शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दिघा रेल्वे स्थानकाला मुहूर्त सापडला, रेल्वे विकास महामंडळाने निविदा मागविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 02:30 IST

नवी मुंबईतील दिघा या नव्या रेल्वे स्थानकासाठी अखेर मध्य रेल्वेला उशिरा का होईना मुहूर्त सापडला आहे. यासाठी कळवा स्थानकानजीक उड्डाणपूल, फलाटांतील फेरबदल, अतिक्रमणे हटवून संरक्षण भिंत आणि दिघा रेल्वे स्थानक बांधण्यासाठी मध्य रेल्वेने अखेर निविदा मागविल्या आहेत.

- नारायण जाधवठाणे : नवी मुंबईतील दिघा या नव्या रेल्वे स्थानकासाठी अखेर मध्य रेल्वेला उशिरा का होईना मुहूर्त सापडला आहे. यासाठी कळवा स्थानकानजीक उड्डाणपूल, फलाटांतील फेरबदल, अतिक्रमणे हटवून संरक्षण भिंत आणि दिघा रेल्वे स्थानक बांधण्यासाठी मध्य रेल्वेने अखेर निविदा मागविल्या आहेत. एमयूटीपी अर्थात मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ ही कामे करणार असून त्यावर पहिल्या टप्प्यात १०७ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कर्जत-कसारापर्यंतच्या प्रवाशांना ठाण्याला न येता थेट कल्याणमार्गे नवी मुंबईला जाता यावे यासाठी हे स्थानक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.ठाणे आणि वाशी-पनवेल मार्गावर सध्या ठाण्यानंतर ऐरोली हे स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांतील अंतर ५.७६ किमी आहे. रेतीबंदर नजीकचा पूल आणि दिघा रेल्वे स्थानक हे दोन्ही प्रकल्प कळवा-ऐरोली या ४२८ कोटींच्या उन्नत मार्गाचाच भाग आहेत. त्यातीलच दिघा रेल्वे स्थानक येत्या तीन वर्षांत उभे करण्याचा रेल्वेचा मानस आहे.सध्याच्या ऐरोली नॉलेज पार्कसमोर हे स्थानक उभे करण्यात येणार आहे. नॉलेज पार्कमधील पटनी कॉम्प्युटर्ससह इतर आयटी कंपन्या आणि कळवा ईस्ट, विटावा, दिघा परिसर तसेच तेथील एमआयडीसी उद्योगांतील कामगारांना हे स्थानक सोयीचे ठरणार आहे. माजी खासदार संजीव नाईक यांनी दिघासह पावणे स्थानक व्हावे, यासाठी त्यांच्या कार्यकाळात पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यमान खासदार राजन विचारे यांनीही काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन कल्याणहून थेट ऐरोलीमार्गे नवी मुंबईला जाता यावे यासाठी आवश्यक असलेला कळव्याच्या रेतीबंदरनजीकचा उड्डाणपूल आणि दिघा रेल्वे स्थानक लवकर मार्गी लागावे, यासाठी तेथील अतिक्रमणे काढून इतर अत्यावश्यक परवानग्या तत्काळ द्याव्यात अशी मागणी केली होती. त्यानंतर आता रेल्वे विकास महामंडळाने ही अतिक्रमणे हटविण्यासह दिघा रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी या निविदा मागविल्या आहेत. मार्च अखेरपर्यंत त्या उघडण्यात येणार असून त्यानंतर पुढील कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.ठाणे स्थानकावरील ताण कमी होणारसध्या कसारा-कर्जतच्या प्रवाशांना नवी मुंबईला रेल्वेमार्गे जायचे झाल्यास कल्याणमार्गे ठाणे स्थानकातून उतरून नंतर ट्रान्स हार्बरमार्गे नवी मुंबईला जावे लागते.मात्र, कळव्यानजीक पारसिक डोंगरराजीजवळ वळण घेणारा उड्डाणपूल बांधल्यास ठाण्याला न येता थेट ऐरोलीमार्गे नवी मुंबईला जाता येणार आहे. त्यासाठी ठाणे आणि ऐरोली या दोन स्थानकांच्या मध्ये दिघा हे नवे रेल्वे स्थानक बांधण्यात येणार आहे.हा मार्ग कार्यान्वित झाल्यास कर्जत-कसारा भाागातील प्रवाशांना ठाण्याला न येता थेट नवी मुंबईला जाणे सोपे होणार असून त्यात त्यांचा वेळ, पैशाची बचत होईलच; शिवाय ठाणे स्थानकावरील ताणही कमी होणार आहे.

टॅग्स :thaneठाणे