शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

स्वातंत्र्य सैनिकाची जमीन बळकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून हक्क द्या; आदिवासी कुटुंबियांचे साकडे 

By धीरज परब | Updated: November 5, 2023 14:09 IST

मीरारोडच्या मीरा गावात राहणारे स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे १९८८ साली निधन झाले .

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या आदिवासी कुटुंबावर हलाखीचे जीवन जगण्याची पाळी आली आहे . त्या स्वातंत्र्य सैनिकाची जमीन बनावट लोक व बनावट कागदपत्रां द्वारे कटकारस्थान करून लुबाडण्यात आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून आमची जमीन आम्हाला परत करा अशी मागणी स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री पासून मीरा भाईंदर - वसई विरारच्या पोलीस आयुक्तां कडे केली आहे. 

मीरारोडच्या मीरा गावात राहणारे स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे १९८८ साली निधन झाले . त्यांच्या वारसांनी केलेल्या तक्रारी नुसार मोतीराम जाबर हे आमचे आजोबा असून ते स्वातंत्र्य सैनिक तसेच आदिवासी कुटुंबातील होते . १९७३ साली  तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्वाक्षरीने त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून सन्मानपत्र देण्यात आले होते . काही वर्षां पूर्वी मीरा भाईंदर महापालिकेने देखील त्यांच्या वारसांना सन्मानपत्र दिले होते. 

आजोबांची १९५१ साला पासून संरक्षित कुळ म्हणून मौजे मिरे सर्व्हे क्र . १२७ / १ व नवीन ७ / १  मध्ये नोंद होती व ते त्याठिकाणी शेती करत होते . परंतु १९६३ साली जमीन आजोबांची जमीन हडपण्यासाठी मोतीराम जाबर यांच्या ऐवजी मोतीराम काळ्या पाटील  या नावाच्या बोगस व्यक्तीला पुढे करून त्या नावाने खोट्या सह्या व खोटी कागदपत्रे सादर केली . 

आश्चर्य म्हणजे १९७२ साली सातबारा नोंदी मेरुद्दिन इसाक पटेल व इत्तर यांचे कुळ म्हणून नाव लावण्यात आले . स्वातंत्र्य सैनिक व आदिवासीचे संरक्षित कुळ असताना पटेल व इत्तर यांचे कुळ कसे लागू शकते ? तर तहसीलदार यांनी २०१५ साली आम्हास आमचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे वारस म्हणून संरक्षित कुळ म्हणून घोषित केले होते . तसा आदेश त्यांनी दिला होता . 

मात्र संबंधित लोकांनी आमच्या आजोबा व नंतर आम्हा वारसांच्या अज्ञानी - अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला आमच्या राह्यता घरातून आणि शेत जमिनीतून गुंडगिरी - दहशत माजवून बळजबरी हुसकावून लावले. आदिवासी संरक्षित कुळ असल्याने सदर जमीन विक्री व विकसित करण्यात अडचण येऊ नये म्हणून आधी पाटील नावाची बोगस व्यक्ती चे नावाचे पत्र देऊन आणि नंतर मेरुद्दिन इसाक पटेल व इत्तर यांचे कुळ म्हणून नाव लावण्यात आले . नंतर पटेल  यांचे कुळ काढून घेऊन जयराज देविदास व इतर यांनी स्वतःची नावे सात बारा नोंदी लावून घेतली असल्याचे स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसांनी सांगितले . 

स्वातंत्र्य सैनिक व आदिवासी जमातीतले मोतीराम जाबर यांची तसेच त्यांचे वारस आदिवासी कुटुंबाची फसवणूक व अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा . आमच्या हक्काची जमीन आम्हाला मिळवून द्यावी अशी मागणी लेखी अर्ज द्वारे भानुमती करसन बरफ , असीना परशुराम वरठा , सोनल महेंद्र जाबर सह अन्य वारसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शासकीय अधिकारी तसेच पोलीस आयुक्त मधुकर पांडेय आदींना केली आहे .  

स्वातंत्र्य सैनिकाचे हे आदिवासी वारसदार घरकाम , मजुरी आदी कामे करून चाळीत वा भाड्याच्या घरात राहून हलाखीचे जीवन जगत आहेत . कोट्यवधी रुपयांची जमीन असून देखील काही विकासक , कारस्थानी व अधिकारी यांच्या संगनमता मुळे हक्काची जमीन बळकावली गेल्याचे त्यांनी सांगितले . 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस