शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दिघा रेल्वे स्थानकाला मुहूर्त सापडला, रेल्वे विकास महामंडळाने निविदा मागविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 02:30 IST

नवी मुंबईतील दिघा या नव्या रेल्वे स्थानकासाठी अखेर मध्य रेल्वेला उशिरा का होईना मुहूर्त सापडला आहे. यासाठी कळवा स्थानकानजीक उड्डाणपूल, फलाटांतील फेरबदल, अतिक्रमणे हटवून संरक्षण भिंत आणि दिघा रेल्वे स्थानक बांधण्यासाठी मध्य रेल्वेने अखेर निविदा मागविल्या आहेत.

- नारायण जाधवठाणे : नवी मुंबईतील दिघा या नव्या रेल्वे स्थानकासाठी अखेर मध्य रेल्वेला उशिरा का होईना मुहूर्त सापडला आहे. यासाठी कळवा स्थानकानजीक उड्डाणपूल, फलाटांतील फेरबदल, अतिक्रमणे हटवून संरक्षण भिंत आणि दिघा रेल्वे स्थानक बांधण्यासाठी मध्य रेल्वेने अखेर निविदा मागविल्या आहेत. एमयूटीपी अर्थात मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ ही कामे करणार असून त्यावर पहिल्या टप्प्यात १०७ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कर्जत-कसारापर्यंतच्या प्रवाशांना ठाण्याला न येता थेट कल्याणमार्गे नवी मुंबईला जाता यावे यासाठी हे स्थानक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.ठाणे आणि वाशी-पनवेल मार्गावर सध्या ठाण्यानंतर ऐरोली हे स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांतील अंतर ५.७६ किमी आहे. रेतीबंदर नजीकचा पूल आणि दिघा रेल्वे स्थानक हे दोन्ही प्रकल्प कळवा-ऐरोली या ४२८ कोटींच्या उन्नत मार्गाचाच भाग आहेत. त्यातीलच दिघा रेल्वे स्थानक येत्या तीन वर्षांत उभे करण्याचा रेल्वेचा मानस आहे.सध्याच्या ऐरोली नॉलेज पार्कसमोर हे स्थानक उभे करण्यात येणार आहे. नॉलेज पार्कमधील पटनी कॉम्प्युटर्ससह इतर आयटी कंपन्या आणि कळवा ईस्ट, विटावा, दिघा परिसर तसेच तेथील एमआयडीसी उद्योगांतील कामगारांना हे स्थानक सोयीचे ठरणार आहे. माजी खासदार संजीव नाईक यांनी दिघासह पावणे स्थानक व्हावे, यासाठी त्यांच्या कार्यकाळात पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यमान खासदार राजन विचारे यांनीही काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन कल्याणहून थेट ऐरोलीमार्गे नवी मुंबईला जाता यावे यासाठी आवश्यक असलेला कळव्याच्या रेतीबंदरनजीकचा उड्डाणपूल आणि दिघा रेल्वे स्थानक लवकर मार्गी लागावे, यासाठी तेथील अतिक्रमणे काढून इतर अत्यावश्यक परवानग्या तत्काळ द्याव्यात अशी मागणी केली होती. त्यानंतर आता रेल्वे विकास महामंडळाने ही अतिक्रमणे हटविण्यासह दिघा रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी या निविदा मागविल्या आहेत. मार्च अखेरपर्यंत त्या उघडण्यात येणार असून त्यानंतर पुढील कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.ठाणे स्थानकावरील ताण कमी होणारसध्या कसारा-कर्जतच्या प्रवाशांना नवी मुंबईला रेल्वेमार्गे जायचे झाल्यास कल्याणमार्गे ठाणे स्थानकातून उतरून नंतर ट्रान्स हार्बरमार्गे नवी मुंबईला जावे लागते.मात्र, कळव्यानजीक पारसिक डोंगरराजीजवळ वळण घेणारा उड्डाणपूल बांधल्यास ठाण्याला न येता थेट ऐरोलीमार्गे नवी मुंबईला जाता येणार आहे. त्यासाठी ठाणे आणि ऐरोली या दोन स्थानकांच्या मध्ये दिघा हे नवे रेल्वे स्थानक बांधण्यात येणार आहे.हा मार्ग कार्यान्वित झाल्यास कर्जत-कसारा भाागातील प्रवाशांना ठाण्याला न येता थेट नवी मुंबईला जाणे सोपे होणार असून त्यात त्यांचा वेळ, पैशाची बचत होईलच; शिवाय ठाणे स्थानकावरील ताणही कमी होणार आहे.

टॅग्स :thaneठाणे