शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

ठाण्यात डेंग्यू रूग्णांची संख्या पाचशेच्या पुढे, एकही बळी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 00:22 IST

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदांच्या रुग्णालयांत गतवर्षी वेगवेगळ्या साथीचे आजार झालेल्या साडेचार हजार जणांवर योग्यवेळी उपचार करण्यात आले.

ठाणे : जलजन्य आणि कीटकजन्य साथीच्या आजारांमध्ये शहरी विभागात रुग्णांची संख्या अधिक असली तरी, या आजारांमुळे एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदांच्या रुग्णालयांत गतवर्षी वेगवेगळ्या साथीचे आजार झालेल्या साडेचार हजार जणांवर योग्यवेळी उपचार करण्यात आले. यामध्ये विषमज्वर आणि अतिसार या आजारांच्या रुग्णांनी हजाराचा आकडा पार केला असून डेंग्यूचे रुग्ण पाचशेच्या पुढे गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षभरात (जलजन्य व कीटकजन्य) या साथीच्या आजारांच्या एकूण चार हजार ४२८ रु ग्णांना ठाणे जिल्हा रुग्णालयासह अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदांच्या रुग्णालयांत उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक एक हजार ५१६ रु ग्ण हे विषमज्वराचे असून त्यापाठोपाठ अतिसाराचे एक हजार सात रु ग्ण होते. हगवणीचे ७५० रुग्ण असून, डेंग्यूसंशयित ५३५, गॅस्ट्रोचे २८१, मलेरियाचे १९७ तसेच कावीळचे १२६ आणि कॉलराचे १६ रु ग्ण आढळून आले होते. मेंदूज्वर, गोवर, चिकनगुणिया आणि लेप्टोचा एकाही रुग्ण जिल्ह्यात आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा सामान्य रु ग्णालय सूत्रांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात डेंग्यूचे ४५८ रुग्णठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात डेंग्यू झालेले ४५८ रुग्ण दाखल झाले होते. यामधील ५१ रुग्ण हे डिसेंबर महिन्यातील आहेत. वर्षभरात अंबरनाथमध्ये ५२ आणि बदलापुरात २५ डेंग्यूचे रुग्ण नगर परिषदेच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते.मागील काही वर्षांच्या अनुभवातून जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मध्यंतरी जिल्ह्यात पुराचे पाणी शिरल्याने रोगराई पसरण्याची शक्यता उद्भवली होती. त्यामुळे साथीच्या आजारांची लक्षणे दिसली की, त्याला लगेच उपचारार्थ दाखल केले जात होते. योग्य उपचार मिळाल्याने सुदैवाने कोणीही दगावले नाही. -डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे 

टॅग्स :Healthआरोग्यthaneठाणेdengueडेंग्यू