शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

स्वातंत्र्य सैनिकाची जमीन बळकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून हक्क द्या; आदिवासी कुटुंबियांचे साकडे 

By धीरज परब | Updated: November 5, 2023 14:09 IST

मीरारोडच्या मीरा गावात राहणारे स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे १९८८ साली निधन झाले .

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या आदिवासी कुटुंबावर हलाखीचे जीवन जगण्याची पाळी आली आहे . त्या स्वातंत्र्य सैनिकाची जमीन बनावट लोक व बनावट कागदपत्रां द्वारे कटकारस्थान करून लुबाडण्यात आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून आमची जमीन आम्हाला परत करा अशी मागणी स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री पासून मीरा भाईंदर - वसई विरारच्या पोलीस आयुक्तां कडे केली आहे. 

मीरारोडच्या मीरा गावात राहणारे स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे १९८८ साली निधन झाले . त्यांच्या वारसांनी केलेल्या तक्रारी नुसार मोतीराम जाबर हे आमचे आजोबा असून ते स्वातंत्र्य सैनिक तसेच आदिवासी कुटुंबातील होते . १९७३ साली  तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्वाक्षरीने त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून सन्मानपत्र देण्यात आले होते . काही वर्षां पूर्वी मीरा भाईंदर महापालिकेने देखील त्यांच्या वारसांना सन्मानपत्र दिले होते. 

आजोबांची १९५१ साला पासून संरक्षित कुळ म्हणून मौजे मिरे सर्व्हे क्र . १२७ / १ व नवीन ७ / १  मध्ये नोंद होती व ते त्याठिकाणी शेती करत होते . परंतु १९६३ साली जमीन आजोबांची जमीन हडपण्यासाठी मोतीराम जाबर यांच्या ऐवजी मोतीराम काळ्या पाटील  या नावाच्या बोगस व्यक्तीला पुढे करून त्या नावाने खोट्या सह्या व खोटी कागदपत्रे सादर केली . 

आश्चर्य म्हणजे १९७२ साली सातबारा नोंदी मेरुद्दिन इसाक पटेल व इत्तर यांचे कुळ म्हणून नाव लावण्यात आले . स्वातंत्र्य सैनिक व आदिवासीचे संरक्षित कुळ असताना पटेल व इत्तर यांचे कुळ कसे लागू शकते ? तर तहसीलदार यांनी २०१५ साली आम्हास आमचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे वारस म्हणून संरक्षित कुळ म्हणून घोषित केले होते . तसा आदेश त्यांनी दिला होता . 

मात्र संबंधित लोकांनी आमच्या आजोबा व नंतर आम्हा वारसांच्या अज्ञानी - अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला आमच्या राह्यता घरातून आणि शेत जमिनीतून गुंडगिरी - दहशत माजवून बळजबरी हुसकावून लावले. आदिवासी संरक्षित कुळ असल्याने सदर जमीन विक्री व विकसित करण्यात अडचण येऊ नये म्हणून आधी पाटील नावाची बोगस व्यक्ती चे नावाचे पत्र देऊन आणि नंतर मेरुद्दिन इसाक पटेल व इत्तर यांचे कुळ म्हणून नाव लावण्यात आले . नंतर पटेल  यांचे कुळ काढून घेऊन जयराज देविदास व इतर यांनी स्वतःची नावे सात बारा नोंदी लावून घेतली असल्याचे स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसांनी सांगितले . 

स्वातंत्र्य सैनिक व आदिवासी जमातीतले मोतीराम जाबर यांची तसेच त्यांचे वारस आदिवासी कुटुंबाची फसवणूक व अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा . आमच्या हक्काची जमीन आम्हाला मिळवून द्यावी अशी मागणी लेखी अर्ज द्वारे भानुमती करसन बरफ , असीना परशुराम वरठा , सोनल महेंद्र जाबर सह अन्य वारसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शासकीय अधिकारी तसेच पोलीस आयुक्त मधुकर पांडेय आदींना केली आहे .  

स्वातंत्र्य सैनिकाचे हे आदिवासी वारसदार घरकाम , मजुरी आदी कामे करून चाळीत वा भाड्याच्या घरात राहून हलाखीचे जीवन जगत आहेत . कोट्यवधी रुपयांची जमीन असून देखील काही विकासक , कारस्थानी व अधिकारी यांच्या संगनमता मुळे हक्काची जमीन बळकावली गेल्याचे त्यांनी सांगितले . 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस