शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी पहिल्यांदाच महोत्सवाचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2018 5:08 PM

घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी विविध संस्थांच्या सहकार्याने भाजपाने अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टिव्हलचे आयोजन येत्या रविवारी ४ मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती घोडबंदर गावचे ग्रामस्थ तथा उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी दिली आहे.

मीरारोड : घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी विविध संस्थांच्या सहकार्याने भाजपाने अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टिव्हलचे आयोजन येत्या रविवारी ४ मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती घोडबंदर गावचे ग्रामस्थ तथा उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी दिली आहे.

शिवजयंती निमित्त या एकदिवसीय महोत्सवाचे आयोजन होत असून अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे. १५ व्या शतकात पोर्तुगिजांच्या काळात येथे त्यांचा घोड्यांचा व्यापार चालत असे. त्यामुळे याला घोडबंदर असे नाव पडले. तर सह्याद्रीची एक सोंड येथील उल्हास नदीच्या टोकाला उतरते. ते टोक घोड्या सारखे दिसते म्हणून घोडबंदर असे नाव पडल्याचे देखिल सांगितले जाते. घोडबंदर किल्ला हा १७३७ साली पोर्तुगिजांकडून मराठ्यांनी जिंकून घेतला. त्या आधी देखील सदर किल्ला जिंकण्याचा प्रयत्न मराठ्यांनी केला होता. १८१८ मध्ये सदर किल्ला ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. येथून त्यांनी त्यांचे जिल्हा प्रशासकीय कामकाज सुरु केले.

सद्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या किल्ल्याचे बुरुज, तटबंदी व आतील बांधकामांच्या भिंतींचे केवळ अवशेषच उरले आहेत. पोर्तुगिजांच्या काळातील एका पुरातन बांधकामात हॉटेल चालवले जात आहे. किल्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन अनधिकृत बांधकामे झाली आहेत. बेकायदा खोदकाम झाले आहे. या ठिकाणी पुर्वी चालणारया चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान देखिल किल्ल्याची मोठी वाताहत झालेली आहे.

दुरावस्थेत असलेल्या किल्ल्याचे संवर्धन व सुशोभिकरण करुन पर्यटनासाठी तो खुला करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून स्थानिक शिवसेना आमदार प्रताप सारनाईक यांच्या कडुन सुरु आहेत. त्यासाठी वेळोवेळी किल्लयाची पाहणी करण्यात आली असून निधी देखील मंजुर करण्यात आलाय. परंतु किल्ला सुशोभिकरणासाठी पालिकेच्या चालु अर्थसंल्पाच्या तरतुदीतील एक पैसाही वापरण्यात आला नाही. उलट हा निधी सत्ताधारी भाजपाने ठराव करुन अन्य कामांसाठी वर्ग केलाय.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमीत्ताने भाजपाने रविवार ४ मार्च रोजी दुपारी २ ते रात्री ८ दरम्यान अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. दुपारी २ ते ५ वेळात पोवाडा गायन, वक्तृत्व, छायाचित्र, चित्रकला, नृत्य आदी स्पर्धा होणार आहेत. १० ते १४ व १४ वर्ष वरील अशा दोन गटात या स्पर्धा होती. या स्पर्धांसाठी शाहिर निशांत अमर शेख, चित्रकार विजयराज बांधनकर, मंदार आणि प्रीती वाळुसकर, नृत्यांगना प्रदन्या कोळी-भगत सह एकुण ३० परिक्षक असतील. या वेळी अनुलोम संस्थे तर्फे सरकारी योजनांची माहिती दिली जाईल.

सायंकाळी ५ च्या सुमारास किल्ल्याच्या पायथ्यापासून शोभायात्रा व सायकल रॅली काढली जाणार आहे. यात पारंपारिक वेशभूषेत स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी व नागरीक सहभागी होतील. शोभायात्रा किल्ल्यावर पोहचल्यावर मुख्य कार्यक्रमास सुरवात होणार आहे. गावातील स्थानिक तरुणांच्या सॅक्सोफोन वादनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. पहिल्यांदाच किल्ल्याला नेत्रदीपक अशा रोषणाईने प्रकाशमान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथ वर सादर केलेल्या शिवाजी महाराजांचा दरबार सादर केला जाणार आहे.

कल्याण ते वसई खाडी किनारयावर अनेक ऐतिहासिक किल्ले असून त्यांची दुरावस्था झालेली आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन व जतन करण्यासह पर्यावरणा सोबत पर्यटनाचा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करत असल्याचे चंद्रकांत वैती म्हणाले. मीरा भार्इंदरकरांसह ठाणे व पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या गौरवशाली इतिहासाचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन वैती यांनी केले आहे. 

टॅग्स :thaneठाणे