शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

अखेर दिघा रेल्वे स्थानकाला मुहूर्त सापडला, रेल्वे विकास महामंडळाने निविदा मागविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 02:30 IST

नवी मुंबईतील दिघा या नव्या रेल्वे स्थानकासाठी अखेर मध्य रेल्वेला उशिरा का होईना मुहूर्त सापडला आहे. यासाठी कळवा स्थानकानजीक उड्डाणपूल, फलाटांतील फेरबदल, अतिक्रमणे हटवून संरक्षण भिंत आणि दिघा रेल्वे स्थानक बांधण्यासाठी मध्य रेल्वेने अखेर निविदा मागविल्या आहेत.

- नारायण जाधवठाणे : नवी मुंबईतील दिघा या नव्या रेल्वे स्थानकासाठी अखेर मध्य रेल्वेला उशिरा का होईना मुहूर्त सापडला आहे. यासाठी कळवा स्थानकानजीक उड्डाणपूल, फलाटांतील फेरबदल, अतिक्रमणे हटवून संरक्षण भिंत आणि दिघा रेल्वे स्थानक बांधण्यासाठी मध्य रेल्वेने अखेर निविदा मागविल्या आहेत. एमयूटीपी अर्थात मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ ही कामे करणार असून त्यावर पहिल्या टप्प्यात १०७ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कर्जत-कसारापर्यंतच्या प्रवाशांना ठाण्याला न येता थेट कल्याणमार्गे नवी मुंबईला जाता यावे यासाठी हे स्थानक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.ठाणे आणि वाशी-पनवेल मार्गावर सध्या ठाण्यानंतर ऐरोली हे स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांतील अंतर ५.७६ किमी आहे. रेतीबंदर नजीकचा पूल आणि दिघा रेल्वे स्थानक हे दोन्ही प्रकल्प कळवा-ऐरोली या ४२८ कोटींच्या उन्नत मार्गाचाच भाग आहेत. त्यातीलच दिघा रेल्वे स्थानक येत्या तीन वर्षांत उभे करण्याचा रेल्वेचा मानस आहे.सध्याच्या ऐरोली नॉलेज पार्कसमोर हे स्थानक उभे करण्यात येणार आहे. नॉलेज पार्कमधील पटनी कॉम्प्युटर्ससह इतर आयटी कंपन्या आणि कळवा ईस्ट, विटावा, दिघा परिसर तसेच तेथील एमआयडीसी उद्योगांतील कामगारांना हे स्थानक सोयीचे ठरणार आहे. माजी खासदार संजीव नाईक यांनी दिघासह पावणे स्थानक व्हावे, यासाठी त्यांच्या कार्यकाळात पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यमान खासदार राजन विचारे यांनीही काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन कल्याणहून थेट ऐरोलीमार्गे नवी मुंबईला जाता यावे यासाठी आवश्यक असलेला कळव्याच्या रेतीबंदरनजीकचा उड्डाणपूल आणि दिघा रेल्वे स्थानक लवकर मार्गी लागावे, यासाठी तेथील अतिक्रमणे काढून इतर अत्यावश्यक परवानग्या तत्काळ द्याव्यात अशी मागणी केली होती. त्यानंतर आता रेल्वे विकास महामंडळाने ही अतिक्रमणे हटविण्यासह दिघा रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी या निविदा मागविल्या आहेत. मार्च अखेरपर्यंत त्या उघडण्यात येणार असून त्यानंतर पुढील कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.ठाणे स्थानकावरील ताण कमी होणारसध्या कसारा-कर्जतच्या प्रवाशांना नवी मुंबईला रेल्वेमार्गे जायचे झाल्यास कल्याणमार्गे ठाणे स्थानकातून उतरून नंतर ट्रान्स हार्बरमार्गे नवी मुंबईला जावे लागते.मात्र, कळव्यानजीक पारसिक डोंगरराजीजवळ वळण घेणारा उड्डाणपूल बांधल्यास ठाण्याला न येता थेट ऐरोलीमार्गे नवी मुंबईला जाता येणार आहे. त्यासाठी ठाणे आणि ऐरोली या दोन स्थानकांच्या मध्ये दिघा हे नवे रेल्वे स्थानक बांधण्यात येणार आहे.हा मार्ग कार्यान्वित झाल्यास कर्जत-कसारा भाागातील प्रवाशांना ठाण्याला न येता थेट नवी मुंबईला जाणे सोपे होणार असून त्यात त्यांचा वेळ, पैशाची बचत होईलच; शिवाय ठाणे स्थानकावरील ताणही कमी होणार आहे.

टॅग्स :thaneठाणे