण हे विषमज्वराचे असून त्यापाठोपाठ अतिसाराचे एक हजार सात रु ग्ण होते. हगवणीचे ७५० रुग्ण असून, डेंग्यूसंशयित ५३५, गॅस्ट्रोचे २८१, मलेरियाचे १९७ तसेच कावीळचे १२६ आणि कॉलराचे १६ रु ग्ण आढळून आले होते. मेंदूज्वर, गोवर, चिकनगुणिया आणि लेप्टोचा एकाही रुग्ण जिल्ह्यात आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा सामान्य रु ग्णालय सूत्रांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात डेंग्यूचे ४५८ रुग्णठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात डेंग्यू झालेले ४५८ रुग्ण दाखल झाले होते. यामधील ५१ रुग्ण हे डिसेंबर महिन्यातील आहेत. वर्षभरात अंबरनाथमध्ये ५२ आणि बदलापुरात २५ डेंग्यूचे रुग्ण नगर परिषदेच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते.मागील काही वर्षांच्या अनुभवातून जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मध्यंतरी जिल्ह्यात पुराचे पाणी शिरल्याने रोगराई पसरण्याची शक्यता उद्भवली होती. त्यामुळे साथीच्या आजारांची लक्षणे दिसली की, त्याला लगेच उपचारार्थ दाखल केले जात होते. योग्य उपचार मिळाल्याने सुदैवाने कोणीही दगावले नाही. -डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे 

टॅग्स :Healthआरोग्यthaneठाणेdengueडेंग्यू