शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

स्वातंत्र्य सैनिकाची जमीन बळकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून हक्क द्या; आदिवासी कुटुंबियांचे साकडे 

By धीरज परब | Updated: November 5, 2023 14:09 IST

मीरारोडच्या मीरा गावात राहणारे स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे १९८८ साली निधन झाले .

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या आदिवासी कुटुंबावर हलाखीचे जीवन जगण्याची पाळी आली आहे . त्या स्वातंत्र्य सैनिकाची जमीन बनावट लोक व बनावट कागदपत्रां द्वारे कटकारस्थान करून लुबाडण्यात आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून आमची जमीन आम्हाला परत करा अशी मागणी स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री पासून मीरा भाईंदर - वसई विरारच्या पोलीस आयुक्तां कडे केली आहे. 

मीरारोडच्या मीरा गावात राहणारे स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे १९८८ साली निधन झाले . त्यांच्या वारसांनी केलेल्या तक्रारी नुसार मोतीराम जाबर हे आमचे आजोबा असून ते स्वातंत्र्य सैनिक तसेच आदिवासी कुटुंबातील होते . १९७३ साली  तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्वाक्षरीने त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून सन्मानपत्र देण्यात आले होते . काही वर्षां पूर्वी मीरा भाईंदर महापालिकेने देखील त्यांच्या वारसांना सन्मानपत्र दिले होते. 

आजोबांची १९५१ साला पासून संरक्षित कुळ म्हणून मौजे मिरे सर्व्हे क्र . १२७ / १ व नवीन ७ / १  मध्ये नोंद होती व ते त्याठिकाणी शेती करत होते . परंतु १९६३ साली जमीन आजोबांची जमीन हडपण्यासाठी मोतीराम जाबर यांच्या ऐवजी मोतीराम काळ्या पाटील  या नावाच्या बोगस व्यक्तीला पुढे करून त्या नावाने खोट्या सह्या व खोटी कागदपत्रे सादर केली . 

आश्चर्य म्हणजे १९७२ साली सातबारा नोंदी मेरुद्दिन इसाक पटेल व इत्तर यांचे कुळ म्हणून नाव लावण्यात आले . स्वातंत्र्य सैनिक व आदिवासीचे संरक्षित कुळ असताना पटेल व इत्तर यांचे कुळ कसे लागू शकते ? तर तहसीलदार यांनी २०१५ साली आम्हास आमचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे वारस म्हणून संरक्षित कुळ म्हणून घोषित केले होते . तसा आदेश त्यांनी दिला होता . 

मात्र संबंधित लोकांनी आमच्या आजोबा व नंतर आम्हा वारसांच्या अज्ञानी - अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला आमच्या राह्यता घरातून आणि शेत जमिनीतून गुंडगिरी - दहशत माजवून बळजबरी हुसकावून लावले. आदिवासी संरक्षित कुळ असल्याने सदर जमीन विक्री व विकसित करण्यात अडचण येऊ नये म्हणून आधी पाटील नावाची बोगस व्यक्ती चे नावाचे पत्र देऊन आणि नंतर मेरुद्दिन इसाक पटेल व इत्तर यांचे कुळ म्हणून नाव लावण्यात आले . नंतर पटेल  यांचे कुळ काढून घेऊन जयराज देविदास व इतर यांनी स्वतःची नावे सात बारा नोंदी लावून घेतली असल्याचे स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसांनी सांगितले . 

स्वातंत्र्य सैनिक व आदिवासी जमातीतले मोतीराम जाबर यांची तसेच त्यांचे वारस आदिवासी कुटुंबाची फसवणूक व अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा . आमच्या हक्काची जमीन आम्हाला मिळवून द्यावी अशी मागणी लेखी अर्ज द्वारे भानुमती करसन बरफ , असीना परशुराम वरठा , सोनल महेंद्र जाबर सह अन्य वारसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शासकीय अधिकारी तसेच पोलीस आयुक्त मधुकर पांडेय आदींना केली आहे .  

स्वातंत्र्य सैनिकाचे हे आदिवासी वारसदार घरकाम , मजुरी आदी कामे करून चाळीत वा भाड्याच्या घरात राहून हलाखीचे जीवन जगत आहेत . कोट्यवधी रुपयांची जमीन असून देखील काही विकासक , कारस्थानी व अधिकारी यांच्या संगनमता मुळे हक्काची जमीन बळकावली गेल्याचे त्यांनी सांगितले . 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस